शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

..... तर असा देशद्रोह आम्ही रोजच करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 18:18 IST

दिलेली आश्वासने पाळत का नाही असे विचारणे म्हणजे देशद्रोह ठरत असेल तर मग आम्ही असा देशद्रोह रोज करणार असे  सुकाणू समितीचे नेते साथी सुभाष लोमटे यांनी आज येथे स्पष्टपणे ठणकावले आहे.

ठळक मुद्देबाजू मांडण्यासाठी औरंगाबादचे सुकाणू समितीचे नेते पत्रपरिषदेत एकत्र आले. किती शेतक-यांचा सातबारा कोरा झाला, हे तरी सांगा, असे आवाहन लोमटे यांनी केले. जीवाणू उपयुक्त असतो. विषाणू बाधक असतो. हा फरक मुख्यमंत्र्यांनी जरा नीट समजून घेतला पाहिजे, असा सल्ला देसरडा यांनी दिला.

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. 18 : पालकमंत्र्यांऐवजी शेतकरी, कष्टकरी वा स्वातंत्र्यसैनिक यांना ध्वजारोहण करु द्यावे असे आवाहन आम्ही केले होते. हा देशद्रोह होय असा जावईशोध मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. दिलेली आश्वासने पाळत का नाही असे विचारणे म्हणजे देशद्रोह ठरत असेल तर मग आम्ही असा देशद्रोह रोज करणार असे  सुकाणू समितीचे नेते साथी सुभाष लोमटे यांनी आज येथे स्पष्टपणे ठणकावले आहे. 

काल मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समिती जीवाणू आहे, ती राष्टद्रोही आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावर आपली बाजू मांडण्यासाठी औरंगाबादचे सुकाणू समितीचे नेते पत्रपरिषदेत एकत्र आले. यावेळी कॉ. एच. एम. देसरडा, साथी अण्णा खंदारे, कॉ. उध्दव भवलकर, जनार्दन पिंपळे, कॉ. बुध्दप्रिय कबीर, मंगल ठोंबरे, कॉ. लक्ष्मण साक्रुडकर, अजमलखान  आदींची उपस्थिती होती. 

सुभाष लोमटे म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करा असे म्हणणे कसा काय देशद्रोह ठरु शकतो. मग लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत का? जनतेचे प्रश्न उपस्थित करणे हा देशद्रोह ठरणार असेल तर मग असा देशद्रोह आम्हाला रोज करावा लागेल. उलट दिलेली आश्वासने न पाळने हा देशद्रोह होय. पण असा आरोप आम्ही करु इच्छित नाही. पण लोकशाहीत तुम्हाला आम्ही जाब विचारणार...उत्तरे देण्याची जवाबदारी तुमची आहे. जाब विचारण्याचा आमचा अधिकार तरी हिरावून घेऊ नका. 

सुकाणू समितीची ताकद नाही. नसेलही.मग मुख्यमंत्र्यांनी आमची दखल घेण्याचीही गरज नाही. मग ते का घेतात?  आम्ही शेतक-यांचा नेमका प्रश्न लावून धरतोय. या प्रश्नाची पुन्हा पुन्हा आठवण करुन देतोय, हेच त्यांना नकोय. रोज शेकतरी आत्महत्त्या करताहेत, मग किती शेतक-यांचा सातबारा कोरा झाला, हे तरी सांगा, असे आवाहन लोमटे यांनी केले. 

लोमटे यांनी सांगितले की, ध्वजारोहण रोखण्याची आमची भूमिका नव्हती. आणि सुकाणू समितीतर्फे कुठेही ध्वजारोहण रोखले गेले नाही. सुकाणू समितीत विविध जनसंघटना आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी नाहीत.  विरोधी पक्षाचे मत लोकशाहीत गाभा असतो, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे.

जीवाणू उपयुक्त असतो. विषाणू बाधक असतो. सुकाणू समिती जीवाणू असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांनी हा फरक जरा नीट समजून घेतला पाहिजे, असा सल्ला देसरडा यांनी दिला. सध्याच्या सरकारची पाऊले छुप्या आणीबाणीकडे चालली आहेत. लोकशाहीचा संकोच होतोय, असे ते म्हणाले.