शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निढळने राज्याला दिला जलसंधारणाचा संदेश

By admin | Updated: June 8, 2015 00:47 IST

शशिकांत शिंंदे : चंद्रकांत दळवींकडून लोकहिताच्या योजना

पुसेगाव : ‘निढळला जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा लाभ तसेच येथील पंचतारांकित एमआयडीसीसाठी कण्हेर धरणातून पाणी आरक्षित करण्यात आले आहे. सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी कल्पकता व दूरदृष्टीच्या जोरावर गाव केंद्रबिंदू मानून अनेक लोकहिताच्या योजना तयार केल्या आणि शासनाने त्या यशस्वीपणे राबविल्या म्हणूनच निढळ हे छोटेसे गाव देशाच्या नकाशावर झळकत आहे. निढळने तर राज्याला जलसंधारणाचा संदेश दिला आहे,’ असे गौरवोद्गार माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी काढले. निढळ, ता. खटाव येथील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी अध्यक्षस्थानी होते. उद्योजक गजानन खुस्पे, सतीश फडतरे, अर्जुन वलेकर, मारुती ठोंबरे, पै. सागर साळुंखे, सरपंच संगीता इंजे, उपसरपंच श्रीमंत निर्मळ, सोसायटीचे अध्यक्ष किसन पाटील, उपाध्यक्ष शैलेश मोहिते, जोतिराम घाडगे, अभिषेक दळवी, संदीप सत्रे, दत्तात्रय खुस्पे, उबंरमळेचे सरपंच नवनाथ वलेकर, अशोक खुस्पे, अशोक यादव, विलास पाटोळे, विजय शिंदे, संतोष खुस्पे, दिनकर खुस्पे, जगन्नाथ दळवी, तुकाराम यादव, बळीराम ठोंबरे, बाळासाहेब ठोंबरे, रामचंद्र ठोंबरे, संतोष ठोंबरे, निवृत्ती ठोंबरे, दिलीप ठोंबरे, सुधीर ठोंबरे, कातळगेवाडीचे उपसरपंच भरत मोरे, संदीप जाधव, भगवान जाधव उपस्थित होते.आमदार शिंदे म्हणाले, ‘१९७२ च्या दुष्काळामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात पाझर तलावांची कामे झाली आहेत. परंतु त्या कामांकडे वेळीच लक्ष न दिल्याने पाझर तलावाची गळती, गाळ साठणे अशा या परिस्थितीमुळे पाणीसाठा अद्यापही होत नव्हता. अनेक साईट्स उपलब्ध असतानाही बंधाऱ्यांची कामे न झाल्याने पावसाचे पाणी वाहून जात होते. पाण्याचे गांभीर्य ओळखून कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पाझर तलाव दुरुस्ती, खोलीकरण, रुंदीकरण, नवीन सिमेंट बंधारे कामांसाठी निधी उपलब्ध करून प्रत्यक्षात कामे मार्गी लावली. पाणी साठवण क्षमतेत चांगलीच वाढ झाल्यामुळे शेतजमिनीला फायदा होऊ लागला आहे.’पाच वर्षांत मतदारसंघात ९५० कोटींची विकासकामे मार्गी लावली. निढळ ग्रामस्थ आणि त्यांचे मार्गदर्शक चंद्रकांत दळवी यांनी केलेले कार्य आदर्शवत आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी निढळला भेट देऊन कौतुकाची थाप टाकावी. यासाठी त्यांना निढळला आणण्यासाठी आग्रह धरणार आहे, असेही त्यांनी सांगितले. विजय गुरव यांनी प्रास्ताविक केले. संतोष खुस्पे यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर) सर्वांसमोर इतिहास उभा...४पावसाच्या पाण्याचा थेंबन्थेंब जमिनीत मुरला पाहिजे. पावसाचे पाणी अडविले जावे, ओढ्यांना स्वच्छ पाण्याचा पूर यावा, यासाठी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी व ग्रामस्थांनी एकसंधतेने पुढाकार घेऊन दहा वर्षांपूर्वी साखळी सिमेंट बंधारे, माती नालाबांधसह जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करून जलक्रांती करण्याचा इतिहास केला आहे. हा इतिहास संपूर्ण राज्यापुढे निढळकरांनी उभा केला आहे