शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

भुसावळहून रेल्वेद्वारे लातूरला पाणी पुरवठ्याचे नियोजन

By admin | Updated: March 30, 2016 00:58 IST

दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यातील लातुरला भुसावळ रेल्वे विभागातर्फे रेल्वे वॅगनने पिण्याचे पाणी पोहचविण्याचे नियोजन स्थानिक रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

भुसावळ : दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यातील लातुरला भुसावळ रेल्वे विभागातर्फे रेल्वे वॅगनने पिण्याचे पाणी पोहचविण्याचे नियोजन स्थानिक रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी त्याबाबत विशेष सूचना दिल्या आहेत, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाचे राजू पाटील यांनी दिली.पाण्याच्या वॅगन कधी रवाना होणार याची तारीख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही. लातूर येथील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेने पाणी पुरवठा करण्याचे आधीच सूचित केले होते. भुसावळ येथे पाणी उपलब्ध असल्याने ती जबाबदारी रेल्वेवर सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मध्यंतरी अकोला येथे लातूर प्रमाणेच भीषण पाणी टंचाईची स्थिती होती. त्यावेळीही भुसावळ येथून रेल्वेने अकोला येथे पाणी पुरवठा करण्यात आला होता. (प्रतिनिधी)एका वॅगनमध्ये ६५ हजार लीटर पाणीबीटीपीएस प्रकारातील टँकरद्वारे ५५-५६ टन माल वाहून नेला जातो, तर ६४ ते ६५ हजार लीटर पाणी वाहून नेले जाते. त्यानुसार आठ टँकरमधून लातूरसाठी पाणी पाठविण्याचे नियोजन भुसावळ रेल्वे विभाकडून केले जात आहे.