शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
3
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
4
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
5
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
6
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
7
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
8
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
9
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
10
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
11
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
12
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
13
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
14
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
15
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
16
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
17
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
18
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
19
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
20
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार

महुडे बुद्रुक येथे पाणीटंचाई

By admin | Updated: March 3, 2017 01:11 IST

महुडे बुद्रुक (ता. भोर) येथील भानुसदरा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना कार्यान्वित नसल्याने गावात पाणीटंचाई आहे

भोर : महुडे बुद्रुक (ता. भोर) येथील भानुसदरा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना कार्यान्वित नसल्याने गावात पाणीटंचाई आहे. गावाजवळच असलेल्या आखाडेवस्तीला जवळपास पाणीच उपलब्ध नसल्याने महिलांना एक किलोमीटरवरून डोक्यावरून पायपीट करत पाणी आणावे लागत आहे. यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल मोठ्या प्रमाणात होत असून टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे.भोर शहरापासून फक्त १० किमीवर असलेल्या महुडे बुद्रुक गावात बारा वाड्या-वस्त्या असून येथील सुमारे ४०० लोकसंख्या असलेले भानुसदरा तर गावापासून घेवडेश्वराच्या डोंगरावर १०० लोकवस्तीची आखाडेवस्ती ही धनगर समाजाचे लोक राहतात. पावसाळ्यात येथील नागरिक डोंगर उतारावरून वाहणारे झऱ्यांचे पाणी वापरतात. मात्र उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने गावातून विहिरीवरून २ किमीची पायपीट करून डोंगर चढून धनगर समाजाच्या महिलांना पाणी आणावे लागते. टँकरची मागणी करूनही वेळेवर टँकर सुरू होत नसल्याचे मारुती गोरे यांनी सांगितले.महुडे बुद्रुक गावातील वाड्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना आंबेघर येथून राबविण्यात आली आहे. या योजनेसाठी वापरलेले पाईप प्लॅस्टिकचे असल्याने वारंवार फुटतात. त्यामुळे गावात पाणीपुरवठा योजना असुनही ती सुरू नसल्याने दरवर्षी मार्च महिन्यापासून सुमारे साडेतीन महिने लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्या महिलांना गावापासून अर्धा किमीवर असलेल्या विहिरीतून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. हे पाणी पुढील पंधरा दिवसच पुरेल एवढेच आहे. पाणी गाळमिश्रीत असून त्यामुळे वाड्यांना टँकरशिवाय पर्याय नसल्याने टँकर सुरू करावा लागणार असल्याचे रामचंद्र दामगुडे दगडू दामगुडे, छाया दामगुडे, दगडू पिलाणे यांनी सांगितले. महुडे खुर्द गावाजवळ डोंगर उतारावर गोरेवस्ती व हुंबेवस्ती या २०० लोकवस्ती असलेल्या दोन धनगर समाजाच्या वस्त्यांनाही जवळपास पाणी उपलब्ध नसल्याने टंचाई सुरू झाली आहे. >वनव्यामुळे डोंगरावरील चाराही संपुष्टातडोंगरांवरील गवत वणव्यात जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात पाणीटंचाईची झळ बसली आहे. महुडे खुर्दची गोरेवस्ती या धनगर समाजाच्या वस्तीवर पाणीटंचाई असल्याने विठ्ठल लक्ष्मण गोरे याने आपल्या २५ जनांवरांसह पिसावरे येथील डोंगरात स्थलांतर करून राहात होता. मात्र सोमवारी लागलेल्या वणव्यात विठ्ठल गोरे यांनी जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या एक हजार पेंढा, गवत आणि ५ ट्रॉली शेणखत जळाले. ऐन उन्हाळ्यात चारा जळाल्याने जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी गोरे यांनी केली आहे.