शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

हापूसच्या हंगामाला हवामानाची लागण

By admin | Updated: December 22, 2015 01:13 IST

थंडी गायबच : मोहोर प्रक्रियाही यंदा उशिराच

रत्नागिरी : डिसेंबर संपत आला तरी हवामानामध्ये फारसा बदल झालेला नाही. थंडी गायब असल्यामुळे मोहोर प्रक्रिया लांबली आहे. त्यामुळे यावर्षीचा हंगाम लांबणार असल्याची भीती निर्माण होत आहे.यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा निम्मा झाल्यामुळे आंब्याच्या झाडाला पालवी मोठ्या प्रमाणात आली. काही ठिकाणी पालवी जून झाली आहे. तरीही काही झाडांना अद्याप पालवीची प्रक्रिया सुरूच राहिली आहे. कडक पालवी झालेल्या झाडांना मोहोर प्रक्रिया सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, हे प्रमाण अल्प आहे. आतापर्यंत जेमतेम ३० टक्के झाडांना मोहोर आला आहे. ७० टक्के झाडे मोहोराशिवाय आहेत.नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडी सुरु झाली, तर येणाऱ्या मोहोरामुळे होणारी फळधारणा त्यामुळे आंबा मार्चअखेर बाजारात येतो. परंतु डिसेंबर संपत आला तरी मोहोर नसल्याने बागायतदार चिंतेत आहेत. आंब्याचा पहिला मोहोर हा चांगले व मोठे फळ देणारा मानला जातो. परंतु यावर्षी मोहोरच कमी प्रमाणात असल्यामुळे पिकाचे प्रमाण अत्यल्प राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोहोरच व्यवस्थित आला नसल्यामुळे फळधारणा लांबण्याची शक्यता आहे. आलेल्या मोहोराला किरकोळ फळधारणा आहे. कणीपासून बोरांच्या आकाराएवढी फळे लागली आहेत. परंतु ढगाळ वातावरणामुळे मोहोरावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सातत्याने वातावरणातील बदलामुळे मोहोर व फळांच्या संरक्षणासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. कीटकनाशकांचे वाढते दर, मजुरी, इंधन आदी कारणांमुळे आंबापीक घेणे शक्य होत नाही. उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण अधिक असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. जानेवारी जवळ आला तरी व्यवस्थित मोहोर न झाल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अनेक शेतकरी स्वत:च्या कलमांबरोबरच इतर शेतकऱ्यांची कलमे कराराने घेऊन आंबा व्यवसाय करीत असतात. त्यामुळे कराराने कलमे घेतल्यानंतर ठरलेले पैसे द्यावे लागतात. परंतु गेली दोन वर्षे उत्पन्नच अल्प आल्याने संबंधित शेतकरीवर्गाला आर्थिक भुर्दंड बसला आहे. यावर्षी अद्याप थंडीचे प्रमाण नसल्यामुळे पोषक हवामान आंब्याला उपलब्ध झाले नाही. त्यामुळे यावर्षीचा हंगामदेखील शेतकऱ्यांना चिंतेचा ठरणार अशीच चिन्हे निर्माण झाली आहेत. (प्रतिनिधी)ऋतुमान बदलले : थंडीचा मोसमही लांबलायावर्षी सर्वच ऋतुमान बदलल्याने त्याचा परिणाम हापूसच्या पिकावर होणार हे सुरुवातीपासूनच दिसून येत होते. नोव्हेंबरपर्यंत अधूनमधून येणारा पाऊस, त्यामुळे लांबलेली थंडी या साऱ्या वातावरणात यंदा हापूस उशिरा येण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्त केली जात आहे.