शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
4
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
5
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
6
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
7
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
8
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
9
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
10
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
11
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
12
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
13
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
14
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
15
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
16
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
17
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
18
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
19
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
20
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता

‘वॉटर ग्रीड’ करेल राज्याचा कायापालट - लोणीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:29 IST

‘वॉटर ग्रीड’च्या माध्यमातून प्रथमच महाराष्ट्राची स्वत:ची पाणीपुरवठा योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. पाणीपुरवठा योजना राबविताना एक स्रोत संपला

‘वॉटर ग्रीड’च्या माध्यमातून प्रथमच महाराष्ट्राची स्वत:ची पाणीपुरवठा योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. पाणीपुरवठा योजना राबविताना एक स्रोत संपला की दुसरा स्रोत अशी शोधाशोध करण्यापेक्षा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाण्याची शाश्वत रचना निर्माण करण्यात येत आहे. वॉटर ग्रीडच्या माध्यमातून दुष्काळी भागातही पाणी पोहोचविणे शक्य होणार असून त्यामुळे महाराष्ट्राचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.वॉटर समिट-२०१७च्या माध्यमातून ‘लोकमत समूहा’ने पाणीप्रश्नावर व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे सांगून बबनराव लोणीकर म्हणाले की, दोन वर्षांच्या दुष्काळात सहा हजार टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ राज्यावर आली. त्यानंतर जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यभरातील ११ हजार गावांतील नद्यांचे खोलीकरण, धरणे आणि तळ्यातील गाळ काढणे, नवीन पाण्याचे साठे तयार करणे आदी कामे हाती घेण्यात आली.आपल्या घराला लागणाऱ्या पाण्याचा विचार प्रत्येक व्यक्ती करते. तसाच विचार राज्याला लागणाऱ्या पाण्याबद्दल व्हायला हवा. राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्राच्या पाणीप्रश्नाचा विचार करून योजना हाती घेतल्या आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यातील ११ हजार गावांत सरकारच्या वतीने पाण्याची कामे झाली. लोकसहभागातून निधी उभारण्यात आला. लोकसहभागातून राबविण्यात आलेली ही क्रांतिकारक योजना असल्याचे लोणीकर म्हणाले.