शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

इट का जवाब हम पत्थरसे देंगे !

By admin | Updated: October 9, 2014 23:02 IST

राजनाथ सिंग : साताऱ्यातील सभेत पाकला ठणकावले

सातारा : ‘भारत देवभूमी आहे. आमच्या देवभूमीवर कोणी वाईट नजर ठेवत असेल, तर आम्ही कदापि ते सहन करणार नाही आणि पडलीच तर आम्ही शांत बसणार नाही,’ असे सांगतच ‘पाकिस्तानने त्यांचे नापाक इरादे थांबविले नाही तर ‘इट का जवाब हम पत्थरसे देंगें’ असा खणखणीत इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज, गुरुवारी सातारा येथे पाकिस्तानला दिला.‘सातारा-जावळी’चे भाजपचे उमेदवार दीपक पवार यांच्या प्रचारार्थ आज सातारा येथील गांधी मैदानावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची सभा झाली, त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. मात्र, याचवेळी महाराष्ट्र फक्त अन्याय आणि अत्याचार तसेच घोटाळ्यांत नंबर वन असल्याचे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीलाही लक्ष्य केले.राजनाथ सिंग म्हणाले, ‘ज्यावेळी सीमेवर गोळीबार होत असताना त्याचे राजकारण होत आहे. मात्र, राजनीतीमध्ये असणारा ‘नीती’ शब्द विरोधकांनी विसरू नये. देश संरक्षणार्थ ‘अनीती’ नको तर ‘नीती’ हवी आहे. भारताला यापुढे कोणासमोर मान झुकवावी लागणार नाही, असे काम आम्ही करत आहे. पाकने गोळीबार सुरू केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले जात आहे. मात्र, आम्ही विरोधकांना सांगू इच्छितो की, देशाची हवा आता बदलली आहे. पाकविरोधात रणनीती आखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी सूचना आणि आदेश देत आहेत. आपले सीमा सुरक्षा दल पाकचा सामना करण्यास सक्षम आहे. पाकने यापुढे खुरापत काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना र्इंट का जवाब पत्थर से देण्यास तयार आहे.’राजनाथ सिंह यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवरही जोरदार आगपाखड केली. ते म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्राचे वाटोळे केले. हे फक्त महाराष्ट्र नंबर वनचा दावा करतात. मात्र, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार, घोटाळे, महिला अत्याचार यामध्ये नंबर वन आहेत. राज्यात १३६२ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. अशी परिस्थिती असेल तर महाराष्ट्र नंबर वन कसा, याचे उत्तर द्यावे लागणार आहे.’ राजनाथ सिंह म्हणाले, ‘मुंबई ही महाराष्ट्राचीच नव्हेतर जगाची आर्थिक राजधानी आहे. तिचा आपल्याला खेळ करायचा नाही. महाराष्ट्रातील राजकीय मंडळी कोणताही आरोप झाला की कोणीही खुर्ची सोडायला तयार नाही. आम्हाला हे बदलायचे आहे. त्यामुळे भाजपला साथ करा.’मराठीतून सुरुवात...केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सभामंचकावर आल्या-आल्या सर्वांना हात उंचावून अभिवादन केले आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीमध्ये प्रथमच येत आहे. मी धन्य झालो. मला मराठी बोलता येत नाही; मात्र थोडा बहुत मराठी समज लेता हूँ’ अशी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. आता ‘मेड इन इंडिया’राजनाथ सिंग यांनी आपल्या दहा मिनिटांच्या भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करीत असतानाच मोदी सरकारच्या कार्यपद्धतीचे कौतुकही केली. ते म्हणाले, ‘विज्ञान तंत्रज्ञानात भारत आघाडी घेत असल्यामुळे उद्योगक्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. आता यापुढील काळात भारतात चायना मेड, अमेरिका मेड, जपान मेड उत्पादने मिळणार नाहीत, तर ती ‘मेड इन इंडिया’ उत्पादनेच मिळणार आहेत.