शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

"आम्ही गप्प राहतो, याचा अर्थ कमजोर आहोत, असा नाही; उत्तर देणं प्रत्येकाला येतं, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 20:15 IST

"तुम्ही आम्हाला सांगता, की राजीनामे देऊन पुन्हा निवडून या, मग २०१९ मध्ये तुम्ही राजीनामे देऊन, निवडून येऊन सरकार का स्थापन केलं नाही?"

मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावला आणि पक्षात उभी फूट पडली. नंतर, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. या संपूर्ण राजकीय महानाट्याला सुरुवात झाल्यापासूनच, शिवसेनेतील ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट एकमेकांवर सातत्याने आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे गटाला, राजीनामे देऊन पुन्हा निवडून या, असे म्हटले जात आहे. यावर आता एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार दीपक केसरकर यांनी थेट भाष्य केले आहे. तसेच, आम्ही गप्प राहतो, याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत, असा बिलकूल नाही, असेही केसरकर यांनी म्हटले आहे. 

केसरकर म्हणाले, जेव्हा तुम्ही आम्हाला सांगता, की राजीनामे देऊन पुन्हा निवडून या, मग २०१९ मध्ये तुम्ही राजीनामे देऊन, निवडून येऊन सरकार का स्थापन केलं नाही? असा सवाल करत, आम्ही गप्प राहतो, याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत, असा बिलकूल नाही. आम्ही, तुमच्या बद्दल (उद्धव ठाकरे) आदर आहे, म्हणून गप्प राहतो. उत्तर देणं प्रत्येकाला येतं. पण जेव्हा दुसरा मनुष्य आपल्याला आदर देत असतो, तेव्हा तो स्वीकारताही यायला हवा. ते लोकांना आवडते. 

एखाद्याला वाईट ठरवायचे असेल तर काहीही बोलले जाऊ शकते -उद्धव ठाकरेंना उद्देशून केसरकर म्हणाले, आपण म्हणता, की मातोश्रीवर आरोप झाले आणि यांनी काही केलेच नाही, असे बिलकूल नाही. हे असत्य आहे. प्रत्येकाने आपापाल्या परीने काही तरी केलेले आहे. त्यामुले एखाद्याला वाईट ठरवायचे असेल तर काहीही बोलले जाऊ शकते. हे  चुकीचे आहे. मला जे सांगायचे आहे. ते मी दोन दिवसांनंतर पुन्हा सांगेन. पण एकनाथ शिंदे यांना विश्वासघातकी म्हणणे आम्हाला अजिबात मान्य नाही. ते आमचे गटनेते आहेत. कदाचित तो तुमचा अधिकार असेल. तर, खालची अनेक नेते तसेच म्हणत असतात.

९० टक्के समाज कारण आणि १० टक्के राजकारण, अशी इमेज कुणी तयार केली महाराष्ट्रात? -"जेव्हा तुम्ही आमच्या एकनाथ शिंदे यांना विश्वासघातकी म्हणतात, तेव्हा त्यांच्या मनाचा विचार करा. त्यांना काय वाटत असेल? ज्यांनी तुमच्यासाठी आयुष्य वेचलं. महाराष्ट्रात कुठलीही अडचण आली, तेव्हा तुम्ही त्यांनाच पाठवत होतात ना? शिवसेनेची इमेज कुणी तयार केली, ९० टक्के समाज कारण आणि १० टक्के राजकारण, अशी इमेज कुणी तयार केली महाराष्ट्रात? शिंदे साहेबांनी तयार केली. कोरोना काळात त्यांना दोन वेळा कोरोना झाला. पण त्या काळात सर्वाधिक काम, हे त्यांनीच केले आहे. मग त्यांनी का ऐकूण घ्यावे? त्यांचा प्रतिनिधी म्हणून मीही का एकूण घ्यावे? हाही प्रश्न आहे आमच्या समोर. पण चुकीचे बोलू नका. जर तुम्हीही पथ्य पाळायचे ठरवले असेल, तर तुमच्या कार्यकरत्यांनाही पथ्य पाळायला सांगा. तर आम्ही म्हणून की नेत्याचं कार्यकर्ते ऐकतात," असेही केसरकर यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे