शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

आधी पाणी; मगच परवानगी

By admin | Updated: February 28, 2017 03:01 IST

तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात इमारती उभारल्या जात आहे.

अंबरनाथ : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात इमारती उभारल्या जात आहे. या इमारतींना बांधकाम परवानगी देण्यात येत असली, तरी त्यांना पाण्याची कोणतीच सोय नाही. काही इमारती पाण्यावर आपला हक्क सांगून ग्रामस्थांचे पाणी पळवत आहेत. आधी गावाला पाणी द्या, नंतर इमारतींना. यापुढे नव्याने इमारतींना परवानगी देताना आधी पाण्याचे आरक्षण आहे की नाही, याची चाचपणी केल्यावर त्या इमारतींना परवानगी द्या. पाण्याचे आरक्षण नसेल, तर इमारतींना परवानगी देणार नाही, असा ठराव आमसभेत करण्यात आला. या ठरावामुळे ग्रामीण भागाचे पाणी चोरणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना चांगलाच चाप बसणार आहे. आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी आमसभा झाली. बोराडपाडा येथे ही आमसभा झाली. चार वर्षांपासून आमसभा न झाल्याने अनेक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, आमसभेचे अध्यक्षपद हे आपल्याकडे नसल्याने ही आमसभा झाली नव्हती. आता अध्यक्षपद माझ्याकडे आल्याने पुन्हा आमसभा होतील, असे आश्वासन कथोरे यांनी दिले. या आमसभेत अनेक ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार केला. आमदार कथोरे म्हणाले की, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात इमारतींचे काम सुरू आहे. गावांचा विकास हा झालाच पाहिजे. मात्र, आपल्या गावाच्या पाण्याच्या आरक्षणावर इमारतींना परवानगी दिल्यास ग्रामस्थच पाण्यापासून वंचित राहतील. त्यामुळे पाणीपुरवठा स्वतंत्र ठेवून अतिरिक्त पाण्यावरच बांधकाम परवानगी दिली गेली पाहिजे. नव्या इमारतींना गावाचे पाणी देऊ नये, असे आदेश आमदार कथोरे यांनी दिले. तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फार्महाउस झाले आहेत. त्यांनाही पाणी वळवले जाते. ते अत्यंत चुकीचे आहे. पाणी आधी स्थानिकांना, नंतर फार्महाउसवाल्यांना द्या, असेही आदेश दिले. या सभेत कथोरे यांनी ग्रामसेवकांवरही राग व्यक्त केला. ग्रामसेवक सरपंचांना हाताशी धरून गैरकारभार करीत आहेत. पायाभूत सुविधांकडे ग्रामसेवकांचे दुर्लक्ष झाले आहे. ग्रामसेवकच गावाचे मालक झाले असल्याचे कथोरे म्हणाले. नवीन इमारतींच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतेही नियोजन नाही. याचे नियोजन झाल्याशिवाय नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये, असे स्पष्ट आदेश आणि ठरावही केला. पंचायत समितीत लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकारी मनमानी करत असल्याचे शिवसेना तालुका संपर्कप्रमुख एकनाथ शेलार यांनी भाषणात सांगितले. हा धागा पकडून कथोरे म्हणाले, पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी नसल्याने जबाबदारीने वागून सर्वसामान्य नागरिकांची कामे प्राधान्याने करावीत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची खरी जबाबदारी या अधिकाऱ्यांची असल्याचेही त्यांनी सांगितले. या सभेत उल्हास नदीच्या प्रदूषणावर शिवसेना तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी यांनी लक्ष वेधले. उल्हास नदीत थेट सांडपाणी सोडले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही परिस्थिती बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागासाठी उल्हास नदीवर स्वतंत्र आरक्षण निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. एकनाथ शेलार यांनी वांगणीतील अनधिकृत बांधकामांबाबत तक्रार केली. तसेच एमएमआरडीएच्या रस्त्याच्या मुद्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. (प्रतिनिधी)>शेतकऱ्यांना विश्वासात घ्याअंबरनाथ तालुक्याचा विकास साध्य करण्यासाठी एमएमआरडीएमार्फत ग्रामीण भागाचा विकास आराखडा तयार केला जात आहे. मात्र, या आराखड्यात शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जागेवर आरक्षण टाकण्यात आले आहे. माथेरानच्या इकोसेन्सिटिव्ह झोनचा परिणाम अंबरनाथ तालुक्यावर होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटणारा आहे. अनेक भागावर चुकीचे आरक्षण पडले आहे. तो आराखडा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच मंजूर करावा, असा ठरावही सभेत करण्यात आला.