शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये तीन दिवसांत महिन्याचा पाणीसाठा

By admin | Updated: July 5, 2016 04:29 IST

पावसाने शुक्रवार ते रविवार या काळात तलाव क्षेत्रात जोरदार हजेरी लावल्यामुळे अवघ्या तीन दिवसांत मुंबईच्या धरणांमध्ये महिन्याभराचा पाणीसाठा वाढला आहे़ हा साठा एकूण जलसाठ्याच्या

मुंबई/ठाणे : पावसाने शुक्रवार ते रविवार या काळात तलाव क्षेत्रात जोरदार हजेरी लावल्यामुळे अवघ्या तीन दिवसांत मुंबईच्या धरणांमध्ये महिन्याभराचा पाणीसाठा वाढला आहे़ हा साठा एकूण जलसाठ्याच्या १५ टक्केच आहे़ मात्र पाणीटंचाईच्या काळात ही वाढही दिलासा देणारी आहे़जून महिना संपत आला तरी पावसाळी ढग तलाव क्षेत्रात फिरकत नव्हते़ त्यामुळे तलावांची पातळी दिवसेंदिवस खालावत होती़ मुंबईत पाऊस जोरदार असला तरी तलाव क्षेत्र मात्र कोरडेच राहत होते़ मात्र वीकेण्डच्या पावसाने चित्र पालटले. पाऊस सुरू झाल्यापासून तलाव क्षेत्रातील जलसाठा रोज २० ते ३० हजार दशलक्ष लीटरने वाढला होता़ गेल्या तीन दिवसांमध्ये तलावांत तब्बल एक लाख १७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला़ यामुळे ३२ दिवसांचा पाणीसाठा तयार झाला. वर्षभर आवश्यक पाण्याच्या तो १५ टक्केच असून, पाणीकपात कायम राहील.ठाणे-पालघरलाही दिलासाठाणे, पालघर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात तिपटीने वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात धरणांच्या क्षेत्रात गेल्या २४ तासांत ७३७ मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस सूर्या धरणात, तर सर्वांत कमी पाऊस उल्हास नदीच्या खोऱ्यातील आंध्रा धरणात झाला आहे. बारवी धरणातील साठाही वाढला आहे. (प्रतिनिधी)- मुंबईला दररोज 3750दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़. - गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून मुंबईत पाणीकपात सुरू झाल्याने रोज ३२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे़- मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी धरणांमध्ये १ आॅक्टोबरअखेर १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़असा वाढला जलसाठा १ जुलै १ लाख १० हजार २ जुलै १ लाख १९ हजार३ जुलै १ लाख ५७ हजार४ जुलै २ लाख २७ हजार(दशलक्ष लीटरमध्ये)