शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लाटेत ओंडकेसुद्धा तरंगतात!

By admin | Updated: June 20, 2016 05:29 IST

लाटा येतात आणि जातात. लाटेत ओंडकेसुद्धा तरंगतात, पण लाट ओसरल्यानंतर गोटेही उघडे पडतात, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मोदीलाटेचा समाचार घेतला.

‘सिंह’ म्हणवून घेणारे तेव्हा बिळात लपलेमुंबई : लाटा येतात आणि जातात. लाटेत ओंडकेसुद्धा तरंगतात, पण लाट ओसरल्यानंतर गोटेही उघडे पडतात, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मोदीलाटेचा समाचार घेतला. सत्तेसाठी आम्ही कधी लाचार झालो नाही की कधी वेडीवाकडी तडजोड केली नाही. स्वाभिमानाने युती करू, पण त्यासाठी लाचार होऊन तुमच्या मागे धावणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजपाला दिला. शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्र (एनएसई) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा ओघवता आढावा घेत उद्धव यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, आपलेच विरोधक आपल्या अंगावर आले, पण शिवसेना मागे हटली नाही. शिवसेनेवर बंदी आणण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले. गुंडांची टोळी, प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेला हिणवले गेले; पण हेच गुंड प्रसंगी धाऊन आले. बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर आज स्वत:ला ‘सिंह’ म्हणवून घेणारे तेव्हा बिळात लपून बसले होते. पण बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांच्या पाठीशी शिवसेनाप्रमुख खंबीरपणे उभे राहिले. मुंबईतील दंगलीच्या काळातही शिवसेनेचे वाघच हिंदंूच्या रक्षणासाठी धावून आले, याची आठवणही त्यांनी करून दिली.सध्या भाजपा-शिवसेनेत सुरू असलेली ‘तू तू मैं मैं’ आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. एनएसईच्या प्रांगणात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)जमिनीवर रहा; गडकरींचा मंत्र्यांना सल्लापुणे : मंत्रिपदात काही अर्थ नाही. पद गेले की सगळे संपते; कार्यकर्ता कधी संपत नाही. त्यामुळे पाय जमिनीवर ठेवा, असा वडीलकीचा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यासपीठावरील मंत्र्यांकडे बघत दिल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये गडकरींच्या या ‘लेकी बोले सुने लागे’ उक्तीची जोरदार चर्चा रंगली.भाजपाच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीचा समारोप रविवारी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बालगंधर्वमध्ये झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, हंसराज अहीर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ मंत्री, व वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. खुमासदार शैलीत गडकरी म्हणाले, सत्ता नसली की व्यवस्थित असते. सत्ता आली की कलह सुरू होतात. तसे करू नका, ध्येय लक्षात ठेवा. आपला पक्ष वेगळा आहे. यात कधीही कोणाच्या मनासारखे होत नाही; माझ्याही झाले नाही, असे म्हणताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकल्यामुळे हशा पिकला. (प्रतिनिधी)खसखस मंत्री आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांना कसे सांभाळावे, याचा किस्सा सांगत असताना गडकरी यांनी ‘काय, बरोबर आहे ना,’ असे थेट दानवे यांना विचारले, तेव्हाही सभागृहात खसखस पिकली.अच्छे दिन आले की येणार? केंद्रातील मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘देश बदल रहा हैं’ अशी जाहिरातबाजी केली जात आहे. त्याचा उल्लेख करीत उद्धव म्हणाले, की देश बदल रहा है म्हणता, पण परिस्थिती कुठे बदली? अच्छे दिन आले की येणार आहेत, हे माहीत नाही. महागाईत सर्वसामान्य जनता पिचून निघाली आहे. तेव्हा आधी महागाई नियंत्रणात आणा, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले.एकहाती सत्ता आणण्याची धमक : मुंबईसह नऊ महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांत स्वाभिमानाने युती होणार असेल तरच करू अन्यथा एकहाती सत्ता आणण्याची धमक आमच्यात आहे. तेव्हा स्वबळावर लढण्यासाठी शिवसैनिकांनी तयार राहावे, असे आवाहन करीत उद्धव यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.