शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
4
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
5
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
6
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
7
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
8
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
9
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
10
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
13
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
14
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
15
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
16
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
17
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
18
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
19
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
20
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

IPL बंद करून राज्यातील पाण्याचा प्रश्न सुटणार नाही - सत्यजित भटकळ

By admin | Updated: April 14, 2016 18:08 IST

ज्यातील दुष्काळाचा प्रश्न हा गंभीर आहे, मात्र आयपीएलचे सामने बंद रून वा दुसरीकडे हलवून हा प्रश्न सुटणार नाही. आयपीएल हे एक सॉफ्ट टार्गेट आहे, असे मत सत्यजित भटकळ यांनी व्यक्त केले.

ऑनलाइ लोकमत
मुंबई, दि. १४ - राज्यातील दुष्काळाचा प्रश्न हा गंभीर आहे, मात्र आयपीएलचे सामने बंद करून वा दुसरीकडे हलवून हा प्रश्न सुटणार नाही. आयपीएल हे एक सॉफ्ट टार्गेट आहे, खरा प्रश्न तर वेगळाच आहे, असे मत दिग्दर्शक सत्यजित भटकळ यांनी व्यक्त केले. 
महाराष्ट्राला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी अभिनेते, उद्योगपती व काही संस्थांनी पुढाकार घेतला असून, त्यात अभिनेता आमिर खानचाही समावेश आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी त्याने 'पाणी फाऊंडेशन'ची स्थापना केली असून आहे. यामध्ये आमिरसह सत्यमेव जयते’चे दिग्दर्शक सत्यजित भटकळ यांचाही सहभाग असून आज 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात आमिरसह बोलतना सत्यजित यांनी पाणी प्रश्नावर मत मांडले.
राज्यात भीषण दुष्काळ असताना आयपीएल स्पर्धेच्या काही सामन्यांसाठी लाखो लीटर पाणी वाया जाण्याच्या मुद्यावरून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने बीसीसीआयला जाब विचारत ३० एप्रिलनंतरचे सर्व सामने राज्याबाहेर खेळवण्याचा आदेश दिला होता. लोकांना प्यायला पाणी नसताना तुम्ही पाण्याची नासाडी कशी करू शकता असा सवालही न्यायालयाने विचारला.
या मुद्यावरून अद्याप वाद सुरू असतानाच सत्यजित भटकळ यांनीही आपले मत व्यक्त केले. ' मी काही आयपीएलचा फार मोठा चाहता वगैरे नाही, पण आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवून आपला पाण्याचा प्रश्न सुटेल असे मला वाटत नाही. त्यासाठी वेगळे प्रयत्न आणि लोकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. सामने बाहेर खेळवून राज्यातील पाण्याचा प्रश्न कसा सुटेल. आयपीएल हे सॉफ्ट टार्गेट आहे' असे भटकळ म्हणाले.