शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

पाणीटंचाई मिटली; शेतीसाठी विसर्ग

By admin | Updated: August 10, 2016 01:42 IST

पावसाने जून महिना कोरडा गेल्याने वेल्हा, मुळशी व मावळ तालुका वगळता जिल्ह्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई असल्याने १२८ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता.

पुणे : पावसाने जून महिना कोरडा गेल्याने वेल्हा, मुळशी व मावळ तालुका वगळता जिल्ह्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई असल्याने १२८ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, जुलै व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे झपाट्याने टँकर कमी होऊन आता ३५ टँकरने जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरू आहे. तोही बारामती, दौैंड व पुरंदर या तीन तालुक्यांतच.त्यात सर्वाधिक २० टँकर बारामती तालुक्यात असून, पुरंदर १० व दौैंड तालुक्यात ५ टँकर सुरू आहेत. गेल्या वर्षी ५ जूननंतर जिल्ह्यात मॉन्सून सक्र्रिय होऊन तो सरासरीच्या १६०.०६ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात मेअखेर सुरू असलेले टँकर झपाट्याने कमी होऊन ते १८ वर आले होते. या वर्षीची परिस्थिती मात्र वेगळी आहे. मुळात जूनच्या सरासरीच्या तुलनेत निम्माही पाऊस झाला नाही. जून महिन्यात १४२.४० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. मात्र, जूनमध्ये फक्त ७८.९२ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवत होती. जून अखेरपर्यंत जिल्ह्यात १४७ टँकर सुरू होते. जून महिन्यात १२८ टँकरने ८४ गावे ८१७ वाड्यावस्त्यांवर सव्वातीन लाख लोकांना पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, जुलै महिन्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. जून व जुलै या दोन महिन्यांची सरासरी पावसाने ओलांडली. त्यामुळे टंचाईची तीव्रता कमी झाली. त्यानंतर काही काळ विश्रांती घेऊन आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. चार तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली असून, आणखी दोन तालुके त्या मार्गावर आहेत. परिणामी टँकर झपाट्याने कमी झाले आहेत. १२८ वरून आता ३५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दौंड तालुक्यात ५ टँकर सुरू असून, तेही पुढील काही दिवसांत बंद होतील. त्यामुळे बारामती व दौैंड वगळता जिल्हा टँकरमुक्त होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, नगर जिल्ह्यातील कर्जत, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांसह सोलापूर जिल्हा उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे.पुणे शहर व धरणक्षेत्रात गेल्या दहा दिवसांत मुसळधार पाऊस होत आहे. तेथील पावसाचे पाणी उजनीत गेल्या आठ दिवसांपासून येत आहे. त्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत दररोज वाढ होत आहे. वाढलेल्या या पाण्यामुळे मका, कडवळ, पिके पाण्याखाली गेली आहेत. दररोज पाणी वाढत असल्याने उजनीलगतच्या भिगवण ते हिंगणगाव पट्ट्यातील शेतकरी आनंदी झाला आहे.