शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

८४ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By admin | Updated: April 28, 2016 03:29 IST

पेणच्या खारेपाटात गोड्या पाण्याचे स्रोत नसल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना येथील जनतेला करावा लागतो.

पेण : पेणच्या खारेपाटात गोड्या पाण्याचे स्रोत नसल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना येथील जनतेला करावा लागतो. तीन महिने विकत पाणी नेऊन अत्यंत हालअपेष्टात दिवस काढावे लागतात. मात्र तरीही प्रशासनाकडून तोकडी उपाययोजना के ली जाते. आजघडीला तीव्र पाणीटंचाई भासत असतानाही पेणची ८४ गावे तहानलेली असताना मात्र केवळ पाच टँकरने पाणीपुरवठा होत आहे. पाणी टंचाईची ही समस्या गेली दहा - बारा वर्षांपासूनची. मात्र पाणी टंचाई सुरु झाली की दरवर्षी जिल्हा प्रशासनाची लगबग वाढते. टंचाई निवारणाचे आराखडे तयार होतात. तातडीच्या निधीची मागणी केली जाते, उपाययोजनांचे कागद आढावा बैठकीतून फिरु लागतात. आढावा घेणारी यंत्रणाही सक्रिय होते. जनतेला पाणी देण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च होतो. उन्हाळा संपला की पाऊस आल्यावर फायली कपाट बंद होतात, प्रत्यक्षात या निवारणातून जनतेपर्यंत पाणी किती पोहचते हे मात्र समजणे कठीण आहे. पेणची ८४ गावे तहानलेली टँकर मात्र पाच कशी तहान भागणार. पाणीटंचाईची दाहकता वाढली असताना त्यावरील उपाययोजना तोकड्या ठरत आहेत.पेणचा खारेपाट पाण्यावाचून शापित जीवन जगतोय. अनेकांनी पीकअप टेम्पो चालकांशी भाडेकरार करुन १ पीम्प प्लास्टीकचा ७० रुपये प्रमाणे पेण नगर परिषदेच्या इमारती जवळील टँकर भरण्याच्या जागेवरुन टेम्पो चालक गावकऱ्यांना पाणी नेत आहेत. पेण पंचायत समिती प्रशासनाने १० टँकरची मागणी केली असताना शासकीय ३ हजार लिटर क्षमतेचे २ टँकर, १० हजार लिटर क्षमतेचे २ टँकर आणि १२ हजार लिटर क्षमतेचा एक असे एकूण खाजगी ३ टँकर जमेस धरुन याच टँकरद्वारे पाणी पुरवठा केला आहे. एक टँकर चालक दिवसात दोन याप्रमाणे १० फेऱ्या होतात. शासकीय टँकरच्या ३ फेऱ्या अशा प्रकार १२ फेऱ्यामध्ये पाण्याची व्यवस्था सुरु आहे. मात्र टँकर पाणी साठवण टाकीची क्षमता कमी असल्याने गावाला पाणी पुरु शकत नाही.गेल्या दशभराच्या अनुभवातून प्रशासकीय यंत्रणेला शहानपण सूचत नाही. टंचाई निवारण आराखड्यातील गावे दरवर्षी तीच असतात. अनेकदा त्यांची संख्या वाढते मात्र कमी होत नाही. सरकारने या प्रश्नी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमधील ग्रामस्थांकडून केली जात आहे. (वार्ताहर)