शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बाराबंगला वसाहतीत पाण्याची बोंब

By admin | Updated: July 13, 2017 04:24 IST

शासकीय वसाहतींच्या आवारात राहणाऱ्या व अधिकाऱ्यांच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बांधकाम विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यासारख्या बड्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या बाराबंगला परिसरातील शासकीय वसाहतींच्या आवारात राहणाऱ्या व अधिकाऱ्यांच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाण्याची नवी जोडणी हवी असेल, तर या गोरगरिबांकडे बांधकाम विभागाचे कर्मचारी आठ ते दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करीत आहेत. ठाणे पूर्व येथील बाराबंगल्यातील शासकीय वसाहतीमधील ‘इंद्रायणी’ बंगल्याच्या आवारात असलेल्या शासकीय वसाहतीत राहणारा नोकरवर्ग गेला एक महिना पाण्यासाठी वणवण फिरत आहे. तातडीने पाणी हवे असल्यास पाइपलाइनसाठी आठ हजार रुपये द्यावे लागतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्याने येथील रहिवाशांना सांगितले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बारा बंगला या शासकीय वसाहतीच्या आऊट हाऊसमध्ये २५ ते ३० वर्षांपासून हे रहिवासी या वसाहतीत वास्तव्य करीत आहे. कधी पाण्याच्या, कधी झाड कोसळण्याच्या, तर कधी छप्पर गळण्याच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. तक्रार केल्यास नोकरीवर गंडांतर येण्याच्या भीतीने काही गप्प बसतात.‘इंद्रायणी’ बंगल्याच्या आवारात २५ वर्षांहून अधिक काळ चार कुटुंबे राहतात. एक महिन्यापासून त्यांच्या घरात पाणी नाही. इथूनतिथून जाऊन पाणी आणावे लागते. पाणी भरूनभरून हाडे दुखायला लागली आहेत, असे या महिलांनी सांगितले. पाणी भरताभरता तर एका रहिवाशाला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, काही बंगल्यांतील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी दाबाने तेही केवळ अर्धा तासच पाणी येत असल्याची व्यथा त्यांनी मांडली. याबाबत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे.एम. गांगुर्डे यांनी सांगितले की, मी स्वत: बाराबंगल्यात राहतो. पाण्याची कोणतीही समस्या तेथे नाही. पाण्यासंदर्भात कोणत्याही तक्रारी माझ्याकडे तरी आलेल्या नाहीत. संबंधित कर्मचाऱ्याने पाण्याच्या व्यवस्थेसाठी ‘इंद्रायणी’ बंगल्यातील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांकडून पैसे मागितले असल्याबाबत त्यांना विचारणा केली असता मी याविषयी माहिती घेऊन बोलतो, असे सांगितले. >शासकीय बंगल्यांच्या आवारातच अव्यवस्थाशासकीय निवासस्थान म्हणून बाराबंगला परिसर ओळखला जातो. येथे अनेक शासकीय अधिकारी राहतात. त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था बंगल्याच्या आवारातच करण्यात आलेली आहे. येथील बंगल्यात मुबलक पाणीपुरवठा होत असताना या कर्मचाऱ्यांच्या जीर्ण वसाहतींमध्ये पाण्याची बोंब आहे. याचबरोबर २५ ते ३० वर्षांपासून हे रहिवासी या वसाहतीत वास्तव्य करीत आहे. कधी पाण्याच्या, कधी झाड कोसळण्याच्या, तर कधी छप्पर गळण्याच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.