शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

अखेर कुकसा प्रकल्पातून सिंचनासाठी सोडले पाणी !

By admin | Updated: January 1, 2017 18:35 IST

कुकसा प्रकल्पातून शेती सिंचनासाठी कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी मागील काही दिवसांपासून मध्येच अडविण्यात येत होते.

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 1 - शिरपूर जैन इथल्या कुकसा प्रकल्पातून शेती सिंचनासाठी कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी मागील काही दिवसांपासून मध्येच अडविण्यात येत होते. या संदर्भात लोकमतने २६ डिसेंबरच्या अंकात पाणी रोखल्याने रब्बी पिके संकटात या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत लघू पाटबंधारे विभागाने रविवार प्रकल्पातून पाणी सोडले.मालेगाव तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या; परंतु रिसोड तालुक्यात असलेल्या कुकसा येथे काच नदीवर काही महिन्यांपूर्वीच जलप्रकल्पाची उभारणी करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील केनवड, जोगेश्वर, कुकसा, गणेशपूर, अंचल अशा काही गावांतील साडेसहाशे हेक्टर शेतीला त्याचा फायदा होऊ लागला आणि शेतकरी या प्रकल्पाच्या पाण्यावर सिंचन करू लागले. यामध्ये पेनबोरी येथील शेकडो शेतकऱ्यांचा समावेश आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने कुकसा प्रकल्पात मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्रात किंवा रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली असून, पेनबोरी येथील शेतकऱ्यांनाही या प्रकपातून पाणी देण्याचा ठराव झाला आणि यावेळी मोठ्या प्रमाणात हळद, गहू, हरभरा या पिकांची पेरणी केली. कुकसा प्रकल्पातून वेळेवर पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने ही पिके चांगली बहरू लागली. मात्र, काही दिवसांपूर्वी जोगेश्वरी येथील काही कुप्रवृत्तीच्या लोकांनी पेनबोरीकडे जाणारे प्रकल्पाचे पाणी अडविले. या संदर्भात येथील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रार करून पाणी नियमित सोडण्याची मागणी केली. त्यानुसार सबंधित अधिकाऱ्यांनी बंद केलेले पाणी एक दोन वेळा पुन्हा सोडले; परंतु हे पाणी जोगेश्वरी येथील काही लोकांकडून पुन्हा पुन्हा अडविल्या जात होते. त्यामुळे पेनबोरी परिसरातील विविध प्रकारची आठशे एकरामधील पिके संकटात सापडली. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच पाटबंधारे विभागाने कुकसा प्रकल्पातून रविवारपासून पेनबोरीसाठी पाणी सोडण्यास सुरुवात केली.