शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

घारापुरी बेटावर पाणीटंचाई

By admin | Updated: May 19, 2016 02:57 IST

सध्या महाराष्ट्रभर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याणे ठिकठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली

उरण : सध्या महाराष्ट्रभर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याणे ठिकठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे उरण तालुक्यातील घारापुरी बेटावर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, ती त्वरित सोडविण्यात यावी, अशी मागणी घारापुरीचे ग्रामपंचायत सदस्य बळीराम पद्माकर ठाकूर यांनी उरणचे नवनियुक्त नायब तहसीलदार योगिता कोल्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. घारापुरी बेट हे चारही बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. घारापुरी बेटावर प्रामुख्याने राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर अशी तीन गावे असून, २००९-१० मध्ये तीनही गावांत शासनाच्या एका योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी, पाणी वितरण व धरण दुरुस्ती या कामी अंदाजे चार ते साडेचार करोड रुपये शासनाने खर्च केले आहेत. मात्र आजतागायत जलवाहिनीतून पाणी सोडण्यात आलेले नाही. वारंवार ग्रामस्थांनी मागणी करूनही पाइपलाइनद्वारे पाणी देण्यात आलेले नाही. नळाची अनेक कनेक्शन्स ग्रामपंचायतीने बंद केली आहेत. मात्र आता धरणातील पाणी सोडणे बंद केल्याने घारापुरी ग्रामस्थांपुढे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून, येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी कुठून आणावे, हा प्रश्न पडला आहे. पाणीटंचाई त्वरित दूर व्हावी व जनतेला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रामपंचायत सदस्य बळीराम ठाकूर यांनी नायब तहसीलदार योगिता कोल्हे यांना एक निवेदन दिले. (वार्ताहर)घारापुरी येथील प्रसिद्ध गुहेतील हौदाने केव्हाच तळ गाठला आहे. तसेच राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर विहिरींची नियमित स्वच्छता होत नसल्याने पाण्यास दुर्गंधी येत आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी आरोग्यास घातक असल्याने नागरिकांना वापरता येत नाही. असे असताना ग्रामपंचायतीकडून आजपर्यंत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. अनेक वेळा तक्रार करूनही शासनानेही या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे घारापुरी ग्रामपंचायत सदस्य बळीराम ठाकूर यांनी सांगितले.