शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे आणि नवी मुंबईला मिळणार रेल्वे धरणातून पाणी - सुरेश प्रभू

By admin | Updated: April 23, 2016 15:54 IST

ठाणे आणि नवी मुंबईतील पाणीसमस्या सोडवण्यासाठी सुरेश प्रभू यांनी रेल्वेसाठी वापरण्यात येणा-या धरणांमधून पाणी सोडण्याचा आदेश दिला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २३ - दुष्काळग्रस्त लातूरला 'जलदूत एक्र्स्पेस'ने पाणी पोहोचवल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ठाणे आणि नवी मुंबईकरांची पाणी समस्या सोडवण्यासाठी पाऊल उचललं आहे. ठाणे आणि नवी मुंबईतील पाणीसमस्या सोडवण्यासाठी सुरेश प्रभू यांनी रेल्वेसाठी वापरण्यात येणा-या धरणांमधून पाणी सोडण्याचा आदेश दिला आहे. सुरेश प्रभू यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 
 
'ठाण्यातील रेल्वे धरण नवी मुंबईला पाणीपुरवठा करुन त्यांना मदत करत आहे. त्याचप्रमाणे आता आम्ही ठाणे महापालिकेला पाणीपुरवठा करुन मदत करणार आहोत', असं ट्विट सुरेश प्रभू यांनी केलं आहे. या धरणांमधील पाणी रेल्वेच्या गरजांसाठी वापरण्यात येतं. आता हे पाणी ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांना पुरवण्यात येईल असं सुरेश प्रभू यांनी सांगितलं आहे.
 
ठाण्यातील अनेक भांगात पाणीकपात करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आठवड्यातील 60 तास ठाण्याचा पाणीपुरवठा बंद करण्याची घोषणा केली आहे. अनेक ठिकाणी आठवड्यातील फक्त 4 दिवस पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. ठाण्याला तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. ठाण्यात 30 तलाव आणि 500 बोअरवेल असतानाही गंभीर पाणीसमस्येला सामोरं जावं लागत आहे. 
 
लातूरमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. त्यासाठी रेल्वे जलदूत एक्र्स्पेसच्या सहाय्याने पाणीपुरवठा करत आहे. मराठवाड्यामध्ये शतकातील भीषण दुष्काळ पडला असून मुख्य 11 धरणं पुर्णपणे कोरडी पडली आहेत.