शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

अखेर कुकसा प्रकल्पातून सिंचनासाठी सोडले पाणी !

By admin | Updated: January 1, 2017 18:35 IST

कुकसा प्रकल्पातून शेती सिंचनासाठी कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी मागील काही दिवसांपासून मध्येच अडविण्यात येत होते.

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 1 - शिरपूर जैन इथल्या कुकसा प्रकल्पातून शेती सिंचनासाठी कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी मागील काही दिवसांपासून मध्येच अडविण्यात येत होते. या संदर्भात लोकमतने २६ डिसेंबरच्या अंकात पाणी रोखल्याने रब्बी पिके संकटात या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत लघू पाटबंधारे विभागाने रविवार प्रकल्पातून पाणी सोडले.मालेगाव तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या; परंतु रिसोड तालुक्यात असलेल्या कुकसा येथे काच नदीवर काही महिन्यांपूर्वीच जलप्रकल्पाची उभारणी करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील केनवड, जोगेश्वर, कुकसा, गणेशपूर, अंचल अशा काही गावांतील साडेसहाशे हेक्टर शेतीला त्याचा फायदा होऊ लागला आणि शेतकरी या प्रकल्पाच्या पाण्यावर सिंचन करू लागले. यामध्ये पेनबोरी येथील शेकडो शेतकऱ्यांचा समावेश आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने कुकसा प्रकल्पात मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्रात किंवा रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली असून, पेनबोरी येथील शेतकऱ्यांनाही या प्रकपातून पाणी देण्याचा ठराव झाला आणि यावेळी मोठ्या प्रमाणात हळद, गहू, हरभरा या पिकांची पेरणी केली. कुकसा प्रकल्पातून वेळेवर पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने ही पिके चांगली बहरू लागली. मात्र, काही दिवसांपूर्वी जोगेश्वरी येथील काही कुप्रवृत्तीच्या लोकांनी पेनबोरीकडे जाणारे प्रकल्पाचे पाणी अडविले. या संदर्भात येथील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रार करून पाणी नियमित सोडण्याची मागणी केली. त्यानुसार सबंधित अधिकाऱ्यांनी बंद केलेले पाणी एक दोन वेळा पुन्हा सोडले; परंतु हे पाणी जोगेश्वरी येथील काही लोकांकडून पुन्हा पुन्हा अडविल्या जात होते. त्यामुळे पेनबोरी परिसरातील विविध प्रकारची आठशे एकरामधील पिके संकटात सापडली. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच पाटबंधारे विभागाने कुकसा प्रकल्पातून रविवारपासून पेनबोरीसाठी पाणी सोडण्यास सुरुवात केली.