शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाई

By admin | Updated: March 3, 2017 02:43 IST

खारघर सेक्टर १२मध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

पनवेल : खारघर सेक्टर १२मध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यामुळे त्रस्त रहिवाशांनी खारघर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सिडको अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश हटवार यांनी आठ दिवसांत पुरवठा पूर्ववत होईल, असे सांगितले. खारघर शहरामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागते. मात्र, यंदा मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सिडकोच्या नियोजनाअभावी काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सिडकोने वेळीच उपाययोजना न केल्यास नागरिकांना आगामी काळात आणखी त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता सिडकोकडून पाणीकपात करण्यात येत असल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे सेक्टर १२ अ आणि ब परिसरातील नागरिकांनी भाजपाच्या लीना गरड यांना नेतृत्वाखाली सिडकोकडे धाव घेत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. त्यावर अधिकारी हटवार यांनी आठ दिवसांची मुदत मागितली. तात्पुरता पाण्याचा वापर कमी करून सहकार्य करा, असे आवाहनही केले. >कामोठे सेक्टर ९ येथील काही सोसायट्यांमध्ये दिवसभरात केवळ एकच तास पाणी येते. सध्या ही स्थिती आहे, तर भर उन्हाळ्यात काय अवस्था होईल, या चिंतेत नागरिक आहेत. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी येथील रहिवाशांकडून होत आहे. >कामोठे, पनवेलमधील काही इमारतींमध्ये पाणीकपात करण्यात आली आहे. तालुका पोलीस ठाण्यालगत असलेल्या कैलास पार्क या सोसायटीत जवळपास ७० ते ८० कुटुंबांचे वास्तव्य आहे. या ठिकाणी सकाळी एकदाच तासभरासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने रहिवासी हैराण आहेत.