शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

मद्यनिर्मिती उद्योगाची ५० टक्के पाणीकपात करा

By admin | Updated: April 23, 2016 04:27 IST

राज्यभरात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मानवतावादी दृष्टिकोन ठेवून मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात

औरंगाबाद : राज्यभरात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मानवतावादी दृष्टिकोन ठेवून मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात १० मेपर्यंत किमान ५० टक्के कपात करावी, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला दिले. तथापि, पाणीकपातीचा निर्णय घेण्यापूर्वी या उद्योगांना विश्वासात घेण्याची सूचनाही न्यायालयाने केली.कोपरगाव येथील संजय भास्करराव काळे यांनी अ‍ॅड. सतीश बी. तळेकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी खंडपीठापुढे सुनावणी झाली. सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी शासनातर्फे शपथपत्र सादर केले. मद्यनिर्मिती कारखान्यांनी पुढील ४० दिवसांत टप्प्याटप्प्याने १५ टक्के म्हणजे एकूण ४५ टक्के कपात करण्याची तयारी दर्शविली असल्याचे खंडपीठास सांगितले. मात्र दररोज पाण्याविना माणसे आणि पशुपक्षी यांचा मृत्यू होत आहे. शासनाने केवळ महसुलाचा विचार करू नये, तर अशा बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी मद्यनिर्मिती कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात सुरुवातीला ५० टक्के कपात करून त्यात १० जूनपर्यंत उत्तरोत्तर वाढ करावी. प्रशासनाने संवाद साधून कारखानदारांना राजी करावे, अशी अपेक्षा न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. व्ही.के. जाधव यांच्या खंडपीठाने व्यक्त केली. यावर गिरासे यांनी वेळ मागितला असता खंडपीठाने यासंबंधीच्या जनहित याचिकेची सुनावणी सोमवारी ठेवली आहे.गिरासे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, जनहित याचिका दाखल होण्यापूर्वी शासनाने अन्य उद्योग तसेच मद्यनिर्मिती उद्योगांची १० टक्के पाणीकपात केली होती. शिवाय अन्य उद्योगांची आणखी १० टक्के तर मद्यनिर्मिती उद्योगांची आणखी २० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. सर्वांचीच जबाबदारी‘भारत माझा देश आहे. सर्व भारतीय माझे बांधव आहेत’, अशी शपथ राज्यातील शाळांमध्ये दररोज विद्यार्थी घेतात. कठीण परिस्थितीत आपल्या बांधवांना वाचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, याची जाणीव खंडपीठाने सर्वांना करून दिली. (प्रतिनिधी)