शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

आम्ही थापा मारणारे राजकारणी नाही

By admin | Updated: July 7, 2016 08:24 IST

राजकारणातील लोक कशा थापा मारतात, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र, आम्ही थापा मारणारे राजकारणी नाही, असा टोला शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा नामोल्लेख न करता

ठाणे : राजकारणातील लोक कशा थापा मारतात, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र, आम्ही थापा मारणारे राजकारणी नाही, असा टोला शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा नामोल्लेख न करता लगावला. केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेचा समावेश न झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी ही टीका केली.कच्छ अस्मिता मंचतर्फे कच्छ पगडी कोणाशिरे, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी उद्धव ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ठाकरे म्हणाले की, आम्ही चांगल्याला चांगले म्हणतो. आम्हाला जे पटत नाही, त्याला विरोध करतो. आमचा कारभार रोखठोक आहे. शिवसेना आणि ठाणे यांचे नाते अतूट आहे. गुजराती कच्छ समाजातील व्यावसायिक ठाण्यात मोठ्या संख्येने आहेत. त्याचे संरक्षण करणे, हे शिवसेना आपले कर्तव्य मानते. ज्याप्रमाणे दुधात साखर विरघळते, त्याप्रमाणे कच्छी समाज महाराष्ट्राशी एकरूप झाला आहे. कच्छी समाजाने मला आपले समजून बोलावले, डोक्यावर पगडी घालून मान दिला, तो केवळ माझा एकट्याचा मानसन्मान नसून शिवसेनेचा आहे, असेही ठाकरे म्हणाले. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कच्छी समाजाच्या कार्यक्रमाला ठाकरे यांनी आवर्जून हजेरी लावण्याला विशेष महत्त्व आहे. ठाण्यात गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असून येथील व्यापारीवर्गाला ‘संरक्षण’ देण्याची भाषा ठाकरे यांनी करणे, हा केवळ योगायोग नाही. वेगवेगळे समाज आपल्याकडे वळवण्याकरिता भविष्यात शिवसेना व भाजपाकडून प्रयत्न होणार, असे संकेत प्राप्त होत आहेत. (प्रतिनिधी)