शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

तीन ठिकाणी आठवडी बाजार बंद

By admin | Updated: June 6, 2017 00:11 IST

परभणी तालुक्यातील झरी, पेडगाव आणि पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील आठवडी बाजार रविवारी बंद ठेवून शेतकऱ्यांनी संपाची तीव्रता वाढविली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी चौथ्या दिवशीही जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. परभणी तालुक्यातील झरी, पेडगाव आणि पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील आठवडी बाजार रविवारी बंद ठेवून शेतकऱ्यांनी संपाची तीव्रता वाढविली. तसेच पिंगळी येथे रास्ता रोको आंदोलन करीत शेतकऱ्यांनी भाजीपाला व दूध रस्त्यावर ओतून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.संपूर्ण कर्जमाफीच्या प्रश्नावर जिल्ह्यात १ जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. भाजीपाला व अन्य कृषी उत्पादने बाजारपेठेत विक्रीसाठी न नेता गावातच वाटली जात आहेत. रविवारीदेखील हा संप सुरु ठेवण्यात आला. परभणी शहरालगत असलेल्या ब्राह्मणगाव परिसरात किसान क्रांती समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी भाजीपाल्याची वाहने अडवून ती परत पाठविली. पिंगळी येथे सकाळी ९ वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे परभणी- पालम महामार्ग दोन तास ठप्प झाला होता. पिंगळी गावात शेतकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. त्यानंतर शेतकऱ्यांनी भाजीपाला व दूध ओतून देऊन निषेध नोंदविला. पिंगळी विकास संघर्ष समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्ष संघटनांनीही संपात सहभाग घेतला. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाऊसाहेब गरुड, उमेश खाकरे, डी. डी. गरुड, ज्ञानराज पाटील, अंगद गरुड, सतीश खाकरे, गजानन गरुड, राज गरुड, अरुण साखरे, श्याम गरुड, सुंदर गरुड, अंकुश गरुड, शिवा दामोधर, शंकर गरुड, रावसाहेब गरुड आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तालुक्यातील पेडगाव येथील बाजारपेठही रविवारी बंद पाळण्यात आली. पिंपळगाव, एकरुखा, ब्रह्मपुरी, वडगाव, किन्होळा, पान्हेरा, भोगाव, गव्हा, मोहपुरी, हसनापूर, कार्ला, तुळजापूर, गोविंदपूर, सारंगपूर, कुंभारी, आर्वी आदी १८ गावांतील शेतकरी येथे भाजीपाला विक्रीसाठी आणतात. रविवारी सकाळी शेतकऱ्यांना बाजारपेठेत शेतमाल विक्री न करण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य टी. एम. देशमुख, गोविंद देशमुख, संतोष देशमुख, नारायण देशमुख, पंडित देशमुख, माणिक जेवणार, प्रसाद देशमुख आदींनी शेतकऱ्यांना आवाहन केले. त्यामुळे बैलगाडीने आणलेला शेतीमाल काही शेतकऱ्यांनी बाजार परिसरातच फेकून दिला. तर काहींनी गावाकडे परत नेला. दरम्यान, बाजार न भरल्याने सुमारे तीन लाख रुपयांचा व्यवहार ठप्प झाला.झरी येथेही रविवारी आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला. या ठिकाणी जलालपूर, नांदापूर, पिंपळा, जवळा, मिर्झापूर, वाडी आदी गावांतील शेतकरी व ग्रामस्थ बाजारासाठी येत असतात. परंतु, अचानक बाजार बंद राहिल्याने ग्रामस्थांचे हाल झाले. सोमवारीदेखील झरी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन बालाजी देशमुख, ओंकार सावंत, गजानन चव्हाण, अभिजीत परिहार, गजानन हेंडगे, अंकुश जोशी, किरण देशमुख आदींनी केले आहे. ताडकळस येथेही आठवडी बाजार बंद ठेवून शेतकऱ्यांनी संपात सहभाग घेतला. बाजारात विक्रीसाठी आणलेला भाजीपाला रस्त्यावर टाकून देत निषेध व्यक्त करण्यात आला.