शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

आम्ही रोज गांधी जगतो

By admin | Updated: February 1, 2015 00:56 IST

राष्ट्रपित्याच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी कुठलीही चढाओढ नाही किंवा बडेजावपणा नाही. विचारांसोबतच आचार अमलात आणले पाहिजे या भावनेतूनच उतरणारी कृती.

कृतीत दिसतो विचारांचा प्रभाव : गांधी विचारधारा विभागातील विद्यार्थ्यांच्या भावनानागपूर : राष्ट्रपित्याच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी कुठलीही चढाओढ नाही किंवा बडेजावपणा नाही. विचारांसोबतच आचार अमलात आणले पाहिजे या भावनेतूनच उतरणारी कृती. कुणाची सर्वधर्मसमभाव प्रार्थनेसोबत अध्ययनाची जोड तर काहींचा स्वच्छतेवर अन् सूतकताईवर भर. शिवाय सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा, संयम अन् समाजसेवा या मूल्यांतून उमटलेली संवेदना. हीच होती त्यांची श्रद्धांजली अन् हाच होता महात्मा गांधींच्या प्रति नमनभाव.महात्मा गांधी यांची जयंती व पुण्यतिथी यादिवशी त्यांच्या प्रतिमेला किंवा पुतळ्याला माल्यार्पण करण्याची स्पर्धा दिसून येते. वर्षातील इतर दिवस मात्र अनेकांना गांधीविचारांचा सोयीस्कररीत्या विसर पडतो. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील गांधी विचारधारा विभागातील विद्यार्थी केवळ १ किंवा २ दिवस नव्हे तर दररोज गांधींच्या विचारांवर जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाला सत्य व अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या विचारांनी या विद्यार्थ्यांना येथे अक्षरश: खेचून आणले आहे व त्यांच्याबाबत सखोल अध्ययन करत असताना राष्ट्रपित्याच्या अधिकाधिक जवळ जात आहेत. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विभागातील काही विद्यार्थ्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता त्यांनी आत्मसात केलेले गांधीविचार कृतीत कसे उतरतात हे दिसून आले. गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी गाजावाजा न करता अतिशय साधेपणाने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तरुणाईपर्यंत पोहोचावेत गांधींचे संस्कारया विभागात बहुतांश विद्यार्थी हे ३५ वयाच्या वरचे आहेत. हा अभ्यासक्रम नोकरी नव्हे तर मूल्यांची शिकवण देणारा आहे. विद्यार्थ्यांचा भर करियर बनविण्यावर असतो. परंतु करिअर घडवत असताना गांधींच्या विचारांवर चालण्याचा त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांच्यापर्यंत गांधींचे संस्कार पोहोचावेत ही काळाची गरज आहे. यासाठी मूल्यशिक्षणात जास्तीत जास्त प्रमाणात गांधींचे विचार उमटले पाहिजे यावर भर दिला गेला पाहिजे असे मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. शिवाय २ आॅक्टोबर हा गांधीजयंतीचा दिवस ‘नॅशनल हॉलिडे’ न ठेवता ‘नॅशनल डे’ असला पाहिजे. विद्यार्थ्यांना या दिवशी सुटी न देता गांधीविचारांचे संचित दिले पाहिजे, अशा भावनादेखील त्यांनी व्यक्त केल्या.शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविते गांधीइतर कुठल्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला नाही किंवा चांगली नोकरी लागेल या कारणांमुळे इतर विभागात प्रवेश घेतले जातात. परंतु मला व माझ्या सहकाऱ्यांना गांधींच्या विचारांनी येथे खेचून आणले आहे. गांधी यांच्या विचारांचे अध्ययन करत असताना ते समाजापर्यंत व विशेषत: नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याचादेखील माझा प्रयत्न असतो. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांना ‘साधे जीवन,उच्च विचार’ या संस्कारांवर मार्गदर्शन केले.-रजनी जसपाल काळेमिळतेय संयमाची शक्तीमहात्मा गांधी यांच्या विचारांत नेमके असे काय आहे की संपूर्ण जग त्यांना मानवंदना करते हे जाणून घेण्याची इच्छा होती. विभागात गांधी समजून घेत असताना संयमाचे महत्त्व लक्षात आले. माझी सहनशीलता व संयम नक्कीच वाढले आहे. पुण्यतिथीच्या दिवशी कामाच्या ठिकाणी वादाचा प्रसंग निर्माण झाला. परंतु गांधीविचारांतून मिळालेल्या संयमातून समोरच्या व्यक्तीची मानसिकता समजून घेतली. -सरिता देवल