शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

ठाणे आणि नवी मुंबईला मिळणार रेल्वे धरणातून पाणी - सुरेश प्रभू

By admin | Updated: April 23, 2016 15:54 IST

ठाणे आणि नवी मुंबईतील पाणीसमस्या सोडवण्यासाठी सुरेश प्रभू यांनी रेल्वेसाठी वापरण्यात येणा-या धरणांमधून पाणी सोडण्याचा आदेश दिला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २३ - दुष्काळग्रस्त लातूरला 'जलदूत एक्र्स्पेस'ने पाणी पोहोचवल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ठाणे आणि नवी मुंबईकरांची पाणी समस्या सोडवण्यासाठी पाऊल उचललं आहे. ठाणे आणि नवी मुंबईतील पाणीसमस्या सोडवण्यासाठी सुरेश प्रभू यांनी रेल्वेसाठी वापरण्यात येणा-या धरणांमधून पाणी सोडण्याचा आदेश दिला आहे. सुरेश प्रभू यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 
 
'ठाण्यातील रेल्वे धरण नवी मुंबईला पाणीपुरवठा करुन त्यांना मदत करत आहे. त्याचप्रमाणे आता आम्ही ठाणे महापालिकेला पाणीपुरवठा करुन मदत करणार आहोत', असं ट्विट सुरेश प्रभू यांनी केलं आहे. या धरणांमधील पाणी रेल्वेच्या गरजांसाठी वापरण्यात येतं. आता हे पाणी ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांना पुरवण्यात येईल असं सुरेश प्रभू यांनी सांगितलं आहे.
 
ठाण्यातील अनेक भांगात पाणीकपात करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आठवड्यातील 60 तास ठाण्याचा पाणीपुरवठा बंद करण्याची घोषणा केली आहे. अनेक ठिकाणी आठवड्यातील फक्त 4 दिवस पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. ठाण्याला तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. ठाण्यात 30 तलाव आणि 500 बोअरवेल असतानाही गंभीर पाणीसमस्येला सामोरं जावं लागत आहे. 
 
लातूरमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. त्यासाठी रेल्वे जलदूत एक्र्स्पेसच्या सहाय्याने पाणीपुरवठा करत आहे. मराठवाड्यामध्ये शतकातील भीषण दुष्काळ पडला असून मुख्य 11 धरणं पुर्णपणे कोरडी पडली आहेत.