शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

पालिका उद्यानांमध्ये पाण्याची उधळपट्टी

By admin | Updated: January 7, 2017 02:46 IST

नागरिकांच्या पाणी वापरावर निर्बंध घालणारे पालिका प्रशासन स्वत: पाण्याची उधळपट्टी करत आहे.

नवी मुंबई : नागरिकांच्या पाणी वापरावर निर्बंध घालणारे पालिका प्रशासन स्वत: पाण्याची उधळपट्टी करत आहे. शहरातील उद्यानांमध्ये रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ठेकेदारांच्या या निष्काळजीपणाकडे पालिका प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तुर्भे इंदिरानगरमध्ये महापालिकेने २००९मध्ये शांताबाई सुतार उद्यान उभारले आहे. झोपडपट्टीमधील नागरिकांसाठी हे एकमेव उद्यान आहे; पण त्याची देखभाल करण्याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. उद्यानामधील वृक्ष व हिरवळ जगविण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. ठेकेदार पाइप लावून उद्यानामध्ये सोडून देत आहे. यामुळे हजारो लिटर पाणी उतारावरून खाली ओढ्यात जात आहे. सारसोळे सेक्टर ६मधील उद्यानामध्येही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असून, येथेही हजारो लिटर पाणी वाया जात आहे. शहरामध्ये दुभाजक वगळून इतर बहुतांश उद्यानांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. पालिकाआयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईमधील नागरिकांना प्रतिव्यक्ती १३० लिटर पाणी याप्रमाणे वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. एखाद्या सोसायटीमध्ये अतिरिक्त पाण्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे; पण उद्यानांमध्ये पाण्याचा अपव्यय होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेने स्वयंशिस्तीचे पालन करावे. जे ठेकेदार पाण्याची उधळपट्टी करतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)उद्यानामध्ये वृक्ष व हिरवळीसाठी ठिबक सिंचनाचा उपयोग करणे आवश्यक आहे. पाइपचा वापर केल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना दिल्या जात असून, प्रशासन स्वत: मात्र ठेकेदारांच्या उधळपट्टीकडे दुर्लक्ष करत आहे. - महेश कोठीवाले, शाखाप्रमुख, शिवसेना