शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पालिका उद्यानांमध्ये पाण्याची उधळपट्टी

By admin | Updated: January 7, 2017 02:46 IST

नागरिकांच्या पाणी वापरावर निर्बंध घालणारे पालिका प्रशासन स्वत: पाण्याची उधळपट्टी करत आहे.

नवी मुंबई : नागरिकांच्या पाणी वापरावर निर्बंध घालणारे पालिका प्रशासन स्वत: पाण्याची उधळपट्टी करत आहे. शहरातील उद्यानांमध्ये रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ठेकेदारांच्या या निष्काळजीपणाकडे पालिका प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तुर्भे इंदिरानगरमध्ये महापालिकेने २००९मध्ये शांताबाई सुतार उद्यान उभारले आहे. झोपडपट्टीमधील नागरिकांसाठी हे एकमेव उद्यान आहे; पण त्याची देखभाल करण्याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. उद्यानामधील वृक्ष व हिरवळ जगविण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. ठेकेदार पाइप लावून उद्यानामध्ये सोडून देत आहे. यामुळे हजारो लिटर पाणी उतारावरून खाली ओढ्यात जात आहे. सारसोळे सेक्टर ६मधील उद्यानामध्येही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असून, येथेही हजारो लिटर पाणी वाया जात आहे. शहरामध्ये दुभाजक वगळून इतर बहुतांश उद्यानांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. पालिकाआयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईमधील नागरिकांना प्रतिव्यक्ती १३० लिटर पाणी याप्रमाणे वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. एखाद्या सोसायटीमध्ये अतिरिक्त पाण्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे; पण उद्यानांमध्ये पाण्याचा अपव्यय होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेने स्वयंशिस्तीचे पालन करावे. जे ठेकेदार पाण्याची उधळपट्टी करतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)उद्यानामध्ये वृक्ष व हिरवळीसाठी ठिबक सिंचनाचा उपयोग करणे आवश्यक आहे. पाइपचा वापर केल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना दिल्या जात असून, प्रशासन स्वत: मात्र ठेकेदारांच्या उधळपट्टीकडे दुर्लक्ष करत आहे. - महेश कोठीवाले, शाखाप्रमुख, शिवसेना