शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

मद्यनिर्मिती उद्योगाची ५० टक्के पाणीकपात करा

By admin | Updated: April 23, 2016 04:27 IST

राज्यभरात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मानवतावादी दृष्टिकोन ठेवून मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात

औरंगाबाद : राज्यभरात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मानवतावादी दृष्टिकोन ठेवून मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात १० मेपर्यंत किमान ५० टक्के कपात करावी, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला दिले. तथापि, पाणीकपातीचा निर्णय घेण्यापूर्वी या उद्योगांना विश्वासात घेण्याची सूचनाही न्यायालयाने केली.कोपरगाव येथील संजय भास्करराव काळे यांनी अ‍ॅड. सतीश बी. तळेकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी खंडपीठापुढे सुनावणी झाली. सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी शासनातर्फे शपथपत्र सादर केले. मद्यनिर्मिती कारखान्यांनी पुढील ४० दिवसांत टप्प्याटप्प्याने १५ टक्के म्हणजे एकूण ४५ टक्के कपात करण्याची तयारी दर्शविली असल्याचे खंडपीठास सांगितले. मात्र दररोज पाण्याविना माणसे आणि पशुपक्षी यांचा मृत्यू होत आहे. शासनाने केवळ महसुलाचा विचार करू नये, तर अशा बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी मद्यनिर्मिती कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात सुरुवातीला ५० टक्के कपात करून त्यात १० जूनपर्यंत उत्तरोत्तर वाढ करावी. प्रशासनाने संवाद साधून कारखानदारांना राजी करावे, अशी अपेक्षा न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. व्ही.के. जाधव यांच्या खंडपीठाने व्यक्त केली. यावर गिरासे यांनी वेळ मागितला असता खंडपीठाने यासंबंधीच्या जनहित याचिकेची सुनावणी सोमवारी ठेवली आहे.गिरासे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, जनहित याचिका दाखल होण्यापूर्वी शासनाने अन्य उद्योग तसेच मद्यनिर्मिती उद्योगांची १० टक्के पाणीकपात केली होती. शिवाय अन्य उद्योगांची आणखी १० टक्के तर मद्यनिर्मिती उद्योगांची आणखी २० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. सर्वांचीच जबाबदारी‘भारत माझा देश आहे. सर्व भारतीय माझे बांधव आहेत’, अशी शपथ राज्यातील शाळांमध्ये दररोज विद्यार्थी घेतात. कठीण परिस्थितीत आपल्या बांधवांना वाचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, याची जाणीव खंडपीठाने सर्वांना करून दिली. (प्रतिनिधी)