शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

साडेतीन हजार गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: June 1, 2015 04:36 IST

विविध कारणांमुळे पाणीपुरवठा योजनांचे काम होऊ न शकल्याने राज्यातील जवळपास साडेतीन हजार गावांत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली

बुलडाणा : विविध कारणांमुळे पाणीपुरवठा योजनांचे काम होऊ न शकल्याने राज्यातील जवळपास साडेतीन हजार गावांत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ यामध्ये १ हजार ८४६ गावे आणि १ हजार ८०२ वाड्यांचा समावेश आहे़ गत दोन वर्षांत पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबाजावणीत दिरंगाई झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे़ अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र योजना आहेत. शिवाय जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदींच्या नळपाणीपुरवठा योजना आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून गत दोन वर्षांमध्ये ९ हजार २६६ गाव-वाड्यांमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र उद्दिष्टपूर्ती न झाल्यामुळे अनेक योजना पूर्णत्वाकडे जाऊ शकल्या नाहीत़ अनेक योजनांच्या जलवाहिन्यांना गंज चढला आहे, जलकुंभ कोरडे पडले आहेत़ तसेच काही योजनांना वीज बिलाच्या थकबाकीचा आणि गावातील परस्परांतील वादाचा फटका बसला आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च होऊनही योजना कार्यान्वित होऊ न शकल्याने या भागातील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून २०१३-१४ या वर्षात ५०६६ गाववाड्यांच्या उद्दिष्टापैकी ४ हजार ६५ गाववाड्यांची कामे पूर्ण करण्यात आली. तर २०१४-१५ मध्ये ४ हजार २०० गाववाड्यांच्या उद्दिष्टांपैकी केवळ १ हजार ५५३ गाववाड्यांतील योजनांची कामे पूर्णत्वाकडे जाऊ श्कलेली आहेत़ तर ३ हजार ६४८ ठिकाणच्या पाणीपुरवठा योजना बंदावस्थेत आहेत. (प्रतिनिधी)