शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

भंडारदऱ्याचे पाणी जायकवाडीच्या दिशेने

By admin | Updated: July 31, 2015 01:08 IST

अहमदनगर जिल्ह्यातील ओझर वेअरचे दोन्ही कालवे बंद करून अखेर गुरुवारी भंडारदऱ्याचे पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आले. धरणात हंगामातील सर्वात मोठी आवकही नोंदविली गेली.

पैठण : अहमदनगर जिल्ह्यातील ओझर वेअरचे दोन्ही कालवे बंद करून अखेर गुरुवारी भंडारदऱ्याचे पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आले. धरणात हंगामातील सर्वात मोठी आवकही नोंदविली गेली. धरणात सकाळपासून २८,७२९ क्युसेक क्षमतेने पाण्याची आवक होत होती. नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून ८५१ क्युसेक व निळवंडे धरणातून ८०० क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू होता. पुढे हे पाणी निळवंडेतून ओझर वेअरमध्ये येते. तेथून प्रवरा नदीच्या पात्रातून जायकवाडीकडे झेपावते. मात्र, नगर जिल्ह्यातील नेत्यांनी हे पाणी जायकवाडी धरणाकडे येऊ नये म्हणून ओझर वेअरचे दोन्ही कालवे सुरू केले होते. जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या नियमानुसार कालव्याद्वारे सिंचनासाठी वा जलभरण करण्यासाठी कालव्याद्वारे पाणी वळविता येत नाही. मात्र भंडारदऱ्याचे पाणी वळवून जायकवाडीच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारण्यात येत होता. पाण्यावरील हा दरोडा ‘लोकमत’ने उजेडात आणताच जलसंपदा विभागात खळबळ उडाली आणि जायकवाडीच्या दिशेने प्रवरेच्या पात्रात ४६८ क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्यास प्रारंभ झाला. ८० दलघमी पाण्याची आवक झाल्याची माहिती अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.