शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर ग्रीड’ करेल राज्याचा कायापालट - लोणीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:29 IST

‘वॉटर ग्रीड’च्या माध्यमातून प्रथमच महाराष्ट्राची स्वत:ची पाणीपुरवठा योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. पाणीपुरवठा योजना राबविताना एक स्रोत संपला

‘वॉटर ग्रीड’च्या माध्यमातून प्रथमच महाराष्ट्राची स्वत:ची पाणीपुरवठा योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. पाणीपुरवठा योजना राबविताना एक स्रोत संपला की दुसरा स्रोत अशी शोधाशोध करण्यापेक्षा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाण्याची शाश्वत रचना निर्माण करण्यात येत आहे. वॉटर ग्रीडच्या माध्यमातून दुष्काळी भागातही पाणी पोहोचविणे शक्य होणार असून त्यामुळे महाराष्ट्राचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.वॉटर समिट-२०१७च्या माध्यमातून ‘लोकमत समूहा’ने पाणीप्रश्नावर व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे सांगून बबनराव लोणीकर म्हणाले की, दोन वर्षांच्या दुष्काळात सहा हजार टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ राज्यावर आली. त्यानंतर जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यभरातील ११ हजार गावांतील नद्यांचे खोलीकरण, धरणे आणि तळ्यातील गाळ काढणे, नवीन पाण्याचे साठे तयार करणे आदी कामे हाती घेण्यात आली.आपल्या घराला लागणाऱ्या पाण्याचा विचार प्रत्येक व्यक्ती करते. तसाच विचार राज्याला लागणाऱ्या पाण्याबद्दल व्हायला हवा. राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्राच्या पाणीप्रश्नाचा विचार करून योजना हाती घेतल्या आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यातील ११ हजार गावांत सरकारच्या वतीने पाण्याची कामे झाली. लोकसहभागातून निधी उभारण्यात आला. लोकसहभागातून राबविण्यात आलेली ही क्रांतिकारक योजना असल्याचे लोणीकर म्हणाले.