शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हमें अभी पढना है...

By admin | Updated: July 2, 2016 04:41 IST

अल्पवयीन असतानाही पालकांनी लग्न ठरवले. पण मनात शिक्षणाची ओढ.

मनीषा म्हात्रे,

मुंबई- अल्पवयीन असतानाही पालकांनी लग्न ठरवले. पण मनात शिक्षणाची ओढ. अशा कठीण परिस्थितीत ‘हमे अभी पढना है...’ असे म्हणत लग्न ठरलेल्या मोठ्या बहिणीसह धाकट्या दोघींनीही घर सोडल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली. तिघीही अल्पवयीन आहेत. त्यांचा अद्याप शोध लागला नसून याप्रकरणी मानखुर्द पोलीस अधिक तपास करत आहेत.मानखुर्द परिसरात मीना (१७), सलमा (१६) आणि रेश्मा (१५) (नावे बदललेली आहेत) या तिघी बहिणी कुटुंबियांसोबत राहतात. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी मोठी बहीण असलेल्या मीनाची लगीन घाई घरात सुरू झाली. मात्र आपल्याला अजून शिकायचे असल्याचे सांगत तिने लग्नाला विरोध केला. लग्नायोग्य झाल्यानंतरच लग्न करण्याचा आपला निर्णय तिने सांगितले. मात्र कुटुंबीयांकडून तिच्यावर दडपण आणले जात होते. बळजबरी सुरू होती. त्यामुळे घरच्यांच्या दबावाला कंटाळून मीनाने घर सोडण्याचे ठरविले. ताईनंतर आपल्याही लग्नासाठी घाई केली जाईल या भीतीने इतर दोघींनीही मीनासह घर सोडण्याचा निर्णय घेतला. २६ जूनच्या मध्यरात्री घरातली मंडळी गाढ झोपेत असताना या तिघी आपले सामान घेऊन घर सोडून निघून गेल्या.रमजान सुरूअसल्याने उपवासापूर्वीचे जेवण करण्यासाठी २७ जून रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांचे कुटुंबिय उठले. मुलींच्या खोलीत गेले असता तिन्ही मुली खोलीत नसल्याचे आढळले. शिवाय कपाटातील काही कपडेही जागेवर नसल्याचे आईच्या लक्षात आले. कुटुंबियांनी मित्र मंडळी, नातेवाईकांकडे शोध सुरू केला. दुपारपर्यंत सगळीकडे त्यांचा शोध घेतल्यानंतर मुली घर सोडून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ याप्रकरणी मानखुर्द पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला. नंतर मुलीचे मनाविरुद्ध लग्न लावण्याचे ठरल्याने ती घरात भांडत होती, असे चौकशीत पोलिसांना समजले. त्यामुळे प्राथमिक तपासात मनाविरुद्ध लग्न जुळविल्याने या मुलींनी घर सोडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती मानखुर्द पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंग भोसले यांनी दिली. >मानखुर्दमधील घटना२७ जून रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास रोजा सुरू होण्यापूर्वीच्या जेवणासाठी कुटुंबीय उठले. त्यांना तिन्ही मुली खोलीत नसल्याचे आढळले. शिवाय कपाटातील काही कपडेही जागेवर नसल्याचे आईच्या लक्षात आले.