शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून राज्याचा पाणीपुरवठा बंद!

By admin | Updated: March 7, 2017 05:03 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्तीवेतन व भत्त्यांची जबाबदारी राज्य शासनाने घ्यावी

मुंबई : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्तीवेतन व भत्त्यांची जबाबदारी राज्य शासनाने घ्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीने सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपात उतरलेले सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवारी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन केले. शिवाय दोन दिवसांत सरकारने मागण्यांबाबत गंभीर दखल घेतली नाही, तर बुधवारपासून शहरी आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.समितीच्या या पवित्र्यामुळे राज्याच्या ग्रामीण आणि शहरी पाणी पुरवठ्यावर विपरित परिणाम होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. शासनाकडे वारंवार मागणी करूनही मान्य होत नसल्याने राज्यातील सर्व कर्मचारी १ मार्च ते ४ मार्चदरम्यान काळ््या फिती लावून काम करत होते. मात्र तरीही शासनाने दखल घेतली नसल्याने हे आंदोलनाची धार अधिक तीव्र करत असल्याचे समितीचे अध्यक्ष देवेंद्र लांडगे यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्य शासनाने कृष्णा, तापी, विदर्भ, गोदावरी-मराठवाडा आणि कोकण खोऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्तीवेतन, भत्यांची जबाबदारी घेतलेली आहे. या निर्णयाप्रमाणेच शासनाने १९७६ ला स्थापन झालेल्या जीवन प्राधिाकरणातील अधिकारी-कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घ्यावा. २००५ मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णयही झाला. मात्र शासनाच्या चालढकलीमुळे त्यावर अद्याप कुठलीही प्रत्यक्ष कृती झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.शासनाला इशारा म्हणून १ ते ४ मार्चदरम्यान कर्मचाऱ्यांनी काळ््या फिती लावून काम केले. त्यानंतर सोमवारपासून कामबंद आंदोलन करत सर्व कर्मचारी आझाद मैदानात धरणे आंदोलन करत आहेत. दरम्यान,काम बंद केले असले, तरी पाणी पुरवठा सुरळीत ठेवत असल्याचे समितीने स्पष्ट केले. मात्र दोन दिवसांत शासनाने मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर बुधवारपासून पाणी पुरवठाही बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी)>आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठकसमितीने केलेल्या जोरदार आंदोलनानंतर पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. शिवाय कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मार्गी लावण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाची संयुक्त बैठक आयोजित केलेली आहे. असे असले, तरी केवळ आश्वासनावर आंदोलन मागे घेणार नाही. त्यामुळे मंगळवारी निर्णय झाला नाही, तर बुधवारपासून पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा लांडगे यांनी दिला आहे.