शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

दावडी परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: April 6, 2017 00:47 IST

भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

दावडी : भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांना पाणी मिळत नाही. उन्हाळी पिके जळून गेली आहेत. चासकमान धरणातून दोन दिवसांत पाणी नदीपात्रात सोडा; अन्यथा चासकमान डावा कालवा फोडून नदीपात्रात पाणी सोडणार, असा इशारा देत शेतकऱ्यांनी चासकमान प्रकल्पाधिकारी खेड यांच्या कार्यालयासमोर ‘ठिय्या आंदोलन’ केले.तालुक्याच्या पूर्वभागात भीमा नदीपात्रात होलेवाडी, खरपुडी, वाटेकरवाडी, निमगाव येथे छोटे-मोठे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहे. या बंधाऱ्याला मोठ्याप्रमाणात गळती आहे. दररोज लाखो लिटर पाण्याची गळती सुरू आहे. त्यातच उन्हाचा तडाखा, तसेच सतत उन्हाळी पिकांसाठी पाण्याचा उपसा सुरू असल्याने बंधाऱ्यातील पाण्याची पातळी झपाट्याने खालवत आहे. मांजरेवाडी (पिंपळ), शिरोली, मलघेवाडी सातकरस्थळ येथून जाणारी भीमा नदी कोरडी पडली आहे. येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी चासकमान धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदीपात्रात चासकमान धरणाचे पाणी सोडा, अशी मागणी करूनही अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करत आहे. नदीपात्रात पाणीच नसल्यामुळे पात्रालगत असलेल्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीकाठावरील गावातील शेतकरी भीमा नदीत पाणी सोडा, अशी गावा-गावांतील मागणी शेतकरी करत असताना प्रशासन सुस्त असल्याने आज थेट राजगुरुनगर येथील चासकमान विभागाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढून ‘ठिय्या आंदोलन’ केले. यावेळी अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळ शिरोलीचे माजी सरपंच रवी सावंत, संतोष सांडभोर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष विलास मांजरे, शिवसेनेचे विभाग प्रमुख बाळासाहेब मांजरे, मांजरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य अशोक मांजरे, माजी सरपंच काळुराम मांजरे, मनोहर मांजरे, विलास मांजरे, बाबूराव मांजरे, सुनील मांजरे, काळुराम मांजरे, लक्ष्मण मांजरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)>दोन दिवसांत चासकमान धरणातून नदीपात्रात पाणी न सोडल्यास व शेतकऱ्यांना पाण्यासाठी वेठीस धरल्यास चासकमान धरणाचा वाहणारा डावा कालवा जेसीब यंत्राने फोडू व नदीपात्रात पाणी आणू, असा इशारा शेतकऱ्यांनी आक्रमक होत दिला. दरम्यान, शाखा आभियंता बी. आर. खेडकर यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले.