शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर बांधायला हवे

By admin | Updated: January 29, 2016 01:51 IST

भारतीय संस्कृतीमध्ये भगवान राम यांना परमपूज्य मानले आहे. तसेच आपल्या संस्कृतीतील आदर्श पुरुष म्हणून त्यांना मान्यता आहे. त्यातही केवळ मंदिर बांधण्याचा मुद्दा नाही

पुणे : ‘‘भारतीय संस्कृतीमध्ये भगवान राम यांना परमपूज्य मानले आहे. तसेच आपल्या संस्कृतीतील आदर्श पुरुष म्हणून त्यांना मान्यता आहे. त्यातही केवळ मंदिर बांधण्याचा मुद्दा नाही ; तर आदर्शांची स्थापना केली तर त्यानुसार पुढील पिढीपर्यंत आदर्श विचार पोहचतात. त्यामुळे भगवान राम यांच्या कर्मभूमीवर स्मारक झाले पाहिजे,’’ असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सहाव्या भारतीय छात्र संसदेमध्ये ‘संस्कृती व संविधानातून राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावरील सत्रात भागवत बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर , एमआयटीएचे संस्थपाक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, भारतीय छात्र संसदेचे समन्वयक प्रा. राहूल कराड आदी उपस्थित होते. यावेळी झालेली प्रश्नोत्तरे पुढीलप्रमाणे -भारतीय छात्र संसदमाईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘संस्कृती व संविधानातून राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर भागवतांनी विचार मांडले.प्रश्न - राम मंदिर बांधल्यामुळे गरीबाच्या ताटात भाकरी येणार आहे का? भागवत - सध्या राम मंदिर बांधले गेले नाही म्हणून काय गरीबाच्या ताटात भाकरी आली आहे का? केवळ मंदिर बांधण्याचा प्रश्न नाही तर त्यांच्या कर्मभूमीत स्मारक उभारलेच पाहिजे.प्रश्न - आरक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटते?भागवत - समाजात भेदभाव आहे तोपर्यंत आरक्षण असले पाहिजे. मात्र,आरक्षणाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे.प्रश्न - देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या वातावरणामुळे काहींनी देश सोडून जाण्याचे वक्तव्य केले होते, त्याबद्दल तुमचे मत काय आहे? भागवत - स्वार्थी भूमिकेतून भावूकतेने केलेल्या वक्तव्यावर माझा विश्वास नाही. सहिष्णूता संस्कृतीचा आत्मा आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये सहन वआदर करण्याची भावना असावी. राजकीय व्यक्तींसह इतरांनीही समाज भडकविणारी वक्तव्य केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.