शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

पाणीटंचाई मिटली; शेतीसाठी विसर्ग

By admin | Updated: August 10, 2016 01:42 IST

पावसाने जून महिना कोरडा गेल्याने वेल्हा, मुळशी व मावळ तालुका वगळता जिल्ह्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई असल्याने १२८ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता.

पुणे : पावसाने जून महिना कोरडा गेल्याने वेल्हा, मुळशी व मावळ तालुका वगळता जिल्ह्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई असल्याने १२८ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, जुलै व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे झपाट्याने टँकर कमी होऊन आता ३५ टँकरने जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरू आहे. तोही बारामती, दौैंड व पुरंदर या तीन तालुक्यांतच.त्यात सर्वाधिक २० टँकर बारामती तालुक्यात असून, पुरंदर १० व दौैंड तालुक्यात ५ टँकर सुरू आहेत. गेल्या वर्षी ५ जूननंतर जिल्ह्यात मॉन्सून सक्र्रिय होऊन तो सरासरीच्या १६०.०६ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात मेअखेर सुरू असलेले टँकर झपाट्याने कमी होऊन ते १८ वर आले होते. या वर्षीची परिस्थिती मात्र वेगळी आहे. मुळात जूनच्या सरासरीच्या तुलनेत निम्माही पाऊस झाला नाही. जून महिन्यात १४२.४० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. मात्र, जूनमध्ये फक्त ७८.९२ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवत होती. जून अखेरपर्यंत जिल्ह्यात १४७ टँकर सुरू होते. जून महिन्यात १२८ टँकरने ८४ गावे ८१७ वाड्यावस्त्यांवर सव्वातीन लाख लोकांना पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, जुलै महिन्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. जून व जुलै या दोन महिन्यांची सरासरी पावसाने ओलांडली. त्यामुळे टंचाईची तीव्रता कमी झाली. त्यानंतर काही काळ विश्रांती घेऊन आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. चार तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली असून, आणखी दोन तालुके त्या मार्गावर आहेत. परिणामी टँकर झपाट्याने कमी झाले आहेत. १२८ वरून आता ३५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दौंड तालुक्यात ५ टँकर सुरू असून, तेही पुढील काही दिवसांत बंद होतील. त्यामुळे बारामती व दौैंड वगळता जिल्हा टँकरमुक्त होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, नगर जिल्ह्यातील कर्जत, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांसह सोलापूर जिल्हा उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे.पुणे शहर व धरणक्षेत्रात गेल्या दहा दिवसांत मुसळधार पाऊस होत आहे. तेथील पावसाचे पाणी उजनीत गेल्या आठ दिवसांपासून येत आहे. त्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत दररोज वाढ होत आहे. वाढलेल्या या पाण्यामुळे मका, कडवळ, पिके पाण्याखाली गेली आहेत. दररोज पाणी वाढत असल्याने उजनीलगतच्या भिगवण ते हिंगणगाव पट्ट्यातील शेतकरी आनंदी झाला आहे.