शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

किनारपट्टीवर पाणीटंचाई

By admin | Updated: May 2, 2016 00:46 IST

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर यंदाच्या वर्षी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता दुष्काळजन्य परिस्थिती एवढी नसली तरी किनारपट्टी भागातील

- सिद्धेश आचरेकर,  मालवण

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर यंदाच्या वर्षी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता दुष्काळजन्य परिस्थिती एवढी नसली तरी किनारपट्टी भागातील ग्रामस्थांच्यात मात्र कोरड पडायला लावणारी आहे. गतवर्षी पाऊस कमी पडल्याने भूजल पातळीत घट झाल्याने मार्चपासून पाणीटंचाईचे चटके सहन करायची नामुष्की किनारपट्टीवासीयांवर ओढवली आहे.तळाशीलसह सर्जेकोट, देवबाग गावातील विहिरीत क्षारयुक्त पाणी मिळत आहे. गोड्या पाण्याच्या विहिरीत क्षारयुक्त पाणी मिळत असल्याने आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. मे महिन्यात खारट पाण्याची तीव्रता अधिक वाढणार असून यातून त्वचारोगासारखे आजार होण्याचीही शक्यता ग्रामस्थ वर्तवत आहेत. तालुक्यातील तळाशीलसह सजेर्कोट आणि देवबाग संगम या भागात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून येत्या आठ दिवसात तळाशील गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून न दिल्यास तळाशीलवासीय तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, तोंडवली-तळाशील येथील खारट पाणीप्रश्नी आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेत टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची होत असलेली हेळसांड थांबबावी यादृष्टीने प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही करण्यात येणे आवश्यक आहे. कारण सर्जेकोट येथील नागरिकांना दरदिवशी २00 प्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच तळाशील येथील पर्यटन व्यावसायिकांनाही पाणी विकत घेण्याची नामुश्की ओढवली आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा सुमार पाऊस पडल्याने किनारपट्टी भागातील विहिरीत भूजल पातळी घटली आहे. त्यात पाण्याचाही वापर वाढल्याने पाण्याची सरासरी पातळी घटली. त्यामुळे समुद्रातील खारट पाण्याचे स्त्रोत गोड्या पाण्यात मिसळून पिण्याचे पाणी क्षारयुक्त बनले आहे. विहिरींच्या पाण्यात क्षारतेचे प्रमाण वाढल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.तळाशील गावात दरवर्षी मे अखेरीस येथील विहिरीत क्षारयुक्त पाणी मिसळून खारट पाणी तयार होते. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने भूजल पातळी घटली. त्यामुळे गोड्या पाण्यात खारट पाणी मिसळायला सुरुवात झाली. दरवर्षी मे अखेरीस मिसळणारे हे पाणी यंदा मात्र फेब्रुवारीपासून सुरु झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या उभी राहिली आहे. याप्रश्नी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तळाशीलचे सर्व ग्रामस्थ तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढणार असल्याचा इशारा सरपंच संजय केळुसकर यांनी लोकमतला दिला आहे.