शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

२५६ पैकी केवळ १६ गावांत जलयुक्तची कामे

By admin | Updated: June 13, 2016 23:23 IST

बीड : जलयुक्त अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यात सर्वाधिक गावांची निवड बीड जिल्ह्यातून करण्यात आली आहे. २५६ गावांकरिता प्रशासकीय स्तरावर मंजुरी मिळूनदेखील केवळ

दुसरा टप्पा : आराखडा तयार असूनही मिळेना गती; निविदा प्रक्रिया धिम्या गतीनेबीड : जलयुक्त अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यात सर्वाधिक गावांची निवड बीड जिल्ह्यातून करण्यात आली आहे. २५६ गावांकरिता प्रशासकीय स्तरावर मंजुरी मिळूनदेखील केवळ १६ गावांत आतापर्यंत ४३ कामे पूर्ण झाली आहेत.जलसंधारणाच्या दृष्टीने मार्च अखेरपर्यंत पहिला टप्पा आटोपून मेपासून दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरुवात होणे गरजेचे होते; मात्र निविदेप्रमाणे कामे होणार असल्याने प्रक्रियेत अडसर निर्माण झाला. अधिकाऱ्यांनीही याकामी उदासीनता दाखविल्यामुळे अनेक गावांत कामाचा प्रारंभही झालेला नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी निम्यापेक्षा अधिक कामे पूर्ण करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी आढावा बैठकीदरम्यान केला होता; मात्र बीड, अंबाजोगाई, आष्टी, परळी वगळता इतर तालुक्यांमध्ये या अभियानास अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.कृषी विभागांतर्गत यंदा प्रथमच निविदेप्रमाणे कामे केली जात आहेत. खोल सलग समतल चर बांधबंदिस्ती, नियमित सलग समतल चर, मातीनाला बांध दुरुस्ती, सिमेंट नाला बांध दुरुस्ती यासारख्या कामांवर भर देण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्याकरीता निवडण्यात आलेल्या सर्व गावांमध्ये ग्रामसभा घेऊन कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होऊनदेखील कामांना गती मिळालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचा कितपत फायदा मिळेल, याबद्दल शंकाच वाटते. (प्रतिनिधी)अशी आहे जलयुक्त कामांची स्थिती२५६ गावांमध्ये एकूण ४३ कामे सुरू आहेत. यापैकी केवळ बीड तालुक्यातीलच २ कामे पूर्ण झाली असून, ४१ कामे प्रगतिपथावर असल्याचा अहवाल कृषी विभागाकडे सादर करण्यात आला आहे. बीड तालुक्यात पालवण, ताडसोन्ना, नवगण राजुरी परिसरात दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली असून, त्याचा परिणाम जलसिंचनाच्या दृष्टीने समोर येत आहे.