शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

महुडे बुद्रुक येथे पाणीटंचाई

By admin | Updated: March 3, 2017 01:11 IST

महुडे बुद्रुक (ता. भोर) येथील भानुसदरा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना कार्यान्वित नसल्याने गावात पाणीटंचाई आहे

भोर : महुडे बुद्रुक (ता. भोर) येथील भानुसदरा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना कार्यान्वित नसल्याने गावात पाणीटंचाई आहे. गावाजवळच असलेल्या आखाडेवस्तीला जवळपास पाणीच उपलब्ध नसल्याने महिलांना एक किलोमीटरवरून डोक्यावरून पायपीट करत पाणी आणावे लागत आहे. यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल मोठ्या प्रमाणात होत असून टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे.भोर शहरापासून फक्त १० किमीवर असलेल्या महुडे बुद्रुक गावात बारा वाड्या-वस्त्या असून येथील सुमारे ४०० लोकसंख्या असलेले भानुसदरा तर गावापासून घेवडेश्वराच्या डोंगरावर १०० लोकवस्तीची आखाडेवस्ती ही धनगर समाजाचे लोक राहतात. पावसाळ्यात येथील नागरिक डोंगर उतारावरून वाहणारे झऱ्यांचे पाणी वापरतात. मात्र उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने गावातून विहिरीवरून २ किमीची पायपीट करून डोंगर चढून धनगर समाजाच्या महिलांना पाणी आणावे लागते. टँकरची मागणी करूनही वेळेवर टँकर सुरू होत नसल्याचे मारुती गोरे यांनी सांगितले.महुडे बुद्रुक गावातील वाड्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना आंबेघर येथून राबविण्यात आली आहे. या योजनेसाठी वापरलेले पाईप प्लॅस्टिकचे असल्याने वारंवार फुटतात. त्यामुळे गावात पाणीपुरवठा योजना असुनही ती सुरू नसल्याने दरवर्षी मार्च महिन्यापासून सुमारे साडेतीन महिने लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्या महिलांना गावापासून अर्धा किमीवर असलेल्या विहिरीतून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. हे पाणी पुढील पंधरा दिवसच पुरेल एवढेच आहे. पाणी गाळमिश्रीत असून त्यामुळे वाड्यांना टँकरशिवाय पर्याय नसल्याने टँकर सुरू करावा लागणार असल्याचे रामचंद्र दामगुडे दगडू दामगुडे, छाया दामगुडे, दगडू पिलाणे यांनी सांगितले. महुडे खुर्द गावाजवळ डोंगर उतारावर गोरेवस्ती व हुंबेवस्ती या २०० लोकवस्ती असलेल्या दोन धनगर समाजाच्या वस्त्यांनाही जवळपास पाणी उपलब्ध नसल्याने टंचाई सुरू झाली आहे. >वनव्यामुळे डोंगरावरील चाराही संपुष्टातडोंगरांवरील गवत वणव्यात जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात पाणीटंचाईची झळ बसली आहे. महुडे खुर्दची गोरेवस्ती या धनगर समाजाच्या वस्तीवर पाणीटंचाई असल्याने विठ्ठल लक्ष्मण गोरे याने आपल्या २५ जनांवरांसह पिसावरे येथील डोंगरात स्थलांतर करून राहात होता. मात्र सोमवारी लागलेल्या वणव्यात विठ्ठल गोरे यांनी जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या एक हजार पेंढा, गवत आणि ५ ट्रॉली शेणखत जळाले. ऐन उन्हाळ्यात चारा जळाल्याने जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी गोरे यांनी केली आहे.