शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: June 1, 2015 04:36 IST

विविध कारणांमुळे पाणीपुरवठा योजनांचे काम होऊ न शकल्याने राज्यातील जवळपास साडेतीन हजार गावांत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली

बुलडाणा : विविध कारणांमुळे पाणीपुरवठा योजनांचे काम होऊ न शकल्याने राज्यातील जवळपास साडेतीन हजार गावांत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ यामध्ये १ हजार ८४६ गावे आणि १ हजार ८०२ वाड्यांचा समावेश आहे़ गत दोन वर्षांत पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबाजावणीत दिरंगाई झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे़ अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र योजना आहेत. शिवाय जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदींच्या नळपाणीपुरवठा योजना आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून गत दोन वर्षांमध्ये ९ हजार २६६ गाव-वाड्यांमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र उद्दिष्टपूर्ती न झाल्यामुळे अनेक योजना पूर्णत्वाकडे जाऊ शकल्या नाहीत़ अनेक योजनांच्या जलवाहिन्यांना गंज चढला आहे, जलकुंभ कोरडे पडले आहेत़ तसेच काही योजनांना वीज बिलाच्या थकबाकीचा आणि गावातील परस्परांतील वादाचा फटका बसला आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च होऊनही योजना कार्यान्वित होऊ न शकल्याने या भागातील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून २०१३-१४ या वर्षात ५०६६ गाववाड्यांच्या उद्दिष्टापैकी ४ हजार ६५ गाववाड्यांची कामे पूर्ण करण्यात आली. तर २०१४-१५ मध्ये ४ हजार २०० गाववाड्यांच्या उद्दिष्टांपैकी केवळ १ हजार ५५३ गाववाड्यांतील योजनांची कामे पूर्णत्वाकडे जाऊ श्कलेली आहेत़ तर ३ हजार ६४८ ठिकाणच्या पाणीपुरवठा योजना बंदावस्थेत आहेत. (प्रतिनिधी)