शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

पाणीकपातीचे संकट टळणार

By admin | Updated: July 22, 2016 01:29 IST

पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पिंपरी-चिंचवडवरील पाणीकपातीचे संकट टळणार आहे.

पिंपरी : पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पिंपरी-चिंचवडवरील पाणीकपातीचे संकट टळणार आहे. पंधरा दिवसांत आढावा घेऊन पाणीकपात मागे घेण्याविषयी निर्णय होणार असल्याचे जलसंपदा आणि महापालिकेच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याबाबत महापालिका अधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्यात आढावा बैठक होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने सुरुवातीला दिवसातून एकदा, त्यानंतर दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. जूनअखेरपर्यंत पावसाने ओढ दिल्याने पिंपरी-चिंचवडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली होती. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मावळ परिसरात संततधार सुरू झाली. त्यामुळे पाणीपुरवठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली. १० टक्क्यांवर पोहोचलेल्या पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली. त्यानंतर सलगपणे संततधार सुरू होती. सर्वत्र नदी-नाल्यांना पाणी आल्याने पवना धरणातून पवना नदीत सोडले जाणारे पाणी बंदही केले होते. मावळात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आजअखेर धरणाचा साठा ५४.३४ टक्के झाला आहे. एक जूनपासून धरणक्षेत्रात १०७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर २४ तासांत धरणक्षेत्रात १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २० दिवसांत ४४.३४ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. चोवीस तासांत ०.७७ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. (प्रतिनिधी)गेल्या वर्षी आॅगस्टअखेर ८० टक्के पाणीसाठागेल्या पावसाचे प्रमाण कमी होते. आॅगस्टअखेर धरणात पाणीसाठा ८० टक्के होता. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे. मावळात संततधार सुरूच असल्याने पाणीसाठ्यात वाढ होणार आहे, असा अंदाज जलसंपदा विभागाने वर्तविला आहे.