शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

टँकरने पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: June 29, 2016 02:27 IST

जिल्ह्यामध्ये समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने ४९ पैकी ४३ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे बंद करण्यात आले

आविष्कार देसाई,

जिल्ह्यामध्ये समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने ४९ पैकी ४३ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे बंद करण्यात आले आहे. पेण तालुक्यात सहा ठिकाणी अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तोही लवकरच बंद करण्यात येणार आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. विंधण विहिरींसाठी सुमारे ५० लाख खर्च करण्यात येत आहे.गेल्या वर्षी अपेक्षापेक्षा कमी पाऊस झाला होता. त्यामुळे मध्यम, तसेच लघु धरणांमध्ये पाणीसाठ्याचे प्रमाण कमी होते. उन्हाळा कडक असल्याने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पाण्याचे संकट जिल्ह्यातील काही भागांमध्ये ओढवले होते. पाण्याची टंचाई जाणवत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागायची. लहान मुले, महिलांसह वयोवृध्दही पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र पहायला मिळाले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे सात कोटी ८८ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला होता. त्यामध्ये २९२ गावे आणि एक हजार ९२६ वाड्या टंचाईग्रस्त म्हणून घोषित केल्या होत्या. त्या माध्यमातून टंचाईच्या ठिकाणी पिण्याचे पाणी टँकर, बैलगाडीने पोचविण्याचे नियोजन करण्यात आले होते.उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने पाण्याच्या टंचाईने चांगलेच डोके वर काढले होते. जून महिना संपत आला, तरी काही पेण, महाड आणि रोहे तालुक्यांमध्ये अद्यापही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाने समाधानकारक बरसण्यास सुरुवात केल्याने अलिबाग, मुरुड आणि सुधागड-पाली तालुक्यातील प्रत्येकी एक टँकर बंद करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील आठ, कर्जत ५, पोलादपूरमध्ये ६ टँकरने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पेण तालुक्यामध्ये एकूण १२ टँकर सुरु होते. पैकी सहा टँकर बंद केले आहेत. उरण, पनवेल, खालापूर, तळा, श्रीवर्धन, माणगाव तालुक्यातीलही प्रत्येकी दोन असे एकूण ४३ टँकर बंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यावर सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पावसाची मेहरबानी आणखी झाल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून आसपासच्या पाण्याच्या स्रोतांमधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत मिळणार आहे.>पावसामुळे नदी, नाले भरलेरायगड जिल्ह्यात पावसाचे दमदार बरसणे सुरूच आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये सरासरी ६२.०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक १४३ मि.मी. पाऊस पडला आहे. सर्वात कमी १२. ४० मि.मी. पावसाची नोंद कर्जत तालुक्यात झाली आहे. सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे नदी, नाले, धरणांमध्ये पाणी भरले जात आहे. सखल भागात पाणी साठल्याने नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.बहुतांश टँकरने पाणीपुरवठा बंद झाला आहे. फक्त पेण तालुक्यात सहा टँकर सुरु आहेत. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. विंधण विहिरींसाठी सुमारे ५० लाख खर्च झाला आहे. टंचाई आराखड्यात याच दोन महत्त्वाच्या बाबींवर खर्च करण्यात येतो.- अरविंद टोरो, कार्यकारी अभियंता