शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

शेलटी, पिंपळशेतमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: May 18, 2016 03:53 IST

धामणी, कवडास, साखरे धरणांचे वरदान लाभलेल्या डहाणू तालुक्याच्या पूर्व भागांत गेल्या एप्रिलपासून पाणीटंचाई सुरू झाली

शौकत शेख,

डहाणू- सूर्या अंतर्गत येणाऱ्या धामणी, कवडास, साखरे धरणांचे वरदान लाभलेल्या डहाणू तालुक्याच्या पूर्व भागांत गेल्या एप्रिलपासून पाणीटंचाई सुरू झाली आहे. तर डहाणूच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंपळशेत, शेलटी, कातकरीपाडा, गावठाणपाडा, ओवलीपाडा, तोरणपाडा, सापाटीपाडा येथे गेल्या दोन तीन महिन्यांपासून पिण्याचे पाणी नसल्याने येथील शेकडो आदिवासी कुटुंबांवर ओहोळ, नदी, नाळ्यातून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. मात्र अनेक वेळा तक्रार करूनही पंचायत समिती प्रशासन पाण्यासाठी कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने येथील आदिवासींना पाण्यासाठी दुसऱ्या गावात स्थलांतर होण्याची वेळ आली आहे.डहाणूच्या कवडास, धापणी, साखरे धरणातून गेल्या अनेक वर्षापासून वसई, विरार, भार्इंदर व इतर शहरातील कोट्यवधी नागरीकांची तहान भागविली जाते. परंतु शासन व सुस्त प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे येथील आदिवासी भूमिपूत्रांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. डहाणू तालुक्याच्या मुंबई, अहमदाबाद महामार्गाच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात म्हणजेच शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले गाव, खेडे, पाडे आहेत. वरील धरणांसाठी येथील स्थानिक भूमिपुत्रांनी शासनाला कवडीमोल भावाने जमिनी देऊन आपले योगदान दिल्याने आज अनेक मोठमोठ्या शहरांतील कोट्यवधी लोकांची तहान भागविली जात आहे. मात्र ज्यांच्या जमिनीवर तसेच आदिवासी उपयोजनेतून ४८० कोटी रुपये खर्च करूनही धरणे उभी आहेत. त्या धरणांतून या गोरगरीब आदिवासींना पाण्याचा थेंबही मिळत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी येथील आदिवासींना हातपंप, खोल विहिरीतून किंवा नदी, नाळ्यातून गढूळ व दूषित पाणी पिऊन वर्षभर विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे.