शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपात कायम राहणार

By admin | Updated: August 4, 2016 01:13 IST

पाणीसाठा केवळ १९१ दिवस पुरणार असून, सध्या तरी नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

पिंपरी : पवना धरण आजअखेर ७५ टक्के भरले. आजचा पाणीसाठा केवळ १९१ दिवस पुरणार असून, सध्या तरी नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आणखी काही दिवस पाणीकपात कायम राहणार आहे.पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पवना धरणाचा पाणीसाठा ७५ टक्के झाला आहे. मावळ परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. धरणातील साठा वाढत आहे. पाणीसाठा समाधानकारक असल्याने महापालिकेतील सदस्यांनी पाणीकपात मागे घेऊन नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली होती. पाणीकपात मागे घेणार का, या विषयी आयुक्तांना विचारले असता, आणखी काही दिवस पाणीकपात करणे शक्य नाही, पाणीसाठा वाढल्यास जलसंपदा विभागाशी चर्चा करून कपात मागे घेण्याविषयी बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे आयुक्तांनी सांगितले. आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘‘पवना धरणाचा एकूण साठा २७२.११ दशलक्ष घनमीटर आहे. त्यामध्ये २४०.९७ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त साठा आहे. गतवर्षी ३ आॅगस्टला पाणीसाठा ६५.३५ टक्के एवढा होता. सध्या २५ टक्के कपात पाणीपुरवठ्यात करण्यात आली असून, आजच्या धरणसाठ्यानुसार हा पाणीपुरवठा २६० दिवस म्हणजे २० एप्रिल २०१७ रोजी पर्यंत पुरेल इतका आहे. १५ टक्के पाणीकपात केल्यास २२९ दिवस म्हणजे २० मार्च २०१७ पर्यंत पाणीपुरवठा करता येईल. पाणीकपात १० टक्के केल्यास २१२ दिवस म्हणजे ३ मार्च २०१७ पर्यंत पाणीपुरवठा करता येईल आणि कपात रद्द केली, तर १९१ दिवस म्हणजे १० फेब्रुवारी २०१७ पर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होईल. लवकरच सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे.’’ (प्रतिनिधी)