शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

IPL बंद करून राज्यातील पाण्याचा प्रश्न सुटणार नाही - सत्यजित भटकळ

By admin | Updated: April 14, 2016 18:08 IST

ज्यातील दुष्काळाचा प्रश्न हा गंभीर आहे, मात्र आयपीएलचे सामने बंद रून वा दुसरीकडे हलवून हा प्रश्न सुटणार नाही. आयपीएल हे एक सॉफ्ट टार्गेट आहे, असे मत सत्यजित भटकळ यांनी व्यक्त केले.

ऑनलाइ लोकमत
मुंबई, दि. १४ - राज्यातील दुष्काळाचा प्रश्न हा गंभीर आहे, मात्र आयपीएलचे सामने बंद करून वा दुसरीकडे हलवून हा प्रश्न सुटणार नाही. आयपीएल हे एक सॉफ्ट टार्गेट आहे, खरा प्रश्न तर वेगळाच आहे, असे मत दिग्दर्शक सत्यजित भटकळ यांनी व्यक्त केले. 
महाराष्ट्राला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी अभिनेते, उद्योगपती व काही संस्थांनी पुढाकार घेतला असून, त्यात अभिनेता आमिर खानचाही समावेश आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी त्याने 'पाणी फाऊंडेशन'ची स्थापना केली असून आहे. यामध्ये आमिरसह सत्यमेव जयते’चे दिग्दर्शक सत्यजित भटकळ यांचाही सहभाग असून आज 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात आमिरसह बोलतना सत्यजित यांनी पाणी प्रश्नावर मत मांडले.
राज्यात भीषण दुष्काळ असताना आयपीएल स्पर्धेच्या काही सामन्यांसाठी लाखो लीटर पाणी वाया जाण्याच्या मुद्यावरून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने बीसीसीआयला जाब विचारत ३० एप्रिलनंतरचे सर्व सामने राज्याबाहेर खेळवण्याचा आदेश दिला होता. लोकांना प्यायला पाणी नसताना तुम्ही पाण्याची नासाडी कशी करू शकता असा सवालही न्यायालयाने विचारला.
या मुद्यावरून अद्याप वाद सुरू असतानाच सत्यजित भटकळ यांनीही आपले मत व्यक्त केले. ' मी काही आयपीएलचा फार मोठा चाहता वगैरे नाही, पण आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवून आपला पाण्याचा प्रश्न सुटेल असे मला वाटत नाही. त्यासाठी वेगळे प्रयत्न आणि लोकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. सामने बाहेर खेळवून राज्यातील पाण्याचा प्रश्न कसा सुटेल. आयपीएल हे सॉफ्ट टार्गेट आहे' असे भटकळ म्हणाले.