शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

..... तर असा देशद्रोह आम्ही रोजच करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 18:18 IST

दिलेली आश्वासने पाळत का नाही असे विचारणे म्हणजे देशद्रोह ठरत असेल तर मग आम्ही असा देशद्रोह रोज करणार असे  सुकाणू समितीचे नेते साथी सुभाष लोमटे यांनी आज येथे स्पष्टपणे ठणकावले आहे.

ठळक मुद्देबाजू मांडण्यासाठी औरंगाबादचे सुकाणू समितीचे नेते पत्रपरिषदेत एकत्र आले. किती शेतक-यांचा सातबारा कोरा झाला, हे तरी सांगा, असे आवाहन लोमटे यांनी केले. जीवाणू उपयुक्त असतो. विषाणू बाधक असतो. हा फरक मुख्यमंत्र्यांनी जरा नीट समजून घेतला पाहिजे, असा सल्ला देसरडा यांनी दिला.

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. 18 : पालकमंत्र्यांऐवजी शेतकरी, कष्टकरी वा स्वातंत्र्यसैनिक यांना ध्वजारोहण करु द्यावे असे आवाहन आम्ही केले होते. हा देशद्रोह होय असा जावईशोध मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. दिलेली आश्वासने पाळत का नाही असे विचारणे म्हणजे देशद्रोह ठरत असेल तर मग आम्ही असा देशद्रोह रोज करणार असे  सुकाणू समितीचे नेते साथी सुभाष लोमटे यांनी आज येथे स्पष्टपणे ठणकावले आहे. 

काल मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समिती जीवाणू आहे, ती राष्टद्रोही आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावर आपली बाजू मांडण्यासाठी औरंगाबादचे सुकाणू समितीचे नेते पत्रपरिषदेत एकत्र आले. यावेळी कॉ. एच. एम. देसरडा, साथी अण्णा खंदारे, कॉ. उध्दव भवलकर, जनार्दन पिंपळे, कॉ. बुध्दप्रिय कबीर, मंगल ठोंबरे, कॉ. लक्ष्मण साक्रुडकर, अजमलखान  आदींची उपस्थिती होती. 

सुभाष लोमटे म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करा असे म्हणणे कसा काय देशद्रोह ठरु शकतो. मग लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत का? जनतेचे प्रश्न उपस्थित करणे हा देशद्रोह ठरणार असेल तर मग असा देशद्रोह आम्हाला रोज करावा लागेल. उलट दिलेली आश्वासने न पाळने हा देशद्रोह होय. पण असा आरोप आम्ही करु इच्छित नाही. पण लोकशाहीत तुम्हाला आम्ही जाब विचारणार...उत्तरे देण्याची जवाबदारी तुमची आहे. जाब विचारण्याचा आमचा अधिकार तरी हिरावून घेऊ नका. 

सुकाणू समितीची ताकद नाही. नसेलही.मग मुख्यमंत्र्यांनी आमची दखल घेण्याचीही गरज नाही. मग ते का घेतात?  आम्ही शेतक-यांचा नेमका प्रश्न लावून धरतोय. या प्रश्नाची पुन्हा पुन्हा आठवण करुन देतोय, हेच त्यांना नकोय. रोज शेकतरी आत्महत्त्या करताहेत, मग किती शेतक-यांचा सातबारा कोरा झाला, हे तरी सांगा, असे आवाहन लोमटे यांनी केले. 

लोमटे यांनी सांगितले की, ध्वजारोहण रोखण्याची आमची भूमिका नव्हती. आणि सुकाणू समितीतर्फे कुठेही ध्वजारोहण रोखले गेले नाही. सुकाणू समितीत विविध जनसंघटना आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी नाहीत.  विरोधी पक्षाचे मत लोकशाहीत गाभा असतो, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे.

जीवाणू उपयुक्त असतो. विषाणू बाधक असतो. सुकाणू समिती जीवाणू असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांनी हा फरक जरा नीट समजून घेतला पाहिजे, असा सल्ला देसरडा यांनी दिला. सध्याच्या सरकारची पाऊले छुप्या आणीबाणीकडे चालली आहेत. लोकशाहीचा संकोच होतोय, असे ते म्हणाले.