शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

साडेतीन हजार गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: June 1, 2015 04:36 IST

विविध कारणांमुळे पाणीपुरवठा योजनांचे काम होऊ न शकल्याने राज्यातील जवळपास साडेतीन हजार गावांत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली

बुलडाणा : विविध कारणांमुळे पाणीपुरवठा योजनांचे काम होऊ न शकल्याने राज्यातील जवळपास साडेतीन हजार गावांत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ यामध्ये १ हजार ८४६ गावे आणि १ हजार ८०२ वाड्यांचा समावेश आहे़ गत दोन वर्षांत पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबाजावणीत दिरंगाई झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे़ अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र योजना आहेत. शिवाय जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदींच्या नळपाणीपुरवठा योजना आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून गत दोन वर्षांमध्ये ९ हजार २६६ गाव-वाड्यांमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र उद्दिष्टपूर्ती न झाल्यामुळे अनेक योजना पूर्णत्वाकडे जाऊ शकल्या नाहीत़ अनेक योजनांच्या जलवाहिन्यांना गंज चढला आहे, जलकुंभ कोरडे पडले आहेत़ तसेच काही योजनांना वीज बिलाच्या थकबाकीचा आणि गावातील परस्परांतील वादाचा फटका बसला आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च होऊनही योजना कार्यान्वित होऊ न शकल्याने या भागातील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून २०१३-१४ या वर्षात ५०६६ गाववाड्यांच्या उद्दिष्टापैकी ४ हजार ६५ गाववाड्यांची कामे पूर्ण करण्यात आली. तर २०१४-१५ मध्ये ४ हजार २०० गाववाड्यांच्या उद्दिष्टांपैकी केवळ १ हजार ५५३ गाववाड्यांतील योजनांची कामे पूर्णत्वाकडे जाऊ श्कलेली आहेत़ तर ३ हजार ६४८ ठिकाणच्या पाणीपुरवठा योजना बंदावस्थेत आहेत. (प्रतिनिधी)