शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

लाटेत ओंडकेसुद्धा तरंगतात!

By admin | Updated: June 20, 2016 05:29 IST

लाटा येतात आणि जातात. लाटेत ओंडकेसुद्धा तरंगतात, पण लाट ओसरल्यानंतर गोटेही उघडे पडतात, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मोदीलाटेचा समाचार घेतला.

‘सिंह’ म्हणवून घेणारे तेव्हा बिळात लपलेमुंबई : लाटा येतात आणि जातात. लाटेत ओंडकेसुद्धा तरंगतात, पण लाट ओसरल्यानंतर गोटेही उघडे पडतात, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मोदीलाटेचा समाचार घेतला. सत्तेसाठी आम्ही कधी लाचार झालो नाही की कधी वेडीवाकडी तडजोड केली नाही. स्वाभिमानाने युती करू, पण त्यासाठी लाचार होऊन तुमच्या मागे धावणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजपाला दिला. शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्र (एनएसई) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा ओघवता आढावा घेत उद्धव यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, आपलेच विरोधक आपल्या अंगावर आले, पण शिवसेना मागे हटली नाही. शिवसेनेवर बंदी आणण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले. गुंडांची टोळी, प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेला हिणवले गेले; पण हेच गुंड प्रसंगी धाऊन आले. बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर आज स्वत:ला ‘सिंह’ म्हणवून घेणारे तेव्हा बिळात लपून बसले होते. पण बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांच्या पाठीशी शिवसेनाप्रमुख खंबीरपणे उभे राहिले. मुंबईतील दंगलीच्या काळातही शिवसेनेचे वाघच हिंदंूच्या रक्षणासाठी धावून आले, याची आठवणही त्यांनी करून दिली.सध्या भाजपा-शिवसेनेत सुरू असलेली ‘तू तू मैं मैं’ आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. एनएसईच्या प्रांगणात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)जमिनीवर रहा; गडकरींचा मंत्र्यांना सल्लापुणे : मंत्रिपदात काही अर्थ नाही. पद गेले की सगळे संपते; कार्यकर्ता कधी संपत नाही. त्यामुळे पाय जमिनीवर ठेवा, असा वडीलकीचा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यासपीठावरील मंत्र्यांकडे बघत दिल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये गडकरींच्या या ‘लेकी बोले सुने लागे’ उक्तीची जोरदार चर्चा रंगली.भाजपाच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीचा समारोप रविवारी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बालगंधर्वमध्ये झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, हंसराज अहीर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ मंत्री, व वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. खुमासदार शैलीत गडकरी म्हणाले, सत्ता नसली की व्यवस्थित असते. सत्ता आली की कलह सुरू होतात. तसे करू नका, ध्येय लक्षात ठेवा. आपला पक्ष वेगळा आहे. यात कधीही कोणाच्या मनासारखे होत नाही; माझ्याही झाले नाही, असे म्हणताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकल्यामुळे हशा पिकला. (प्रतिनिधी)खसखस मंत्री आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांना कसे सांभाळावे, याचा किस्सा सांगत असताना गडकरी यांनी ‘काय, बरोबर आहे ना,’ असे थेट दानवे यांना विचारले, तेव्हाही सभागृहात खसखस पिकली.अच्छे दिन आले की येणार? केंद्रातील मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘देश बदल रहा हैं’ अशी जाहिरातबाजी केली जात आहे. त्याचा उल्लेख करीत उद्धव म्हणाले, की देश बदल रहा है म्हणता, पण परिस्थिती कुठे बदली? अच्छे दिन आले की येणार आहेत, हे माहीत नाही. महागाईत सर्वसामान्य जनता पिचून निघाली आहे. तेव्हा आधी महागाई नियंत्रणात आणा, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले.एकहाती सत्ता आणण्याची धमक : मुंबईसह नऊ महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांत स्वाभिमानाने युती होणार असेल तरच करू अन्यथा एकहाती सत्ता आणण्याची धमक आमच्यात आहे. तेव्हा स्वबळावर लढण्यासाठी शिवसैनिकांनी तयार राहावे, असे आवाहन करीत उद्धव यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.