शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पाणीसंकट दूर होईपर्यंत पाणीप्रश्नावर काम करणार - आमिर

By admin | Updated: May 5, 2016 18:53 IST

राज्यात पाण्याची समस्या फार मोठी आहे. लोकचळवळीतून, लोकसहभागातून या प्रश्नावर मात करता येऊ शकते. म्हणून आम्ही पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे.

ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि. ५ : राज्यात पाण्याची समस्या फार मोठी आहे. लोकचळवळीतून, लोकसहभागातून या प्रश्नावर मात करता येऊ शकते. म्हणून आम्ही पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील वरूड, कोरेगाव (सातारा), अंबेजोगाई (बीड) या तीन तालुक्यांतील गावांमध्ये स्पर्धा सुरू केली असून स्पर्धेत सहभागी गावांसाठी ह्यपाणी फाऊंडेशनच्यावतीने एक कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. राज्य टंचाईमुक्त होईपर्यंत पाणीप्रश्नावर सतत काम करीत राहीन, अशी ग्वाही पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमिर खान यांनी दिली.

वरूड तालुक्यातील वाठोडा या गावी गुरूवारी पहाटे ६.३० वाजता आमिर खान यांचे मराठी सिने कलावंतांसह आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी काटोलचे आमदार आशिष देशमुख, आमदार अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, तहसीलदार भुसारी, पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, वसुधा बोंडे, सरपंच मनोज बाडे, उपसरपंच सरोज उपासे, पंचायत समितीचे माजी सभापती नीलेश मगर्दे, अभिनेत्री रिमा लागू, मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर, सुनील बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमिर खान यांनी वाठोडा गावच्या पाझर तलावात श्रमदान करून तलावातील गाळ काढला. यावेळी वाठोडा गावातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी मानवी साखळी करून दोन तास श्रमदान केले. आमिर खान पुढे म्हणाले, यावर्षी ३ तालुक्यांत तर पुढील वर्षी ३० तालुक्यांत आणि त्यापुढील वर्षी ३०० तालुक्यांत ही स्पर्धा घेण्यात येईल. राज्य पूर्णपणे टंचाईमुक्त होईपर्यंत आम्ही ही स्पर्धा घेतच राहू. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गावात जलसंवर्धनाचे उपक्रम राबविले जाणार असल्याने प्रत्येकच गाव विजेता ठरेल, असेही आमिर खान यावेळी म्हणाले.सत्यजित भटकळ यांनी 'वॉटर कप' स्पर्धेसाठी वाठोडा ग्रामस्थांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले व स्पर्धेची माहिती दिली. शास्त्रीयदृष्ट्या पाणी अडविणे, जिरविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक गावातील ५ लोकांना प्रशिक्षण दिले आहे. वरूड तालुक्यात या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रशासनातील अधिकारी नियमितपणे श्रमदान करतात. ही चळवळ निश्चिपणे पाणीप्रश्न संपवेल. यावेळी अभिनेत्री रिमा लागू, सई ताम्हणकर, सुनील बर्वे, आ. अनिल बोंडे यांची देखील भाषणे झालीत. जिल्हाधिकारी गित्ते म्हणाले, वाठोडा तालुक्यात ५६ हजार एकर जमीन मशागतीखाली आहे. त्यातील १० हजार एकर जमीन सिंचनाखाली आहे. पुढील तीन वर्षांत या भागात ठिबक करण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले.