शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

जलसंपदाचे प्रकल्प ठप्प

By admin | Updated: September 10, 2015 03:50 IST

राज्यातील जलसंपदाचे सगळे प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी ठप्प झालेले असताना शासनाने बुधवारी रात्री उशिरा जीआर काढून सगळी जबाबदारी अधिकाऱ्यांवर टाकून दिली आहे.

- अतुल कुलकर्णी,  मुंबई राज्यातील जलसंपदाचे सगळे प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी ठप्प झालेले असताना शासनाने बुधवारी रात्री उशिरा जीआर काढून सगळी जबाबदारी अधिकाऱ्यांवर टाकून दिली आहे. जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या आणि मुख्य सचिवांच्या नियामक मंडळाने किंवा मंत्रिमंडळाने एखाद्या प्रकल्पाला मान्यता दिली तरी अंतिम जबाबदारी मात्र प्रकल्प राबविणाऱ्या अधिकाऱ्यांचीच असेल, असेही या आदेशाने स्पष्ट केले आहे.गेल्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांना चौकशीच्या जाळ्यात ओढले जात आहे. त्यावर हा आदेश आल्याने फिल्डवर काम करणारे अधिकारी-कर्मचारी कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार होणार नाहीत, असे एका सेवानिवृत्त ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांनी विदर्भातील ३२ प्रकल्पांना मान्यता दिली. त्यानंतर सिंचन विभागात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी केला होता. नव्या आदेशानुसार जलसंपदा मंत्री अध्यक्ष आणि मुख्य सचिवांसह अनेक सचिव सदस्य असणारे नियामक मंडळ त्यांच्याकडे मान्यतेसाठी आलेला प्रकल्प मंजुरी न देता मंत्रिमंडळापुढे पाठवू शकतात. मंत्रिमंडळाने अशा प्रकल्पाला मान्यता दिली तरीही प्रकल्प पूर्तीची जबाबदारी अधिकाऱ्यांचीच असेल. सचिव दर्जाचे अधिकारी मान्यता तर देतील; पण जबाबदारी मात्र खालच्या अधिकाऱ्यांचीच राहील, असे आदेशात स्पष्ट केल्यामुळे भविष्यात जलसिंचन प्रकल्पांना गती मिळणे कठीण होऊन बसणार आहे.गेले १० महिने यावर काथ्याकुट चालू होता. सगळे प्रकरण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह सचिवांचा ताफा चर्चेला बसला. मात्र राज्यपालांनी कायद्यानुसारच काम करावे लागेल; त्यात बदल करण्याचा अधिकार आपल्याला नाही, असे म्हणून हात वरती केले. परिणामी नव्याने आदेश जारी करण्याचे ठरले. या सगळ्या गदारोळात राज्यातील प्रकल्पांचे काम ठप्प झाले आहे. यावर्षी अमुक एवढे प्रकल्प कागदावरून कायमचे संपवून टाकू, असे सांंगून झाले पण एकाही प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. सुप्रमा कोणी द्यायच्या याचा जीआर निघाला आहे. गेल्या चार वर्षांत याच कारणामुळे कामे झाली नव्हती. आम्ही त्यात स्पष्टता आणली आहे. आता तातडीने मंजुऱ्या दिल्या जातील. गेल्या १० महिन्यांत निधी मंजूर असतानाही तो वितरीत करता आला नाही. अमरावती विभागात ४ हजार कोटी पडून आहेत. आता जबाबदाऱ्या निश्चित झाल्यामुळे कामांना गती येईल.- गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री