शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीचे संकट टळणार

By admin | Updated: July 22, 2016 01:29 IST

पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पिंपरी-चिंचवडवरील पाणीकपातीचे संकट टळणार आहे.

पिंपरी : पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पिंपरी-चिंचवडवरील पाणीकपातीचे संकट टळणार आहे. पंधरा दिवसांत आढावा घेऊन पाणीकपात मागे घेण्याविषयी निर्णय होणार असल्याचे जलसंपदा आणि महापालिकेच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याबाबत महापालिका अधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्यात आढावा बैठक होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने सुरुवातीला दिवसातून एकदा, त्यानंतर दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. जूनअखेरपर्यंत पावसाने ओढ दिल्याने पिंपरी-चिंचवडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली होती. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मावळ परिसरात संततधार सुरू झाली. त्यामुळे पाणीपुरवठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली. १० टक्क्यांवर पोहोचलेल्या पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली. त्यानंतर सलगपणे संततधार सुरू होती. सर्वत्र नदी-नाल्यांना पाणी आल्याने पवना धरणातून पवना नदीत सोडले जाणारे पाणी बंदही केले होते. मावळात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आजअखेर धरणाचा साठा ५४.३४ टक्के झाला आहे. एक जूनपासून धरणक्षेत्रात १०७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर २४ तासांत धरणक्षेत्रात १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २० दिवसांत ४४.३४ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. चोवीस तासांत ०.७७ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. (प्रतिनिधी)गेल्या वर्षी आॅगस्टअखेर ८० टक्के पाणीसाठागेल्या पावसाचे प्रमाण कमी होते. आॅगस्टअखेर धरणात पाणीसाठा ८० टक्के होता. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे. मावळात संततधार सुरूच असल्याने पाणीसाठ्यात वाढ होणार आहे, असा अंदाज जलसंपदा विभागाने वर्तविला आहे.