शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या आठवड्यात पाणीकपात रद्द होणार?

By admin | Updated: July 13, 2016 20:06 IST

गेले वर्षभर पाणीकपातीची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांसाठी अखेर खूशखबर आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 13 - गेले वर्षभर पाणीकपातीची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांसाठी अखेर खूशखबर आहे. मुसळधार पावसामुळे तलावांतील पाण्याची पातळी दररोज वाढत आहे़ गतवर्षीच्या तुलनेही तलावांमध्ये दुप्पट जलसाठा आहे़ त्यामुळे प्रशासन पुढच्या आठवड्यात पाणीकपात मागे घेण्याचे संकेत आहेत़ अपुऱ्या पावसामुळे आॅगस्ट २०१५ पासून मुंबईत २० टक्के पाणीकपात आहे़ यावर्षी जून महिना कोरडा गेल्यामुळे पाण्याचे टेन्शन वाढले होते़ मात्र जुलै महिन्यात मुसळधार पावसाने मुंबईवर कृपादृष्टी दाखविली आहे़ त्यामुळे जुलै महिन्यातील पंधरवडा पूर्ण होण्याआधीच तलावांमध्ये तब्बल पाच लाख दशलक्ष लीटरहून अधिक जलसाठा तलावांमध्ये जमा झाला आहे़ तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने काही तलावं लवकरच भरुन वाहण्याची चिन्हे आहेत़ त्यामुळे पाणीकपात मागे घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे़ भाजपाचे दिलीप पटेल यांनी स्थायी समितीच्या बैठकीतून पाणीकपात मागे घेण्याची मागणी केली़ त्यानुसार तलावांमधील पाण्याच्या पातळीचा आढावा घेऊन स्थायी समितीच्या पुढच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉ़ संजय मुखर्जी यांनी दिले.

जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये

तलाव-          कमाल     किमान  आजची स्थिती  आजचा पाऊस(मि़मी़)मोडक सागर     १६३़१५    १४३़२६      १५४़९९             ७२़६० तानसा            १२८़६३    ११८़८७       १२४़८५            २३़८०विहार                ८०़१२       ७३़९२         ७७़२५            २७़२०तुळशी             १३९़१७    १३१़०७       १३८़८९              १४़०० अप्पर वैतरणा   ६०३़५१५९५़४४         ५९८़१८             १०८ भातसा             १४२़०७     १०४़९०        १२५़२७            २३मध्य वैतरणा       २८५़००  २२०़००       २६४़७०           ७४़९० एकूण          २०१६ -६३९६९८   दशलक्ष लीटर २०१५- २९०३९६ दशलक्ष लीटर * मुंबईला दररोज ३७५०दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़* गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून पाणीकपात सुरु असल्याने ३२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत आहे़* मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़