शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

निढळने राज्याला दिला जलसंधारणाचा संदेश

By admin | Updated: June 8, 2015 00:47 IST

शशिकांत शिंंदे : चंद्रकांत दळवींकडून लोकहिताच्या योजना

पुसेगाव : ‘निढळला जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा लाभ तसेच येथील पंचतारांकित एमआयडीसीसाठी कण्हेर धरणातून पाणी आरक्षित करण्यात आले आहे. सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी कल्पकता व दूरदृष्टीच्या जोरावर गाव केंद्रबिंदू मानून अनेक लोकहिताच्या योजना तयार केल्या आणि शासनाने त्या यशस्वीपणे राबविल्या म्हणूनच निढळ हे छोटेसे गाव देशाच्या नकाशावर झळकत आहे. निढळने तर राज्याला जलसंधारणाचा संदेश दिला आहे,’ असे गौरवोद्गार माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी काढले. निढळ, ता. खटाव येथील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी अध्यक्षस्थानी होते. उद्योजक गजानन खुस्पे, सतीश फडतरे, अर्जुन वलेकर, मारुती ठोंबरे, पै. सागर साळुंखे, सरपंच संगीता इंजे, उपसरपंच श्रीमंत निर्मळ, सोसायटीचे अध्यक्ष किसन पाटील, उपाध्यक्ष शैलेश मोहिते, जोतिराम घाडगे, अभिषेक दळवी, संदीप सत्रे, दत्तात्रय खुस्पे, उबंरमळेचे सरपंच नवनाथ वलेकर, अशोक खुस्पे, अशोक यादव, विलास पाटोळे, विजय शिंदे, संतोष खुस्पे, दिनकर खुस्पे, जगन्नाथ दळवी, तुकाराम यादव, बळीराम ठोंबरे, बाळासाहेब ठोंबरे, रामचंद्र ठोंबरे, संतोष ठोंबरे, निवृत्ती ठोंबरे, दिलीप ठोंबरे, सुधीर ठोंबरे, कातळगेवाडीचे उपसरपंच भरत मोरे, संदीप जाधव, भगवान जाधव उपस्थित होते.आमदार शिंदे म्हणाले, ‘१९७२ च्या दुष्काळामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात पाझर तलावांची कामे झाली आहेत. परंतु त्या कामांकडे वेळीच लक्ष न दिल्याने पाझर तलावाची गळती, गाळ साठणे अशा या परिस्थितीमुळे पाणीसाठा अद्यापही होत नव्हता. अनेक साईट्स उपलब्ध असतानाही बंधाऱ्यांची कामे न झाल्याने पावसाचे पाणी वाहून जात होते. पाण्याचे गांभीर्य ओळखून कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पाझर तलाव दुरुस्ती, खोलीकरण, रुंदीकरण, नवीन सिमेंट बंधारे कामांसाठी निधी उपलब्ध करून प्रत्यक्षात कामे मार्गी लावली. पाणी साठवण क्षमतेत चांगलीच वाढ झाल्यामुळे शेतजमिनीला फायदा होऊ लागला आहे.’पाच वर्षांत मतदारसंघात ९५० कोटींची विकासकामे मार्गी लावली. निढळ ग्रामस्थ आणि त्यांचे मार्गदर्शक चंद्रकांत दळवी यांनी केलेले कार्य आदर्शवत आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी निढळला भेट देऊन कौतुकाची थाप टाकावी. यासाठी त्यांना निढळला आणण्यासाठी आग्रह धरणार आहे, असेही त्यांनी सांगितले. विजय गुरव यांनी प्रास्ताविक केले. संतोष खुस्पे यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर) सर्वांसमोर इतिहास उभा...४पावसाच्या पाण्याचा थेंबन्थेंब जमिनीत मुरला पाहिजे. पावसाचे पाणी अडविले जावे, ओढ्यांना स्वच्छ पाण्याचा पूर यावा, यासाठी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी व ग्रामस्थांनी एकसंधतेने पुढाकार घेऊन दहा वर्षांपूर्वी साखळी सिमेंट बंधारे, माती नालाबांधसह जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करून जलक्रांती करण्याचा इतिहास केला आहे. हा इतिहास संपूर्ण राज्यापुढे निढळकरांनी उभा केला आहे