शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

आषाढीसाठी आम्ही सज्ज : विश्वास नांगरे-पाटील

By admin | Updated: June 23, 2017 18:32 IST

-

आॅनलाइन लोकमत पंढरपूर दि 23 -  आळंदीपासून मी आमच्या सहकाऱ्यांसह सायकल वारी करीत पालखी विसावा व मुक्कांच्या ठिकाणांची पाहणी, बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे. ४ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच हायटेक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून एकूण सहा हजारांपेक्षा जास्त पोलीस अधिकारी, कर्मचारी असतील़ शिवाय विविध फोर्सही बंदोबस्तासाठी कार्यरत असतील, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली़ आषाढी वारीच्या निमित्ताने पोलीस बंदोबस्ताचा आढावा शुक्रवारी त्यांनी घेतला़

त्यानंतर पत्रकारांना पोलीस बंदोबस्ताबद्दल सविस्तर माहिती देताना विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, वाहतुकीस अडथळा करणारे हॉकर्से, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे़ दहशतवादी हल्ले हे वाहनांच्या माध्यमातून होत असल्याने आम्ही वाहनांची कसून तपासणी करणार आहोत़ शिवाय लॉज, धर्मशाळा, हॉटेल यांची तपासणी करण्यात येत आहे़ नदीपात्रात वाळू उपशामुळे जे खड्डे पडले आहेत, ते बुजविण्याच्या सूचना दिल्या आहेत़ ठिकठिकाणी बॅरेकेटिंग लावण्यात येणार आहे़ वारीदरम्यान महिलांची छेडछाड रोखण्यासाठी स्पेशल स्कॉड तैनात केले आहेत़ भुरट्या चोरांच्या बंदोबस्तासाठी त्यांना ओळखणारे आणि निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे़ ते सध्या पालख्यांसोबत आहेत़ यंदाच्या वारीसाठी पूर्ण तयारीनिशी पोलीस कार्यरत असतील, असे त्यांनी सांगितले़

आळंदीपासून सायकल वारी केली़ यामुळे पालखी विसावा आणि मुक्काच्या ठिकाणाची पाहणी करता आली़ तेथील नगराध्यक्ष, सरपंच आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना केल्या आहेत़ सातारा जिल्ह्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यातील पुलावरील कठडे नादुरस्त आहेत़ शिवाय तेथे अश्लिल काहीतरी लिहिले आहे़ ते पुसून कठडे दुरुस्तीबाबतची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे़

पंढरपुरात वारीदरम्यान रिक्षाचालकांकडून मोठ्या प्रमाणात भाविकांची लूट होते, मात्र यावेळी तसे होणार नाही, याची काळजी आम्ही घेतली आहे़ एकूणच आषारी वारीसाठी विविध ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची पोलीस प्रशासनाकडून सर्वोपतरी काळजी घेण्यात येणार असल्याचे विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले़ यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, तालुका पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, शहर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

असा असेल पोलीस बंदोबस्त आषाढी यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेसाठी १ पोलीस अधीक्षक, ७ अप्पर पोलीस अधीक्षक, १४ पोलीस उपअधीक्षक, ५९ पोलीस निरीक्षक, २०३ पोलीस उपनिरीक्षक, २७ महिला पोलीस उपनिरीक्षक, ३ हजार २१५ पोलीस कर्मचारी, ५५५ महिला पोलीस कर्मचारी, राखीव पोलीस दलाचे ५० कर्मचारी तसेच वाहतूक शाखेसाठी ३ पोलीस उपअधीक्षक, १० पोलीस निरीक्षक, २५ पोलीस उप-निरीक्षक, ४२० पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. घातपाताच्या घटना रोखण्यासाठी बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक तसेच पोलीसांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. याबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांचे विशेष पथक, गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी सी. सी. ट़ व्ही़ कॅमेरे व आवश्यक ठिकाणी प्रखर प्रकाशाची सोय केली जाणार आहे. तसेच शहरात तीन झोन तयार करण्यात येणार आहेत़ एस़ आऱ पी़ एफ़ च्या ३ तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. तसेच १ हजार ४०० पुरुष होमगार्ड तर २०० महिला होमगार्ड नेमण्यात येणार आहेत. वारी कालावधीत नेमलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निवासाची सोय, आरोग्याची काळजीही घेतली जाणार असल्याचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.