शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

पेण खारेपाटात पाणीटंचाईची समस्या

By admin | Updated: March 2, 2017 03:10 IST

१४ ग्रामपंचायतींमधील २८ गावे ३४ वाड्यांवर दरवर्षी उन्हाळ्यात उद्भवणारी भीषण पाणीटंचाई ही फार मोठी समस्या आहे.

पेण : पेणच्या वाशी खारेपाटातील १४ ग्रामपंचायतींमधील २८ गावे ३४ वाड्यांवर दरवर्षी उन्हाळ्यात उद्भवणारी भीषण पाणीटंचाई ही फार मोठी समस्या आहे. या समस्यापूर्ततेसाठी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकींवर पाणीप्रश्नामुळे तब्बल २५०० ग्रामस्थांनी बहिष्कार टाकू न आपला निषेध नोंदविला. ज्या शेकापला अडचणीत आणण्यासाठी ही राजकीय चाल खेळली होती. तीच खेळी विरोधकांवर बुमरँग होऊन विरोधकांनाच पाणी पाजण्यात शेकाप उमेदवार यशस्वी ठरले. ‘जो जिता वोही सिकंदर’ या नात्याने पेण खारेपाटाला टँकरमुक्त करणे हे शिवधनुष्य शेकापला पेलावे लागणार आहे. पेणमध्ये जिल्हा परिषद निवडणूक निकालात पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर सगळीकडे शेकापचे उमेदवार निवडून आले. पंचायत समितीच्या सभापती म्हणून स्मिता पेणकर या अनुसूचित जमाती आरक्षणच्या उमेदवार म्हणून निवडून आल्यात. त्यामुळे पंचायत समितीवर ७ सदस्यांसह एकहाती वर्चस्व शेकापने राखले. पंचायत समितीच्या मार्फत खारेपाटाला दरवर्षी टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. दरवर्षी ५० ते ५५ लाखांची तरतूद टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी होते. पेण पंंचायत समितीचा पाणीटंचाई कृती आराखडा तब्बल एक ते सव्वा कोटींच्या घरात असतो. मात्र, खरी टंचाईची झळ वाशी वडखळ खारेपाटातील १४ ग्रामपंचायतींमधील २७ गावे व ३४ वाड्यांना बसतो. त्यामुळे टंचाईच्या या आव्हानाचा सामना शेकापच्या नेत्यांनाच करावा लागणार आहे.३० कोटींची हेटवणे-शहापाडा पाणीपुरवठा योजनेच्या १५ कोटींच्या वर रकमेची निविदा प्रक्रि या पूर्ण झाली आहे. या १५ कोटींतून हेटवण्याचे पाणी शहापाडा धरणात पडणार. मात्र, त्यानंतरच्या पाणीपुरवठा करणाऱ्या वितरण प्रणालीवर शेकाप नेत्यांनी विशेष लक्षपूर्वक असे नियोजक केले. त्या निधीची पूर्णता व प्रशासकीय यंत्रणेमार्फत त्यांची प्रभावी अंमलबजावणी तातडीने व्हावी. तसे झाले नाही तर मात्र टँकरमुक्त खारेपाट हा तसाच राहील. शेवटी पेणमधील सर्वसत्ताधीश म्हणून शेकापच बाजीगर ठरलाय. (वार्ताहर)दरवर्षी ५0 ते ५५ लाखांची तरतूददरवर्षी ५० ते ५५ लाखांची तरतूद टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी होते. पेण पंंचायत समितीचा पाणीटंचाई कृती आराखडा तब्बल एक ते सव्वा कोटींच्या घरात असतो.खरी टंचाईची झळ वाशी वडखळ खारेपाटातील १४ ग्रामपंचायतींमधील २७ गावे व ३४ वाड्यांना बसतो. त्यामुळे टंचाईच्या या आव्हानाचा सामना शेकापच्या नेत्यांनाच करावा लागणार आहे.या त्रासातून सुटका करावी अशी नागरिकांची सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा आहे.