शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

दावडी परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: April 6, 2017 00:47 IST

भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

दावडी : भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांना पाणी मिळत नाही. उन्हाळी पिके जळून गेली आहेत. चासकमान धरणातून दोन दिवसांत पाणी नदीपात्रात सोडा; अन्यथा चासकमान डावा कालवा फोडून नदीपात्रात पाणी सोडणार, असा इशारा देत शेतकऱ्यांनी चासकमान प्रकल्पाधिकारी खेड यांच्या कार्यालयासमोर ‘ठिय्या आंदोलन’ केले.तालुक्याच्या पूर्वभागात भीमा नदीपात्रात होलेवाडी, खरपुडी, वाटेकरवाडी, निमगाव येथे छोटे-मोठे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहे. या बंधाऱ्याला मोठ्याप्रमाणात गळती आहे. दररोज लाखो लिटर पाण्याची गळती सुरू आहे. त्यातच उन्हाचा तडाखा, तसेच सतत उन्हाळी पिकांसाठी पाण्याचा उपसा सुरू असल्याने बंधाऱ्यातील पाण्याची पातळी झपाट्याने खालवत आहे. मांजरेवाडी (पिंपळ), शिरोली, मलघेवाडी सातकरस्थळ येथून जाणारी भीमा नदी कोरडी पडली आहे. येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी चासकमान धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदीपात्रात चासकमान धरणाचे पाणी सोडा, अशी मागणी करूनही अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करत आहे. नदीपात्रात पाणीच नसल्यामुळे पात्रालगत असलेल्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीकाठावरील गावातील शेतकरी भीमा नदीत पाणी सोडा, अशी गावा-गावांतील मागणी शेतकरी करत असताना प्रशासन सुस्त असल्याने आज थेट राजगुरुनगर येथील चासकमान विभागाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढून ‘ठिय्या आंदोलन’ केले. यावेळी अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळ शिरोलीचे माजी सरपंच रवी सावंत, संतोष सांडभोर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष विलास मांजरे, शिवसेनेचे विभाग प्रमुख बाळासाहेब मांजरे, मांजरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य अशोक मांजरे, माजी सरपंच काळुराम मांजरे, मनोहर मांजरे, विलास मांजरे, बाबूराव मांजरे, सुनील मांजरे, काळुराम मांजरे, लक्ष्मण मांजरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)>दोन दिवसांत चासकमान धरणातून नदीपात्रात पाणी न सोडल्यास व शेतकऱ्यांना पाण्यासाठी वेठीस धरल्यास चासकमान धरणाचा वाहणारा डावा कालवा जेसीब यंत्राने फोडू व नदीपात्रात पाणी आणू, असा इशारा शेतकऱ्यांनी आक्रमक होत दिला. दरम्यान, शाखा आभियंता बी. आर. खेडकर यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले.