शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

पाण्याचे साठे पिण्यासाठीच राखीव

By admin | Updated: July 2, 2014 04:20 IST

पावसाचे आगमन लांबल्यामुळे राज्यातील पाण्याचे सर्व उपलब्ध साठे पिण्यासाठीच राखीव ठेवले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली

मुंबई : पावसाचे आगमन लांबल्यामुळे राज्यातील पाण्याचे सर्व उपलब्ध साठे पिण्यासाठीच राखीव ठेवले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. तसेच दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता कर्जाची चिंताही करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. कृषी दिनानिमित्त वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, काही शहरे आणि गावांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे टंचाईचा आढावा घेतला आहे. मी स्वत: नाशिक, पुणे आणि पालघर येथे आढावा बैठका घेतल्या आहेत. काही शहरांमध्ये पाणीकपात करावी लागत आहे. राज्यात काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. राज्य सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. कुठल्याही शेतकऱ्याला कर्जाची चिंता करण्याची गरज नाही. प्रसंगी शेतकऱ्यांच्या कर्जाचे, व्याजाचे पुनर्गठन, कर्जाच्या हफ्त्याची सोयीनुसार पुनर्रचना आदी उपाययोजना केल्या जातील, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. (प्रतिनिधी)