शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

शेलटी, पिंपळशेतमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: May 18, 2016 03:53 IST

धामणी, कवडास, साखरे धरणांचे वरदान लाभलेल्या डहाणू तालुक्याच्या पूर्व भागांत गेल्या एप्रिलपासून पाणीटंचाई सुरू झाली

शौकत शेख,

डहाणू- सूर्या अंतर्गत येणाऱ्या धामणी, कवडास, साखरे धरणांचे वरदान लाभलेल्या डहाणू तालुक्याच्या पूर्व भागांत गेल्या एप्रिलपासून पाणीटंचाई सुरू झाली आहे. तर डहाणूच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंपळशेत, शेलटी, कातकरीपाडा, गावठाणपाडा, ओवलीपाडा, तोरणपाडा, सापाटीपाडा येथे गेल्या दोन तीन महिन्यांपासून पिण्याचे पाणी नसल्याने येथील शेकडो आदिवासी कुटुंबांवर ओहोळ, नदी, नाळ्यातून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. मात्र अनेक वेळा तक्रार करूनही पंचायत समिती प्रशासन पाण्यासाठी कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने येथील आदिवासींना पाण्यासाठी दुसऱ्या गावात स्थलांतर होण्याची वेळ आली आहे.डहाणूच्या कवडास, धापणी, साखरे धरणातून गेल्या अनेक वर्षापासून वसई, विरार, भार्इंदर व इतर शहरातील कोट्यवधी नागरीकांची तहान भागविली जाते. परंतु शासन व सुस्त प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे येथील आदिवासी भूमिपूत्रांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. डहाणू तालुक्याच्या मुंबई, अहमदाबाद महामार्गाच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात म्हणजेच शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले गाव, खेडे, पाडे आहेत. वरील धरणांसाठी येथील स्थानिक भूमिपुत्रांनी शासनाला कवडीमोल भावाने जमिनी देऊन आपले योगदान दिल्याने आज अनेक मोठमोठ्या शहरांतील कोट्यवधी लोकांची तहान भागविली जात आहे. मात्र ज्यांच्या जमिनीवर तसेच आदिवासी उपयोजनेतून ४८० कोटी रुपये खर्च करूनही धरणे उभी आहेत. त्या धरणांतून या गोरगरीब आदिवासींना पाण्याचा थेंबही मिळत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी येथील आदिवासींना हातपंप, खोल विहिरीतून किंवा नदी, नाळ्यातून गढूळ व दूषित पाणी पिऊन वर्षभर विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे.