शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

विक्रमगडातील इमूपालन बंद होण्याच्या मार्गावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 03:46 IST

शेती पूरक व्यवसाय म्हणून गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन सुरू केलेला इमू पालन व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

राहुल वाडेकर,

विक्रमगड- शेती पूरक व्यवसाय म्हणून गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन सुरू केलेला इमू पालन व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. पालनाचा वाढता खर्च व इमूची इंडी आणि मांस याला भाव आणि बाजारपेठ नसल्यामुळे हा व्यवसाय करणारे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेले आहेत. इमू पालन करणा-या शेतकऱ्यांना इमू पक्षांना रोजचे खाद्य पुरविणे शक्य होत नसल्याने इमू मृत्यूमुखी पडत आहेत़ गोदामामध्ये पुरेसे उपलब्ध खाद्य नाही, खाद्य आणण्यासाठी शेतक-यांजवळ पुरसा पैसा नाही़ अंडी विकत घेण्यावरही मर्यादा पडल्या आहेत़ तसेच विकत घेतलेल्या अंडयाचे पैसे मिळत नाहीत,त्यामुळे अंडीही गोदामध्ये पडुन राहात आहेत़ या व्यवसायाकरीता घेतलेल्या कर्जाचा डोंगर त्यावर आकारले जाणारे व्याज व हया व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी अशा दुहेरी संकटात इमू पालन करणारा शेतकरीवर्ग सापडल्यामुळे हा व्यवसाय बंद झाला आहे़विक्रमगड तालुक्यातील मौजे उटावली-चौधरीपाडा येथील शेतकरी निकुळे यांनी त्यावेळेस आपल्या मालकीच्या जागेमध्ये गेल्या ७ वर्षापूर्वी इमूपालन सुरु केले होते,परंतु हया व्यवसायाला बाजारात शुन्य किंमत असल्याने त्यांनी या व्यवसायासाठी घेतलेले कर्ज फेडणेही मुश्किल झाले आहे. त्यांचेजवळ ५७ पक्षी होते,त्यातील काही पक्षी खादयाविना मृत्यू पावले आहेत़ तर काही ओळखीच्या माणसांना त्यांनी विनामोबदला दिले़ त्यानंतर त्यांच्याजवळ १६पक्षी शिल्लक होते ते जगविण्यासाठी त्यांना रोजचा २०० रुपये हुन अधिक खर्च करावा लागत होता़ पक्षांना खादय दिले नाही तर ते मरतात़ या व्यवसायाकरीता घेतलेल कर्ज त्यांच्यावर आहे़ आतापर्यत १० लाख खर्च करुन मुद्दलही सुटले नाही. त्यामुळे व्यवसाय बंद केला तरी त्यांना त्यासाठी घेतलेले कर्ज फेडावे लागते आहे असेच अनेक विक्रमगड तालुक्यातील अनेक शेतक-यांनी हा व्यवसाय सुरु केला होता. ते सगळेच अडचणीत आहेत़ शेतीपूरक व्यवसाय म्हणून इमू पालन व्यवसायासाठी सहकारी बँकेकडून शेतक-यांना कर्जे देण्यांत आली होती त्यामुळे अनेकांनी उत्साहाने हा व्यवसाय सुरू केला. परंतु अंडी विकत घेतली जात नाहीत विकली गेली तर त्याचे पैसे मिळत नाहीत़ त्याच्या मांसालाही मागणी नाही. त्यात खाद्य महागलेले अशा स्थितीत हा व्यवसाय बंद करण्यावाचून शेतक-यांपुढे अन्य पर्यायच उरलेला नव्हता.इमू हा मूळचा आॅस्ट्ेलियन पक्षी आहे़ भारतामध्ये प्रथम १९९६ पासुन आंध्र प्रदेशात इमू पालनास सुरुवात झाली़ इमू पक्ष्यांच्या शरीराच्या सर्व अवयवांपासुन उत्पन्न मिळते. एका वर्षात एका इमूपासुन २५ ते ४० अंडी मिळतात़ इमूचे मांस ९८ टक्के कॉलेस्ट्रॉल फ्री असते़ पूर्ण वाढ झालेल्या एका इमू पासुन ३ ते ५ लिटर कच्चे तेल मिळते़ इमूच्या एका अंडयाला प्रत्येकी १५०० ते १७०० रुपये भाव मिळत होता,तर त्याच्यापासून मिळणा-या तेलाला प्रती लिटर ३००० ते ४००० रुपये बाजारभाव मिळतो याचा अर्थ या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्याचे जे गोंडस चित्र शेतकऱ्यांपुढे मांडले गेले ते बनावट असावे व केवळ इमू विक्रेत्यांचा लाभ घडविण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जबाजारी करून हा व्यवसाय करण्यास भरीस पाडले गेल्याची चर्चा आहे.>व्यावसायिकांची फसवणूक केली की बाजार घसरला?प्रारंभी इमूची तीन महिन्यांची जोडी प्रत्येकी १८ हजार रुपयांना होती मात्र,त्यानंतर जोडीचा बाजारभाव प्रयेकी २००० रुपये एवढा झालेला होता़. इमूच्या अंडयास प्रारंभी ५०० रुपये एवढाच बाजारभाव मिळत होता. आता तो शून्य आहे. एका इमूला दिवसाला १६.५० भावाचे १ किलो खाद्य लागते़ इमू पासून फायदा मिळु शकतो असे त्यावेळेस शेतक-यांना सांगण्योंत आले होते त्यानुसार हा व्यवसाय शेतकऱ्यांनी सुरुवात केली मात्र अशा कोणत्याही प्रकारचा फायदा शेतकऱ्यांना न झाल्याने हा व्यवसाय संकटात सापडलेला आहे़ त्यापासुन नफा होण्याएैवजी शेतकरी तोटयात चाललेले आहे़ या व्यवसायसाकरीता घेतलेले कर्ज अजुनही डोक्यावर आहे़ त्यामुळे आता हा व्यवसाय जवळ जवळ बंद झालेला आहे़