शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

टँकरने पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: June 29, 2016 02:27 IST

जिल्ह्यामध्ये समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने ४९ पैकी ४३ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे बंद करण्यात आले

आविष्कार देसाई,

जिल्ह्यामध्ये समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने ४९ पैकी ४३ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे बंद करण्यात आले आहे. पेण तालुक्यात सहा ठिकाणी अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तोही लवकरच बंद करण्यात येणार आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. विंधण विहिरींसाठी सुमारे ५० लाख खर्च करण्यात येत आहे.गेल्या वर्षी अपेक्षापेक्षा कमी पाऊस झाला होता. त्यामुळे मध्यम, तसेच लघु धरणांमध्ये पाणीसाठ्याचे प्रमाण कमी होते. उन्हाळा कडक असल्याने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पाण्याचे संकट जिल्ह्यातील काही भागांमध्ये ओढवले होते. पाण्याची टंचाई जाणवत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागायची. लहान मुले, महिलांसह वयोवृध्दही पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र पहायला मिळाले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे सात कोटी ८८ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला होता. त्यामध्ये २९२ गावे आणि एक हजार ९२६ वाड्या टंचाईग्रस्त म्हणून घोषित केल्या होत्या. त्या माध्यमातून टंचाईच्या ठिकाणी पिण्याचे पाणी टँकर, बैलगाडीने पोचविण्याचे नियोजन करण्यात आले होते.उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने पाण्याच्या टंचाईने चांगलेच डोके वर काढले होते. जून महिना संपत आला, तरी काही पेण, महाड आणि रोहे तालुक्यांमध्ये अद्यापही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाने समाधानकारक बरसण्यास सुरुवात केल्याने अलिबाग, मुरुड आणि सुधागड-पाली तालुक्यातील प्रत्येकी एक टँकर बंद करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील आठ, कर्जत ५, पोलादपूरमध्ये ६ टँकरने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पेण तालुक्यामध्ये एकूण १२ टँकर सुरु होते. पैकी सहा टँकर बंद केले आहेत. उरण, पनवेल, खालापूर, तळा, श्रीवर्धन, माणगाव तालुक्यातीलही प्रत्येकी दोन असे एकूण ४३ टँकर बंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यावर सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पावसाची मेहरबानी आणखी झाल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून आसपासच्या पाण्याच्या स्रोतांमधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत मिळणार आहे.>पावसामुळे नदी, नाले भरलेरायगड जिल्ह्यात पावसाचे दमदार बरसणे सुरूच आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये सरासरी ६२.०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक १४३ मि.मी. पाऊस पडला आहे. सर्वात कमी १२. ४० मि.मी. पावसाची नोंद कर्जत तालुक्यात झाली आहे. सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे नदी, नाले, धरणांमध्ये पाणी भरले जात आहे. सखल भागात पाणी साठल्याने नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.बहुतांश टँकरने पाणीपुरवठा बंद झाला आहे. फक्त पेण तालुक्यात सहा टँकर सुरु आहेत. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. विंधण विहिरींसाठी सुमारे ५० लाख खर्च झाला आहे. टंचाई आराखड्यात याच दोन महत्त्वाच्या बाबींवर खर्च करण्यात येतो.- अरविंद टोरो, कार्यकारी अभियंता