शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

मिरजेचे पाणी रेल्वेने लातूरला

By admin | Updated: April 6, 2016 04:59 IST

लातूर शहरासाठी येत्या १५ दिवसांत मिरजेहून रेल्वेने पाणी आणले जाणार आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी लातूर येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

लातूर/मिरज/पुणे : लातूर शहरासाठी येत्या १५ दिवसांत मिरजेहून रेल्वेने पाणी आणले जाणार आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी लातूर येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मिरज रेल्वे स्थानकालाही भेट देऊन खडसे यांनी तयारीची माहिती घेतली. लातूरकरांची तहान भागवण्यासाठी मध्य रेल्वे, तसेच राज्य प्रशासनानेही जय्यत तयारी केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.लातूरच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आम्हाला पंढरपूरहून रेल्वेने पाणी देण्यास तीन आठवड्यांपूर्वीच मंजुरी दिली आहे, परंतु तिथून पाण्याचा होणारा अपव्यय परवडणारा नसल्याने मिरजेची निवड करण्यात आली आहे. मिरज - लातूर रेल्वेट्रॅक आहे. महसूल आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत हीच बाब सोयीची असल्याचे लक्षात आले आहे. लातूर रेल्वे स्थानकात पाणी आल्यानंतर ते विहिरीत सोडणे आणि तिथून हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नेणे, अथवा त्याचे वाटप करण्यासंबंधीच्या योजना याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. वारणा धरणात पुरेसा पाणीसाठा असून, पुढील सहा महिने पुरेल एवढे पाणी शिल्लक असल्याने, लातूरला पाणी देण्यास कोणतीही अडचण नसल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले. रेल्वेची तयारी पूर्णपाणी वाहतूक करण्यासाठी इंधन टँकरचाच वापर करण्यात येणार असून, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून त्यासंबंधी प्राथमिक आराखडा तयार केला आहे. हे पाणी घेण्यासाठी राजस्थानमधील कोटा येथून ५० टँकर असलेला रेक (पाण्याचे टँकर असलेली रेल्वेगाडी) तयार करण्यात येत असून, त्यातील २५ टँकरच्या स्वच्छतेचे काम पूर्ण झाले आहे, तर आणखी २५ टँकरच्या स्वच्छतेचे काम ९ एप्रिलपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वेच्या पुणे कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)