शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

हापूसच्या हंगामाला हवामानाची लागण

By admin | Updated: December 22, 2015 01:13 IST

थंडी गायबच : मोहोर प्रक्रियाही यंदा उशिराच

रत्नागिरी : डिसेंबर संपत आला तरी हवामानामध्ये फारसा बदल झालेला नाही. थंडी गायब असल्यामुळे मोहोर प्रक्रिया लांबली आहे. त्यामुळे यावर्षीचा हंगाम लांबणार असल्याची भीती निर्माण होत आहे.यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा निम्मा झाल्यामुळे आंब्याच्या झाडाला पालवी मोठ्या प्रमाणात आली. काही ठिकाणी पालवी जून झाली आहे. तरीही काही झाडांना अद्याप पालवीची प्रक्रिया सुरूच राहिली आहे. कडक पालवी झालेल्या झाडांना मोहोर प्रक्रिया सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, हे प्रमाण अल्प आहे. आतापर्यंत जेमतेम ३० टक्के झाडांना मोहोर आला आहे. ७० टक्के झाडे मोहोराशिवाय आहेत.नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडी सुरु झाली, तर येणाऱ्या मोहोरामुळे होणारी फळधारणा त्यामुळे आंबा मार्चअखेर बाजारात येतो. परंतु डिसेंबर संपत आला तरी मोहोर नसल्याने बागायतदार चिंतेत आहेत. आंब्याचा पहिला मोहोर हा चांगले व मोठे फळ देणारा मानला जातो. परंतु यावर्षी मोहोरच कमी प्रमाणात असल्यामुळे पिकाचे प्रमाण अत्यल्प राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोहोरच व्यवस्थित आला नसल्यामुळे फळधारणा लांबण्याची शक्यता आहे. आलेल्या मोहोराला किरकोळ फळधारणा आहे. कणीपासून बोरांच्या आकाराएवढी फळे लागली आहेत. परंतु ढगाळ वातावरणामुळे मोहोरावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सातत्याने वातावरणातील बदलामुळे मोहोर व फळांच्या संरक्षणासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. कीटकनाशकांचे वाढते दर, मजुरी, इंधन आदी कारणांमुळे आंबापीक घेणे शक्य होत नाही. उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण अधिक असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. जानेवारी जवळ आला तरी व्यवस्थित मोहोर न झाल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अनेक शेतकरी स्वत:च्या कलमांबरोबरच इतर शेतकऱ्यांची कलमे कराराने घेऊन आंबा व्यवसाय करीत असतात. त्यामुळे कराराने कलमे घेतल्यानंतर ठरलेले पैसे द्यावे लागतात. परंतु गेली दोन वर्षे उत्पन्नच अल्प आल्याने संबंधित शेतकरीवर्गाला आर्थिक भुर्दंड बसला आहे. यावर्षी अद्याप थंडीचे प्रमाण नसल्यामुळे पोषक हवामान आंब्याला उपलब्ध झाले नाही. त्यामुळे यावर्षीचा हंगामदेखील शेतकऱ्यांना चिंतेचा ठरणार अशीच चिन्हे निर्माण झाली आहेत. (प्रतिनिधी)ऋतुमान बदलले : थंडीचा मोसमही लांबलायावर्षी सर्वच ऋतुमान बदलल्याने त्याचा परिणाम हापूसच्या पिकावर होणार हे सुरुवातीपासूनच दिसून येत होते. नोव्हेंबरपर्यंत अधूनमधून येणारा पाऊस, त्यामुळे लांबलेली थंडी या साऱ्या वातावरणात यंदा हापूस उशिरा येण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्त केली जात आहे.