शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

आम्हाला कुणाचे प्रशस्तिपत्र नको!

By admin | Updated: October 10, 2014 06:07 IST

अशा शब्दांत अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला.

कोल्हापूर/ औरंगाबाद : माहिती तंत्रज्ञानाचा क्रांतिकारी निर्णय राबविताना राजीव गांधींना हीणविणाऱ्या आणि आता त्याच माहिती तंत्रज्ञानाच्या बळावर चमकोगिरीचे राजकारण करणाऱ्यांना गेल्या ६० वर्षांत देशाने केलेला विकास कसा दिसणार? अशा शब्दांत अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला.काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापूर आणि औरंगाबाद येथे गुरुवारी दुपारी भर उन्हात झालेल्या प्रचारसभेला प्रचंड गर्दी जमली होती. काँग्रेसने ६० वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांची जंत्रीच श्रीमती गांधी यांनी सादर केली. त्या म्हणाल्या, आम्ही नेहमीच गोरगरिबांच्या कल्याणासाठी योजना राबवितो. त्यामुळे आम्हाला कोणाच्या प्रशस्तिपत्राची गरज नाही. पण जे भूलथापा देऊन सत्तेवर आले त्यांना १०० दिवसांतील कामाचा जाब विचारला तर एवढा राग का येतो, असा सवालही त्यांनी केला.भारत चंद्रावर, मंगळावर पोहोचला. देशाने अणुुशक्ती प्राप्त केली. अन्नधान्यात स्वयंपूर्णता आणली. माहिती-तंत्रज्ञानात आघाडी घेतली. हे सर्व कसे मिळाले, असा प्रश्न विचारून त्या म्हणाल्या की, हे सर्व काँग्रेसचे देशप्रेम, त्याग, बलिदान आणि उच्च ध्येयनिष्ठेसह  देशातील जनतेच्या गेल्या ६० वर्षांतील श्रमाचे फलित आहे. गेल्या ६० वर्षांत केलेल्या विकासकामांसाठी काँग्रेसला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असा उपरोधिक टोलाही त्यांनी भाजपाला लगावला, तेव्हा उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत ‘सोनिया गांधी जिंदाबाद’चे नारे लावले. योजना त्याच नावे बदललीदुसऱ्यांच्या योजना आपल्या नावावर खपविण्यात भाजपाचा हात कुणी धरूच शकणार नाही. काँग्रेस सरकारने ज्या योजना राबविल्या त्याच योजना नावे बदलून पंतप्रधान जोरजोराने ओरडून सांगत आहेत. वैज्ञानिकांनी रात्रीचा-दिवस करून जे यश मिळवले ते देखील आपल्या पक्षामुळेच, असे सांगायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही, असे सोनियांनी सांगताच एकच हशा पिकला.यावेळी मंचावर काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा, अब्दुल सत्तार (सिल्लोड), डॉ. कल्याण काळे (फुलंब्री), डॉ. जितेंद्र देहाडे (पश्चिम), एम.एम. शेख (मध्य), रवींद्र काळे (पैठण), शोभा खोसरे (गंगापूर), नामदेव पवार (कन्नड), कैलास गोरंट्याल (जालना), डॉ. संजय लाखे पाटील (घनसावंगी) व सुभाष मगरे (बदनापूर) हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, स्वराज्य वाल्मिकी आदी उपस्थित होते.