शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आधी पाणी; मगच परवानगी

By admin | Updated: February 28, 2017 03:01 IST

तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात इमारती उभारल्या जात आहे.

अंबरनाथ : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात इमारती उभारल्या जात आहे. या इमारतींना बांधकाम परवानगी देण्यात येत असली, तरी त्यांना पाण्याची कोणतीच सोय नाही. काही इमारती पाण्यावर आपला हक्क सांगून ग्रामस्थांचे पाणी पळवत आहेत. आधी गावाला पाणी द्या, नंतर इमारतींना. यापुढे नव्याने इमारतींना परवानगी देताना आधी पाण्याचे आरक्षण आहे की नाही, याची चाचपणी केल्यावर त्या इमारतींना परवानगी द्या. पाण्याचे आरक्षण नसेल, तर इमारतींना परवानगी देणार नाही, असा ठराव आमसभेत करण्यात आला. या ठरावामुळे ग्रामीण भागाचे पाणी चोरणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना चांगलाच चाप बसणार आहे. आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी आमसभा झाली. बोराडपाडा येथे ही आमसभा झाली. चार वर्षांपासून आमसभा न झाल्याने अनेक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, आमसभेचे अध्यक्षपद हे आपल्याकडे नसल्याने ही आमसभा झाली नव्हती. आता अध्यक्षपद माझ्याकडे आल्याने पुन्हा आमसभा होतील, असे आश्वासन कथोरे यांनी दिले. या आमसभेत अनेक ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार केला. आमदार कथोरे म्हणाले की, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात इमारतींचे काम सुरू आहे. गावांचा विकास हा झालाच पाहिजे. मात्र, आपल्या गावाच्या पाण्याच्या आरक्षणावर इमारतींना परवानगी दिल्यास ग्रामस्थच पाण्यापासून वंचित राहतील. त्यामुळे पाणीपुरवठा स्वतंत्र ठेवून अतिरिक्त पाण्यावरच बांधकाम परवानगी दिली गेली पाहिजे. नव्या इमारतींना गावाचे पाणी देऊ नये, असे आदेश आमदार कथोरे यांनी दिले. तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फार्महाउस झाले आहेत. त्यांनाही पाणी वळवले जाते. ते अत्यंत चुकीचे आहे. पाणी आधी स्थानिकांना, नंतर फार्महाउसवाल्यांना द्या, असेही आदेश दिले. या सभेत कथोरे यांनी ग्रामसेवकांवरही राग व्यक्त केला. ग्रामसेवक सरपंचांना हाताशी धरून गैरकारभार करीत आहेत. पायाभूत सुविधांकडे ग्रामसेवकांचे दुर्लक्ष झाले आहे. ग्रामसेवकच गावाचे मालक झाले असल्याचे कथोरे म्हणाले. नवीन इमारतींच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतेही नियोजन नाही. याचे नियोजन झाल्याशिवाय नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये, असे स्पष्ट आदेश आणि ठरावही केला. पंचायत समितीत लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकारी मनमानी करत असल्याचे शिवसेना तालुका संपर्कप्रमुख एकनाथ शेलार यांनी भाषणात सांगितले. हा धागा पकडून कथोरे म्हणाले, पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी नसल्याने जबाबदारीने वागून सर्वसामान्य नागरिकांची कामे प्राधान्याने करावीत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची खरी जबाबदारी या अधिकाऱ्यांची असल्याचेही त्यांनी सांगितले. या सभेत उल्हास नदीच्या प्रदूषणावर शिवसेना तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी यांनी लक्ष वेधले. उल्हास नदीत थेट सांडपाणी सोडले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही परिस्थिती बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागासाठी उल्हास नदीवर स्वतंत्र आरक्षण निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. एकनाथ शेलार यांनी वांगणीतील अनधिकृत बांधकामांबाबत तक्रार केली. तसेच एमएमआरडीएच्या रस्त्याच्या मुद्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. (प्रतिनिधी)>शेतकऱ्यांना विश्वासात घ्याअंबरनाथ तालुक्याचा विकास साध्य करण्यासाठी एमएमआरडीएमार्फत ग्रामीण भागाचा विकास आराखडा तयार केला जात आहे. मात्र, या आराखड्यात शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जागेवर आरक्षण टाकण्यात आले आहे. माथेरानच्या इकोसेन्सिटिव्ह झोनचा परिणाम अंबरनाथ तालुक्यावर होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटणारा आहे. अनेक भागावर चुकीचे आरक्षण पडले आहे. तो आराखडा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच मंजूर करावा, असा ठरावही सभेत करण्यात आला.