शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

पालिका उद्यानांमध्ये पाण्याची उधळपट्टी

By admin | Updated: January 7, 2017 02:46 IST

नागरिकांच्या पाणी वापरावर निर्बंध घालणारे पालिका प्रशासन स्वत: पाण्याची उधळपट्टी करत आहे.

नवी मुंबई : नागरिकांच्या पाणी वापरावर निर्बंध घालणारे पालिका प्रशासन स्वत: पाण्याची उधळपट्टी करत आहे. शहरातील उद्यानांमध्ये रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ठेकेदारांच्या या निष्काळजीपणाकडे पालिका प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तुर्भे इंदिरानगरमध्ये महापालिकेने २००९मध्ये शांताबाई सुतार उद्यान उभारले आहे. झोपडपट्टीमधील नागरिकांसाठी हे एकमेव उद्यान आहे; पण त्याची देखभाल करण्याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. उद्यानामधील वृक्ष व हिरवळ जगविण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. ठेकेदार पाइप लावून उद्यानामध्ये सोडून देत आहे. यामुळे हजारो लिटर पाणी उतारावरून खाली ओढ्यात जात आहे. सारसोळे सेक्टर ६मधील उद्यानामध्येही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असून, येथेही हजारो लिटर पाणी वाया जात आहे. शहरामध्ये दुभाजक वगळून इतर बहुतांश उद्यानांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. पालिकाआयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईमधील नागरिकांना प्रतिव्यक्ती १३० लिटर पाणी याप्रमाणे वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. एखाद्या सोसायटीमध्ये अतिरिक्त पाण्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे; पण उद्यानांमध्ये पाण्याचा अपव्यय होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेने स्वयंशिस्तीचे पालन करावे. जे ठेकेदार पाण्याची उधळपट्टी करतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)उद्यानामध्ये वृक्ष व हिरवळीसाठी ठिबक सिंचनाचा उपयोग करणे आवश्यक आहे. पाइपचा वापर केल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना दिल्या जात असून, प्रशासन स्वत: मात्र ठेकेदारांच्या उधळपट्टीकडे दुर्लक्ष करत आहे. - महेश कोठीवाले, शाखाप्रमुख, शिवसेना