शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

आषाढीसाठी आम्ही सज्ज : विश्वास नांगरे-पाटील

By admin | Updated: June 23, 2017 18:32 IST

-

आॅनलाइन लोकमत पंढरपूर दि 23 -  आळंदीपासून मी आमच्या सहकाऱ्यांसह सायकल वारी करीत पालखी विसावा व मुक्कांच्या ठिकाणांची पाहणी, बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे. ४ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच हायटेक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून एकूण सहा हजारांपेक्षा जास्त पोलीस अधिकारी, कर्मचारी असतील़ शिवाय विविध फोर्सही बंदोबस्तासाठी कार्यरत असतील, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली़ आषाढी वारीच्या निमित्ताने पोलीस बंदोबस्ताचा आढावा शुक्रवारी त्यांनी घेतला़

त्यानंतर पत्रकारांना पोलीस बंदोबस्ताबद्दल सविस्तर माहिती देताना विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, वाहतुकीस अडथळा करणारे हॉकर्से, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे़ दहशतवादी हल्ले हे वाहनांच्या माध्यमातून होत असल्याने आम्ही वाहनांची कसून तपासणी करणार आहोत़ शिवाय लॉज, धर्मशाळा, हॉटेल यांची तपासणी करण्यात येत आहे़ नदीपात्रात वाळू उपशामुळे जे खड्डे पडले आहेत, ते बुजविण्याच्या सूचना दिल्या आहेत़ ठिकठिकाणी बॅरेकेटिंग लावण्यात येणार आहे़ वारीदरम्यान महिलांची छेडछाड रोखण्यासाठी स्पेशल स्कॉड तैनात केले आहेत़ भुरट्या चोरांच्या बंदोबस्तासाठी त्यांना ओळखणारे आणि निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे़ ते सध्या पालख्यांसोबत आहेत़ यंदाच्या वारीसाठी पूर्ण तयारीनिशी पोलीस कार्यरत असतील, असे त्यांनी सांगितले़

आळंदीपासून सायकल वारी केली़ यामुळे पालखी विसावा आणि मुक्काच्या ठिकाणाची पाहणी करता आली़ तेथील नगराध्यक्ष, सरपंच आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना केल्या आहेत़ सातारा जिल्ह्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यातील पुलावरील कठडे नादुरस्त आहेत़ शिवाय तेथे अश्लिल काहीतरी लिहिले आहे़ ते पुसून कठडे दुरुस्तीबाबतची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे़

पंढरपुरात वारीदरम्यान रिक्षाचालकांकडून मोठ्या प्रमाणात भाविकांची लूट होते, मात्र यावेळी तसे होणार नाही, याची काळजी आम्ही घेतली आहे़ एकूणच आषारी वारीसाठी विविध ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची पोलीस प्रशासनाकडून सर्वोपतरी काळजी घेण्यात येणार असल्याचे विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले़ यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, तालुका पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, शहर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

असा असेल पोलीस बंदोबस्त आषाढी यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेसाठी १ पोलीस अधीक्षक, ७ अप्पर पोलीस अधीक्षक, १४ पोलीस उपअधीक्षक, ५९ पोलीस निरीक्षक, २०३ पोलीस उपनिरीक्षक, २७ महिला पोलीस उपनिरीक्षक, ३ हजार २१५ पोलीस कर्मचारी, ५५५ महिला पोलीस कर्मचारी, राखीव पोलीस दलाचे ५० कर्मचारी तसेच वाहतूक शाखेसाठी ३ पोलीस उपअधीक्षक, १० पोलीस निरीक्षक, २५ पोलीस उप-निरीक्षक, ४२० पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. घातपाताच्या घटना रोखण्यासाठी बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक तसेच पोलीसांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. याबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांचे विशेष पथक, गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी सी. सी. ट़ व्ही़ कॅमेरे व आवश्यक ठिकाणी प्रखर प्रकाशाची सोय केली जाणार आहे. तसेच शहरात तीन झोन तयार करण्यात येणार आहेत़ एस़ आऱ पी़ एफ़ च्या ३ तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. तसेच १ हजार ४०० पुरुष होमगार्ड तर २०० महिला होमगार्ड नेमण्यात येणार आहेत. वारी कालावधीत नेमलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निवासाची सोय, आरोग्याची काळजीही घेतली जाणार असल्याचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.