शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

पुढच्या आठवड्यात पाणीकपात रद्द होणार?

By admin | Updated: July 13, 2016 20:06 IST

गेले वर्षभर पाणीकपातीची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांसाठी अखेर खूशखबर आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 13 - गेले वर्षभर पाणीकपातीची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांसाठी अखेर खूशखबर आहे. मुसळधार पावसामुळे तलावांतील पाण्याची पातळी दररोज वाढत आहे़ गतवर्षीच्या तुलनेही तलावांमध्ये दुप्पट जलसाठा आहे़ त्यामुळे प्रशासन पुढच्या आठवड्यात पाणीकपात मागे घेण्याचे संकेत आहेत़ अपुऱ्या पावसामुळे आॅगस्ट २०१५ पासून मुंबईत २० टक्के पाणीकपात आहे़ यावर्षी जून महिना कोरडा गेल्यामुळे पाण्याचे टेन्शन वाढले होते़ मात्र जुलै महिन्यात मुसळधार पावसाने मुंबईवर कृपादृष्टी दाखविली आहे़ त्यामुळे जुलै महिन्यातील पंधरवडा पूर्ण होण्याआधीच तलावांमध्ये तब्बल पाच लाख दशलक्ष लीटरहून अधिक जलसाठा तलावांमध्ये जमा झाला आहे़ तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने काही तलावं लवकरच भरुन वाहण्याची चिन्हे आहेत़ त्यामुळे पाणीकपात मागे घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे़ भाजपाचे दिलीप पटेल यांनी स्थायी समितीच्या बैठकीतून पाणीकपात मागे घेण्याची मागणी केली़ त्यानुसार तलावांमधील पाण्याच्या पातळीचा आढावा घेऊन स्थायी समितीच्या पुढच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉ़ संजय मुखर्जी यांनी दिले.

जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये

तलाव-          कमाल     किमान  आजची स्थिती  आजचा पाऊस(मि़मी़)मोडक सागर     १६३़१५    १४३़२६      १५४़९९             ७२़६० तानसा            १२८़६३    ११८़८७       १२४़८५            २३़८०विहार                ८०़१२       ७३़९२         ७७़२५            २७़२०तुळशी             १३९़१७    १३१़०७       १३८़८९              १४़०० अप्पर वैतरणा   ६०३़५१५९५़४४         ५९८़१८             १०८ भातसा             १४२़०७     १०४़९०        १२५़२७            २३मध्य वैतरणा       २८५़००  २२०़००       २६४़७०           ७४़९० एकूण          २०१६ -६३९६९८   दशलक्ष लीटर २०१५- २९०३९६ दशलक्ष लीटर * मुंबईला दररोज ३७५०दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़* गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून पाणीकपात सुरु असल्याने ३२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत आहे़* मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़