शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाई

By admin | Updated: March 3, 2017 02:43 IST

खारघर सेक्टर १२मध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

पनवेल : खारघर सेक्टर १२मध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यामुळे त्रस्त रहिवाशांनी खारघर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सिडको अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश हटवार यांनी आठ दिवसांत पुरवठा पूर्ववत होईल, असे सांगितले. खारघर शहरामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागते. मात्र, यंदा मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सिडकोच्या नियोजनाअभावी काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सिडकोने वेळीच उपाययोजना न केल्यास नागरिकांना आगामी काळात आणखी त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता सिडकोकडून पाणीकपात करण्यात येत असल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे सेक्टर १२ अ आणि ब परिसरातील नागरिकांनी भाजपाच्या लीना गरड यांना नेतृत्वाखाली सिडकोकडे धाव घेत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. त्यावर अधिकारी हटवार यांनी आठ दिवसांची मुदत मागितली. तात्पुरता पाण्याचा वापर कमी करून सहकार्य करा, असे आवाहनही केले. >कामोठे सेक्टर ९ येथील काही सोसायट्यांमध्ये दिवसभरात केवळ एकच तास पाणी येते. सध्या ही स्थिती आहे, तर भर उन्हाळ्यात काय अवस्था होईल, या चिंतेत नागरिक आहेत. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी येथील रहिवाशांकडून होत आहे. >कामोठे, पनवेलमधील काही इमारतींमध्ये पाणीकपात करण्यात आली आहे. तालुका पोलीस ठाण्यालगत असलेल्या कैलास पार्क या सोसायटीत जवळपास ७० ते ८० कुटुंबांचे वास्तव्य आहे. या ठिकाणी सकाळी एकदाच तासभरासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने रहिवासी हैराण आहेत.