शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

घारापुरी बेटावर पाणीटंचाई

By admin | Updated: May 19, 2016 02:57 IST

सध्या महाराष्ट्रभर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याणे ठिकठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली

उरण : सध्या महाराष्ट्रभर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याणे ठिकठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे उरण तालुक्यातील घारापुरी बेटावर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, ती त्वरित सोडविण्यात यावी, अशी मागणी घारापुरीचे ग्रामपंचायत सदस्य बळीराम पद्माकर ठाकूर यांनी उरणचे नवनियुक्त नायब तहसीलदार योगिता कोल्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. घारापुरी बेट हे चारही बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. घारापुरी बेटावर प्रामुख्याने राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर अशी तीन गावे असून, २००९-१० मध्ये तीनही गावांत शासनाच्या एका योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी, पाणी वितरण व धरण दुरुस्ती या कामी अंदाजे चार ते साडेचार करोड रुपये शासनाने खर्च केले आहेत. मात्र आजतागायत जलवाहिनीतून पाणी सोडण्यात आलेले नाही. वारंवार ग्रामस्थांनी मागणी करूनही पाइपलाइनद्वारे पाणी देण्यात आलेले नाही. नळाची अनेक कनेक्शन्स ग्रामपंचायतीने बंद केली आहेत. मात्र आता धरणातील पाणी सोडणे बंद केल्याने घारापुरी ग्रामस्थांपुढे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून, येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी कुठून आणावे, हा प्रश्न पडला आहे. पाणीटंचाई त्वरित दूर व्हावी व जनतेला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रामपंचायत सदस्य बळीराम ठाकूर यांनी नायब तहसीलदार योगिता कोल्हे यांना एक निवेदन दिले. (वार्ताहर)घारापुरी येथील प्रसिद्ध गुहेतील हौदाने केव्हाच तळ गाठला आहे. तसेच राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर विहिरींची नियमित स्वच्छता होत नसल्याने पाण्यास दुर्गंधी येत आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी आरोग्यास घातक असल्याने नागरिकांना वापरता येत नाही. असे असताना ग्रामपंचायतीकडून आजपर्यंत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. अनेक वेळा तक्रार करूनही शासनानेही या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे घारापुरी ग्रामपंचायत सदस्य बळीराम ठाकूर यांनी सांगितले.