शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

बोटींबरोबर आम्हालाही कापा

By admin | Updated: November 7, 2016 06:36 IST

तालुक्यातील खानिवडे व कोपर बंदरात रेती उत्खनन बंद असतानाही सक्शन पंप व बोटींवर महसूल विभागाकडून होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ रेती व्यावसायिकांनी मुंबई-कर्णावती

वसई/पारोळ : तालुक्यातील खानिवडे व कोपर बंदरात रेती उत्खनन बंद असतानाही सक्शन पंप व बोटींवर महसूल विभागाकडून होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ रेती व्यावसायिकांनी मुंबई-कर्णावती महामार्ग रविवारी सुमारे दोन ते अडीच तास रोखून धरला. आमच्या बोटींबरोबर आम्हालाही कापा, असा आग्रह हे आंदोलक करीत होते. महसूल विभागाकडून बोटी व सक्शन पंप बंद असतानाही केवळ ते नदी पात्रात आहेत म्हणून कारवाई करून तोडण्यात आले. असे न करता जे सक्शन पंप व बोटी रेती उत्खनन करताना आढळतील त्यांच्यावरच कारवाई करावी. पंप आणि बोटी नदीत अथवा खाडीत ठेवायच्या नाहीत, अशी प्रशासनाची भूमिका असेल तर आम्हाला त्या सुरक्षित जागी हलविण्यास वेळ द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी या वेळी केली. या आंदोलनाचे नेतृत्व विभागातील माजी खासदार बळीराम जाधव यांनी केले. या वेळी जि.प. सदस्या कल्याणी तरे, नगरसेविका रमा किणी, टीडीसी बँक संचालक राजेश पाटील यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि शेकडोंच्या संख्येने भूमिपुत्र यात सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता.खानिवडे बंदरात बोटी व सक्शन पंप तोडण्यास सकाळी सुरुवात झाली. या बंदरात महिनाभरापासून रेती उत्खनन बंद आहे, त्यामुळे ही कारवाई योग्य नसल्याचा दावा करून कोपर, खानिवडे, खराट, तारा व आसपासच्या गावांतील भूमिपुत्रांनी एकत्र येऊन महामार्ग रोखला होता. आंदोलकांच्या मागणीचा विचार करून वरिष्ठ पातळीवरील चर्चेप्रमाणे कारवाई तात्पुरती स्थगित केल्याचे वसई प्रांत क्षीरसागर यांनी जाहीर केल्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा केला. (प्रतिनिधी)