शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

आमच्याकडे अतिरेकी म्हणूनच पाहिले जाते! - मुश्ताक वाणी

By admin | Updated: July 8, 2017 04:11 IST

काश्मिरी जनता पर्यटक आणि यात्रेकरूंचे कायमच स्वागत करते. आतापर्यंत अमरनाथ यात्रेदरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तीत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काश्मिरी जनता पर्यटक आणि यात्रेकरूंचे कायमच स्वागत करते. आतापर्यंत अमरनाथ यात्रेदरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तीत साहाय्यासाठी आम्ही नेहमीच पुढे होतो. तरीही आमच्याकडे कायम अतिरेकी म्हणूनच पाहिले जाते. प्रत्येक वेळी देशभक्ती आणि निष्ठा सिद्ध करण्याची सक्ती आमच्यावर केली जाते, अशी खंत श्रीनगर येथील काश्मीर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मुश्ताक वाणी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली. आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘काश्मीर, ए डायलॉग फॉर पीस अ‍ॅण्ड इंटिग्रेशन’ या एकदिवसीय परिसंवादात ते बोलत होते.काश्मीरबाबत सतत नकारात्मक बातम्या पसरविल्या जातात. त्यामुळे लेह, लडाख, जम्मूच्या तुलनेत केवळ १० टक्के पर्यटक काश्मीरकडे येतात. बडे उद्योजकही येथे उद्योग उभारण्यास धजत नाहीत. त्यामुळे रोजगारासाठी येथील तरुणांना केवळ शासकीय नोकऱ्यांवर अवलंबून राहावे लागते, असेही वाणी म्हणाले. या परिसंवादात बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील मराठमोळे उपविभागीय न्यायदंडाधिकारी डॉ. सागर डोईफोडे, काश्मीरमध्ये काम करणाऱ्या असीम फाउंडेशनचे सारंग गोसावी, सद्भावना संस्थेचे संजय भावसार, सरहद संस्थेचे संजय नहर आदी सहभागी झाले होते.प्रशासनाची कार्यक्षमता गरजेची - डॉ. डोईफोडेआपल्याला वाटते त्यापेक्षा काश्मीरमधील परिस्थिती पूर्ण वेगळी असल्याचे डॉ. डोईफोडे यांनी या वेळी सांगितले. येथे काम करताना कोणतेही दडपण नाही. मात्र नागरी सुविधा सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याचे चित्र आहे. ते पालटण्यासाठी अधिक कार्यक्षम प्रशासनाची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.