शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

निढळने राज्याला दिला जलसंधारणाचा संदेश

By admin | Updated: June 8, 2015 00:47 IST

शशिकांत शिंंदे : चंद्रकांत दळवींकडून लोकहिताच्या योजना

पुसेगाव : ‘निढळला जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा लाभ तसेच येथील पंचतारांकित एमआयडीसीसाठी कण्हेर धरणातून पाणी आरक्षित करण्यात आले आहे. सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी कल्पकता व दूरदृष्टीच्या जोरावर गाव केंद्रबिंदू मानून अनेक लोकहिताच्या योजना तयार केल्या आणि शासनाने त्या यशस्वीपणे राबविल्या म्हणूनच निढळ हे छोटेसे गाव देशाच्या नकाशावर झळकत आहे. निढळने तर राज्याला जलसंधारणाचा संदेश दिला आहे,’ असे गौरवोद्गार माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी काढले. निढळ, ता. खटाव येथील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी अध्यक्षस्थानी होते. उद्योजक गजानन खुस्पे, सतीश फडतरे, अर्जुन वलेकर, मारुती ठोंबरे, पै. सागर साळुंखे, सरपंच संगीता इंजे, उपसरपंच श्रीमंत निर्मळ, सोसायटीचे अध्यक्ष किसन पाटील, उपाध्यक्ष शैलेश मोहिते, जोतिराम घाडगे, अभिषेक दळवी, संदीप सत्रे, दत्तात्रय खुस्पे, उबंरमळेचे सरपंच नवनाथ वलेकर, अशोक खुस्पे, अशोक यादव, विलास पाटोळे, विजय शिंदे, संतोष खुस्पे, दिनकर खुस्पे, जगन्नाथ दळवी, तुकाराम यादव, बळीराम ठोंबरे, बाळासाहेब ठोंबरे, रामचंद्र ठोंबरे, संतोष ठोंबरे, निवृत्ती ठोंबरे, दिलीप ठोंबरे, सुधीर ठोंबरे, कातळगेवाडीचे उपसरपंच भरत मोरे, संदीप जाधव, भगवान जाधव उपस्थित होते.आमदार शिंदे म्हणाले, ‘१९७२ च्या दुष्काळामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात पाझर तलावांची कामे झाली आहेत. परंतु त्या कामांकडे वेळीच लक्ष न दिल्याने पाझर तलावाची गळती, गाळ साठणे अशा या परिस्थितीमुळे पाणीसाठा अद्यापही होत नव्हता. अनेक साईट्स उपलब्ध असतानाही बंधाऱ्यांची कामे न झाल्याने पावसाचे पाणी वाहून जात होते. पाण्याचे गांभीर्य ओळखून कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पाझर तलाव दुरुस्ती, खोलीकरण, रुंदीकरण, नवीन सिमेंट बंधारे कामांसाठी निधी उपलब्ध करून प्रत्यक्षात कामे मार्गी लावली. पाणी साठवण क्षमतेत चांगलीच वाढ झाल्यामुळे शेतजमिनीला फायदा होऊ लागला आहे.’पाच वर्षांत मतदारसंघात ९५० कोटींची विकासकामे मार्गी लावली. निढळ ग्रामस्थ आणि त्यांचे मार्गदर्शक चंद्रकांत दळवी यांनी केलेले कार्य आदर्शवत आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी निढळला भेट देऊन कौतुकाची थाप टाकावी. यासाठी त्यांना निढळला आणण्यासाठी आग्रह धरणार आहे, असेही त्यांनी सांगितले. विजय गुरव यांनी प्रास्ताविक केले. संतोष खुस्पे यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर) सर्वांसमोर इतिहास उभा...४पावसाच्या पाण्याचा थेंबन्थेंब जमिनीत मुरला पाहिजे. पावसाचे पाणी अडविले जावे, ओढ्यांना स्वच्छ पाण्याचा पूर यावा, यासाठी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी व ग्रामस्थांनी एकसंधतेने पुढाकार घेऊन दहा वर्षांपूर्वी साखळी सिमेंट बंधारे, माती नालाबांधसह जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करून जलक्रांती करण्याचा इतिहास केला आहे. हा इतिहास संपूर्ण राज्यापुढे निढळकरांनी उभा केला आहे