शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
4
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
5
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
6
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
7
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
8
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
9
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
10
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
11
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
12
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
13
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
14
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
15
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
16
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
17
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
18
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
19
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
20
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?

पाणीटंचाई मिटली; शेतीसाठी विसर्ग

By admin | Updated: August 10, 2016 01:42 IST

पावसाने जून महिना कोरडा गेल्याने वेल्हा, मुळशी व मावळ तालुका वगळता जिल्ह्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई असल्याने १२८ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता.

पुणे : पावसाने जून महिना कोरडा गेल्याने वेल्हा, मुळशी व मावळ तालुका वगळता जिल्ह्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई असल्याने १२८ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, जुलै व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे झपाट्याने टँकर कमी होऊन आता ३५ टँकरने जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरू आहे. तोही बारामती, दौैंड व पुरंदर या तीन तालुक्यांतच.त्यात सर्वाधिक २० टँकर बारामती तालुक्यात असून, पुरंदर १० व दौैंड तालुक्यात ५ टँकर सुरू आहेत. गेल्या वर्षी ५ जूननंतर जिल्ह्यात मॉन्सून सक्र्रिय होऊन तो सरासरीच्या १६०.०६ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात मेअखेर सुरू असलेले टँकर झपाट्याने कमी होऊन ते १८ वर आले होते. या वर्षीची परिस्थिती मात्र वेगळी आहे. मुळात जूनच्या सरासरीच्या तुलनेत निम्माही पाऊस झाला नाही. जून महिन्यात १४२.४० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. मात्र, जूनमध्ये फक्त ७८.९२ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवत होती. जून अखेरपर्यंत जिल्ह्यात १४७ टँकर सुरू होते. जून महिन्यात १२८ टँकरने ८४ गावे ८१७ वाड्यावस्त्यांवर सव्वातीन लाख लोकांना पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, जुलै महिन्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. जून व जुलै या दोन महिन्यांची सरासरी पावसाने ओलांडली. त्यामुळे टंचाईची तीव्रता कमी झाली. त्यानंतर काही काळ विश्रांती घेऊन आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. चार तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली असून, आणखी दोन तालुके त्या मार्गावर आहेत. परिणामी टँकर झपाट्याने कमी झाले आहेत. १२८ वरून आता ३५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दौंड तालुक्यात ५ टँकर सुरू असून, तेही पुढील काही दिवसांत बंद होतील. त्यामुळे बारामती व दौैंड वगळता जिल्हा टँकरमुक्त होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, नगर जिल्ह्यातील कर्जत, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांसह सोलापूर जिल्हा उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे.पुणे शहर व धरणक्षेत्रात गेल्या दहा दिवसांत मुसळधार पाऊस होत आहे. तेथील पावसाचे पाणी उजनीत गेल्या आठ दिवसांपासून येत आहे. त्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत दररोज वाढ होत आहे. वाढलेल्या या पाण्यामुळे मका, कडवळ, पिके पाण्याखाली गेली आहेत. दररोज पाणी वाढत असल्याने उजनीलगतच्या भिगवण ते हिंगणगाव पट्ट्यातील शेतकरी आनंदी झाला आहे.