शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

"आम्ही गप्प राहतो, याचा अर्थ कमजोर आहोत, असा नाही; उत्तर देणं प्रत्येकाला येतं, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 20:15 IST

"तुम्ही आम्हाला सांगता, की राजीनामे देऊन पुन्हा निवडून या, मग २०१९ मध्ये तुम्ही राजीनामे देऊन, निवडून येऊन सरकार का स्थापन केलं नाही?"

मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावला आणि पक्षात उभी फूट पडली. नंतर, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. या संपूर्ण राजकीय महानाट्याला सुरुवात झाल्यापासूनच, शिवसेनेतील ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट एकमेकांवर सातत्याने आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे गटाला, राजीनामे देऊन पुन्हा निवडून या, असे म्हटले जात आहे. यावर आता एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार दीपक केसरकर यांनी थेट भाष्य केले आहे. तसेच, आम्ही गप्प राहतो, याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत, असा बिलकूल नाही, असेही केसरकर यांनी म्हटले आहे. 

केसरकर म्हणाले, जेव्हा तुम्ही आम्हाला सांगता, की राजीनामे देऊन पुन्हा निवडून या, मग २०१९ मध्ये तुम्ही राजीनामे देऊन, निवडून येऊन सरकार का स्थापन केलं नाही? असा सवाल करत, आम्ही गप्प राहतो, याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत, असा बिलकूल नाही. आम्ही, तुमच्या बद्दल (उद्धव ठाकरे) आदर आहे, म्हणून गप्प राहतो. उत्तर देणं प्रत्येकाला येतं. पण जेव्हा दुसरा मनुष्य आपल्याला आदर देत असतो, तेव्हा तो स्वीकारताही यायला हवा. ते लोकांना आवडते. 

एखाद्याला वाईट ठरवायचे असेल तर काहीही बोलले जाऊ शकते -उद्धव ठाकरेंना उद्देशून केसरकर म्हणाले, आपण म्हणता, की मातोश्रीवर आरोप झाले आणि यांनी काही केलेच नाही, असे बिलकूल नाही. हे असत्य आहे. प्रत्येकाने आपापाल्या परीने काही तरी केलेले आहे. त्यामुले एखाद्याला वाईट ठरवायचे असेल तर काहीही बोलले जाऊ शकते. हे  चुकीचे आहे. मला जे सांगायचे आहे. ते मी दोन दिवसांनंतर पुन्हा सांगेन. पण एकनाथ शिंदे यांना विश्वासघातकी म्हणणे आम्हाला अजिबात मान्य नाही. ते आमचे गटनेते आहेत. कदाचित तो तुमचा अधिकार असेल. तर, खालची अनेक नेते तसेच म्हणत असतात.

९० टक्के समाज कारण आणि १० टक्के राजकारण, अशी इमेज कुणी तयार केली महाराष्ट्रात? -"जेव्हा तुम्ही आमच्या एकनाथ शिंदे यांना विश्वासघातकी म्हणतात, तेव्हा त्यांच्या मनाचा विचार करा. त्यांना काय वाटत असेल? ज्यांनी तुमच्यासाठी आयुष्य वेचलं. महाराष्ट्रात कुठलीही अडचण आली, तेव्हा तुम्ही त्यांनाच पाठवत होतात ना? शिवसेनेची इमेज कुणी तयार केली, ९० टक्के समाज कारण आणि १० टक्के राजकारण, अशी इमेज कुणी तयार केली महाराष्ट्रात? शिंदे साहेबांनी तयार केली. कोरोना काळात त्यांना दोन वेळा कोरोना झाला. पण त्या काळात सर्वाधिक काम, हे त्यांनीच केले आहे. मग त्यांनी का ऐकूण घ्यावे? त्यांचा प्रतिनिधी म्हणून मीही का एकूण घ्यावे? हाही प्रश्न आहे आमच्या समोर. पण चुकीचे बोलू नका. जर तुम्हीही पथ्य पाळायचे ठरवले असेल, तर तुमच्या कार्यकरत्यांनाही पथ्य पाळायला सांगा. तर आम्ही म्हणून की नेत्याचं कार्यकर्ते ऐकतात," असेही केसरकर यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे