शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महुडे बुद्रुक येथे पाणीटंचाई

By admin | Updated: March 3, 2017 01:11 IST

महुडे बुद्रुक (ता. भोर) येथील भानुसदरा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना कार्यान्वित नसल्याने गावात पाणीटंचाई आहे

भोर : महुडे बुद्रुक (ता. भोर) येथील भानुसदरा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना कार्यान्वित नसल्याने गावात पाणीटंचाई आहे. गावाजवळच असलेल्या आखाडेवस्तीला जवळपास पाणीच उपलब्ध नसल्याने महिलांना एक किलोमीटरवरून डोक्यावरून पायपीट करत पाणी आणावे लागत आहे. यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल मोठ्या प्रमाणात होत असून टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे.भोर शहरापासून फक्त १० किमीवर असलेल्या महुडे बुद्रुक गावात बारा वाड्या-वस्त्या असून येथील सुमारे ४०० लोकसंख्या असलेले भानुसदरा तर गावापासून घेवडेश्वराच्या डोंगरावर १०० लोकवस्तीची आखाडेवस्ती ही धनगर समाजाचे लोक राहतात. पावसाळ्यात येथील नागरिक डोंगर उतारावरून वाहणारे झऱ्यांचे पाणी वापरतात. मात्र उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने गावातून विहिरीवरून २ किमीची पायपीट करून डोंगर चढून धनगर समाजाच्या महिलांना पाणी आणावे लागते. टँकरची मागणी करूनही वेळेवर टँकर सुरू होत नसल्याचे मारुती गोरे यांनी सांगितले.महुडे बुद्रुक गावातील वाड्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना आंबेघर येथून राबविण्यात आली आहे. या योजनेसाठी वापरलेले पाईप प्लॅस्टिकचे असल्याने वारंवार फुटतात. त्यामुळे गावात पाणीपुरवठा योजना असुनही ती सुरू नसल्याने दरवर्षी मार्च महिन्यापासून सुमारे साडेतीन महिने लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्या महिलांना गावापासून अर्धा किमीवर असलेल्या विहिरीतून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. हे पाणी पुढील पंधरा दिवसच पुरेल एवढेच आहे. पाणी गाळमिश्रीत असून त्यामुळे वाड्यांना टँकरशिवाय पर्याय नसल्याने टँकर सुरू करावा लागणार असल्याचे रामचंद्र दामगुडे दगडू दामगुडे, छाया दामगुडे, दगडू पिलाणे यांनी सांगितले. महुडे खुर्द गावाजवळ डोंगर उतारावर गोरेवस्ती व हुंबेवस्ती या २०० लोकवस्ती असलेल्या दोन धनगर समाजाच्या वस्त्यांनाही जवळपास पाणी उपलब्ध नसल्याने टंचाई सुरू झाली आहे. >वनव्यामुळे डोंगरावरील चाराही संपुष्टातडोंगरांवरील गवत वणव्यात जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात पाणीटंचाईची झळ बसली आहे. महुडे खुर्दची गोरेवस्ती या धनगर समाजाच्या वस्तीवर पाणीटंचाई असल्याने विठ्ठल लक्ष्मण गोरे याने आपल्या २५ जनांवरांसह पिसावरे येथील डोंगरात स्थलांतर करून राहात होता. मात्र सोमवारी लागलेल्या वणव्यात विठ्ठल गोरे यांनी जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या एक हजार पेंढा, गवत आणि ५ ट्रॉली शेणखत जळाले. ऐन उन्हाळ्यात चारा जळाल्याने जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी गोरे यांनी केली आहे.