शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

उष्म्याची लाट किंचित ओसरली!

By admin | Updated: April 18, 2016 01:31 IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जाणवणारी उष्णतेची लाट रविवारी काही प्रमाणात ओसरली असून अनेक ठिकाणच्या कमाल तापमानात किंचित घट झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात जाणवणारी उष्णतेची लाट रविवारी काही प्रमाणात ओसरली असून अनेक ठिकाणच्या कमाल तापमानात किंचित घट झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले असून सर्वात कमी किमान तापमान पुण्यात १८़२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.देशात बहुतांश ठिकाणी उन्हाचा तडका वाढला असून हिमाचल प्रदेश, झारखंड तसेच दिल्ली, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश, हरियाना, तेलंगणा येथील अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आहे़ दोन दिवसांत उत्तर पश्चिम भारतातील काही ठिकाणी दिवसांच्या तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता असून मध्य भारत, पश्चिम भारत व अन्य ठिकाणच्या तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे़राज्यातील प्रमुख शहरांचे कमाल तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.७, जळगाव ४२.३, कोल्हापूर ३८.४, महाबळेश्वर ३४.१, मालेगाव ४२.८, नाशिक ३६.६, सांगली ४०़१, सातारा ३९़६, सोलापूर ४२़५, मुंबई ३३, अलिबाग ३१.४, रत्नागिरी ३१.९, डहाणू ३४.१, उस्मानाबाद ४२़८, औरंगाबाद ४०.२, परभणी ४३.४, नांदेड ४४़५,अकोला ४२़२, अमरावती ४१.४, बुलडाणा ३८.६, चंद्रपूर ४५, गोंदिया ४१.६, नागपूर ४४.२, वर्धा ४४.१, यवतमाळ ४३. (प्रतिनिधी) विदर्भात उष्माघाताचेचार बळीयवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात तीन दिवसांत उष्माघाताने दोघांचा बळी घेतला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथील पेपर मिल भागात ७५ वर्षीय वृद्धाचा आणि अमरावतीतील इर्विन चौकात भिकारी वृद्धेचा मृतदेह रविवारी सायंकाळी आढळून आला. त्यांचाही मृत्यु उष्माघाताने झाल्याचा संशय आहे. दुर्गा जाधव (१७) आणि कैलास गणपत ढगे (४८) अशी पुसद तालुक्यात उष्माघाताने मृत्यु झालेल्यांची नावे आहेत. बल्लारपूर येथील मृताची ओळख पटली नसून तो शनिवारी दुपारी रस्त्याने जात असताना खाली कोसळला आणि गतप्राण झाला. तो देहरादूनचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.