शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात ‘क्लस्टर’चा मार्ग क्लिष्टच

By admin | Updated: February 28, 2016 04:01 IST

सध्याचा एफएसआय दुप्पट देऊन ठाणे शहरात क्लस्टर राबवण्यास परवानगी दिल्याचे टिष्ट्वट मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मात्र, ठाण्यात ते राबवण्यास वनविभागासह

- नारायण जाधव,  ठाणे

सध्याचा एफएसआय दुप्पट देऊन ठाणे शहरात क्लस्टर राबवण्यास परवानगी दिल्याचे टिष्ट्वट मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मात्र, ठाण्यात ते राबवण्यास वनविभागासह एमआयडीसीचा सर्वांत मोठा अडथळा राहणार आहे़ याशिवाय वीज, पाणी, रस्ते, वाहतुकीसारख्या पायाभूत सुविधांची तर बोंब आहे, तसेच एकसंध ८ हजार चौरस मीटर भूखंड असेल, तरच राबवता येणार असल्याने ठाण्यात क्लस्टरचा मार्ग दिसतो तेवढा सोपा नसल्याचे चित्र आहे.वनविभागासह एमआयडीसीच्या जागेवरील अतिक्रमण केलेले बांधकाम, जर एकदा का तेथील रहिवाशाने तोडून जागा रिकामी केली की, जागेचा ताबा आपसूक त्या यंत्रणेकडे जाईल. एमआयडीसीच्या जागेवर योजना राबवण्यासाठी क्लीअर टायटलसाठी मंत्रालय, तर वनविभागाची संमती घेण्यासाठी दिल्लीचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत़ याशिवाय, यासाठी कमीतकमी एकसंध असा ८ हजार चौरस मीटर अर्थात, २ एकर भूखंड उपलब्ध झाल्यानंतरच विकास आराखड्यात बदल करण्याचे किचकट काम महापालिकेला करावे लागणार आहे, तसेच वन आणि एमआयडीसीच्या जागेच्या वापरात बदल करण्याचे कामही करावे लागणार आहे़ यासाठी नगररचना कायदा कलम ३७नुसार सामान्य नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवून, त्यावर सुनावणी घ्यावी लागणार आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, वर्षभरावर आलेल्या ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जरी नगररचना कायद्याच्या कलम १५४च्या आधारे आपले अधिकार वापरून, दुप्पट एफएसआय देऊन क्लस्टर डेव्हलपमेंटला ठाणे शहरात परवानगी दिली, तरी हे सारे सोपस्कार पालिकेच्या नगररचना खात्यास पार पाडावे लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी क्लस्टर डेव्हलपमेंट जाहीर केले, तरी त्याचा फायदा रहिवाशांना लगेच होणार, असा प्रचार राजकीय पुढाऱ्यांनी होर्डिंग्जद्वारे सुरू केला आहे, तो निव्वळ रहिवाशांची दिशाभूल करणारा आहे़ काम किचकटचकमीतकमी एकसंध असा ८ हजार चौरस मीटर अर्थात, २ एकर भूखंड उपलब्ध झाल्यानंतरच विकास आराखड्यात बदल करण्याचे किचकट काम महापालिकेला करावे लागणार आहे; तसेच वन आणि एमआयडीसीच्या जागेच्या वापरात बदल करण्याचे कामही करावे लागणार आहे़