शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

दलित वस्त्यांच्या पाण्यासाठी ४८़३० कोटी

By admin | Updated: January 31, 2015 05:18 IST

केंद्र आणि राज्य सरकारने भरभरून निधी देऊनही राज्य सरकारच्या पाणीपुरवठा खात्याच्या नाकर्तेपणामुळे मुंबईची तहान

नारायण जाधव, ठाणेकेंद्र आणि राज्य सरकारने भरभरून निधी देऊनही राज्य सरकारच्या पाणीपुरवठा खात्याच्या नाकर्तेपणामुळे मुंबईची तहान भागविणाऱ्या ठाणे-पालघर जिल्ह्यांसह राज्यातील अनेक वाड्यावस्त्यांपर्यंत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अद्याप पोहोचलेलीच नाही. याविषयीचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते़ यानंतर, खडबडून जागे झालेल्या पाणीपुरवठा विभागाने राज्यातील दलित वस्त्यांच्या पाणीयोजनांसाठी ४८ कोटी ३० लाख रुपयांचा निधी तत्काळ वितरीत केला आहे़यानुसार, हा निधी जीवन प्राधिकरणास ४३ कोटी ४७ लाख आणि भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेस चार कोटी ८३ लाख असा विभागून देण्यात येणार आहे़राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १,००,४८८ वस्त्यांपैकी अनेक वस्त्या अद्याप पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत़ या वर्षी उद्दिष्ट दिलेल्या २,२५४ दलित वस्त्यांपैकी अवघ्या १७ वस्त्यांत ही योजना पोहोचल्याचे वास्तव ैै‘लोकमत’ने समोर आणले होते़ तसेच भटक्या विमुक्तांच्या १७,५०५ वस्त्यांपैकी २६७, अल्पसंख्याकांच्या ८३४८ पैकी १६२ आणि अल्प उत्पन्न गटातील ३७५७ पैकी ७८ वस्त्यांतच ही योजना पोहोचल्याचेही निदर्शनास आणले होते़राज्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारचा हिस्सा म्हणून १०० कोटी ३५ लाख आणि राज्य सरकारचा हिस्सा म्हणून २८ कोटी रुपये असे १२८ कोटी २८ लाख महाराष्ट्र सरकारने नववर्षातच जिल्हानिहाय वितरीत केल्यानंतर राज्यात ही योजना कितपत यशस्वी ठरली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला असता दरवर्षी हा निधी देऊनही राज्यातील अल्पसंख्याकांसह दलित आणि भटक्या विमुक्तांच्या अनेक वस्त्यांत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम पोहोचलेलाच नसल्याचे वास्तव निदर्शनास आले होते़ त्यानंतर, महाराष्ट्र शासनाने हा ४८ कोटी ३० लाखांचा निधी खास दलित वस्त्यांसाठी दिला आहे़